कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १८१


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलवधानंतरच्या शिवरायांच्या मोहिमेचा आढावा
शिवरायांच्या हाती अफजलखानाचा मृत्यू व त्यानंतर त्याच्या सैन्याची झालेली वाताहत ह्या गोष्टी भारतातील राज्यकर्त्यांना धक्कादायक होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आदिलशाहीच्या दख्खनवरील अधिपत्यावर बसलेली ही सणसणीत चपराक होती. ह्या धक्क्यातून आदिलशाही सावरण्यापूर्वी शिवरायांनी त्यावर जबरदस्त प्रत्याक्रमण केले.
शिवरायांच्या सैन्याचा त्रिशूळ आदिलशाही मुलुखात घुसला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की अफजलखानाला मारल्या दिवशीच शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे शिरवळ व सासवड परत मिळविले होते. म्हणजे प्रतापगडावर काहीही झाले तरी ह्या तीन जागा घेण्याचे आदेश आधीच सुटले होते व त्याहून महत्वाचे म्हणजे ते आदेश पाळले गेले होते.
अफजलखान वाईला आला तेव्हा प्रतापगड हा शिवरायांच्या राज्याच्या दक्षिण सीमेवर होता. तिथून ते पन्हाळगडाचा भाग शिवरायांनी अफजलवधानंतर केवळ १८ दिवसात मिळवला. हा पराक्रम अतुलनीयच म्हटला पाहिजे पण त्यापुढे जाऊन शिस्तबद्ध योजनेशिवाय अशक्य होता असेही म्हणावे लागेल.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८
महाराष्ट्रातील खराखुरा इतिहास's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १८०


सांभार : मराठा साम्राज्यकोश

नेताजीच्या वादळी हलचाली
कोल्हापूरच्या युद्धानंतर नेताजीने आदिलशाही भागात खोलवर छापे घातले. अनपेक्षित असलेल्या ह्या आक्रमणांने आदिलशाहीला स्तंभित केले. नेताजीला थांबवू शकणारा कुठलाही सरदार ते पुढे करु शकले नाहीत. नेताजीने कर्नाटकातील महत्वाची व्यापारी नगरे लुटली. जास्तीजास्त लूट कशी मिळवता येईल हे त्याच्या छाप्याचे मुख्य लक्ष्य होते. स्वराज्य प्राप्तीसाठी हा उपक्रमही अत्यंत महत्वाचा होता.
नेताजीने मिरज, सांगली, गोकक, गदग, दुदवाड, कुरुंदवाड, रायबाग, हुकेरी, अथणी, धारवाड व अशी छत्तीस नगरे लुटली. विजापुरापासून फक्त तीस किमीवर असलेले तिकोटा देखिल त्याने लुटून फस्त केले. अत्यंत वेगवान व कमी वेळात केलेल्या ह्या छाप्यात दक्षिणेत त्याने थेट लक्षमेश्वरपर्यंत धडक मारली.
त्याच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या की आदिलशाही सैन्याला त्याचा पाठलाग करणे अवघड होते. तिकोट्यावरचा हल्लातर दख्खनमधील आदिलशाहीच्या अधिपत्यावर झालेला मोठ्या आघात होता. छाप्यानंतर नेताजी पुन्हा पन्हाळ्यावर शिवरायांना भेटायला गेला. त्याला फक्त तेरदळ परगण्यात थोडा प्रतिकार झाला. तिथे त्याला कृष्णगौडा देसाई पुढे माघार घ्यावी लागली.
ह्या महत्वाकाक्षी पण यशस्वी धाडींनी आदिलशाही भागात प्रचंड खळबळ माजविली. शिवाजी राजा हा आदिलशाहीच्या सामर्थ्यासमोर एका मोठ्या प्रश्नचिन्हासारखा उभा राहिला.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७९


सांभार : मराठा साम्राज्यकोश

दौलोजीची कोकणावर चाल
जेव्हा शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो.
अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली.
राजापूरला आदिलशाही अधिकारी अब्दुल करीम ह्याला ही जहाजे सुपूर्त करण्यात आली. जेव्हा त्याला रुस्तुमेजमानच्या २८ डिसेंबर १६५९ च्या पराभवाबद्दल कळले तेव्हा त्याने राजापूरहून पळ काढला. १२ जानेवारी १६६० ला शिवरायांनी पाचशे मावळे राजापूरला व आणखी दोनशे जैतापूरला पोहोचले.
अब्दुल करीम, महमूद शरीफ व इतर काहींनी जहाजांनी वेंगुर्ल्याला पळ काढला. जैतापूरला काही इंग्रजांनी शिवरायांच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात फिलिप गिफ्फार्डला अटक झाली. १५ जानेवारी १६६० ला त्यांनी राजापूर सोडले व खारेपाटणला गेले. त्यांनी खारेपाटणच्या कोट घेतला व फिलिप गिफ्फार्डला त्यात बंदी बनविले.
५ मे १६६० च्या एका वलंदेजी पत्रात शिवरायांच्या चपळ हलचालींमुळे आदिलशाही अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ दिसून येते. शिवरायांनी कोकणात कुडाळपर्यंत सर्व भाग जिंकून घेतला असेही त्यात म्हटले आहे. ४ फेब्रुवारी १६६० ला दाभोळही शिवरायांकडे आले व १५ फेब्रुवारी १६६० च्या सुमारास कुडाळचा किल्लाही त्यांनी जिंकला.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८
राजा शिवछत्रपती, पृष्ठ २६७
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७८


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलवधानंतर शिवरायांची वेगवान चाल
अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यावर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजीला भेटले . नेताजीला त्यांनी आदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्दी हिलाल हे आदिलशाहीतून फुटलेले सरदार त्याला मिळाले.
दख्खनच्या पठारावरुन दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन गडांना वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले .
कोल्हापूरही सहजपणे जिंकून घेतले व राजे पन्हाळ्याकडे वळले . गडावर वेढ्याची काहीच तयारी केली नव्हती. बहुदा त्यांना शिवरायांच्या मृत्यूची किंवा फारतर तहाची अपेक्षा होती. अफजलखानचा मृत्यू व नंतरच्या शिवरायांच्या चालीने गडावरचे लोक गलितगात्र झाले.
केवळ दोन दिवसात पन्हाळगडासारखा मोठा गड शिवरायांनी जिंकून घेतला. शिवभारत सांगते की आतील सैन्याने तोफांनी, बाणांनी व छोट्या हत्यारांनी प्रतिकार केला. पण शिवरायांचे लोक तटापर्यंत पोहोचले व दोऱ्या लावून तटावरुन आत गेले. २८ नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी पन्हाळगड घेतला. तेव्हा अफजलखानाच्या वधाला फक्त आठरा दिवस झाले होते.
इतक्या कमी वेळात शिवरायांनी प्रतापगडापासून पन्हाळगडापर्यंतची ठाणी जिंकून घेतली. इथे हेही सांगणे आवश्यक आहे की जेव्हा अफजलखानाने आक्रमण केले होते त्यावेळी प्रतापगड हा शिवरायांच्या मुलुखाच्या सीमेवर होता. आदिलशाही वावटळापासून त्यांना त्याच्या रयतेचे रक्षण करायचे होते हे त्यातून स्पष्ट होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९४३-९४७
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७७


सांभार : मराठा साम्राज्यकोश

सुपे, शिरवळ व सासवड परत शिवरायांकडे
१० नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला. त्याच दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे, शिरवळ व सासवड जिंकले. प्रतापगडापासून ह्या ठिकाणांचे अंतर पाहता ही आक्रमणे निर्धारित योजनेनुसार केली गेली होती व ती शिवाजीराजा -अफजलखान भेटीच्या परिणामावर अवलंबून नव्हती.
ह्या प्रकरणात शिवरायांनी आदिलशाही सैन्य व विशेषकरुन अफजलखानला ज्या प्रकारे भुलविले ते अभ्यास करण्याजोगे आहे. शिरवळ, सुपे व सासवड परत जिंकून घेणे ही निश्चितच आक्रमक चाल होती. भेटीच्या योजनेच्या सफलतेवर शिवरायांना किती दृढ विश्वास होता हे त्यातून दिसते. जरी अफजलखानला मारता आले नसते तरी ह्या तीन जागा घेतल्याने त्याला एक कणखर संदेश मिळाला असता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७६


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलवधानंतर शिवरायांची चढाई
अफजलखानला मारण्याआधीच शिवरायांची पुढची मोहीम सुरू झाली होती. त्यांच्या हालचाली अतिशय नियोजनबद्ध व अचूक होत्या. आदिलशाही मोहीमेत गेलेली सर्व ठाणी त्यांनी परत मिळविली. इतकेच नव्हे तर नवीन आदिलशाही मुलूखही त्यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली आणला. शिरवळ, सासवड व सुपे ही ठाणी अफझलवधाच्या दुस-या दिवशीच शिवरायांच्या सैनिकांनी जिंकून घेतली. ह्या ठिकाणांची अंतरे बघता असे दिसते की प्रतापगडावर च्या निकालावर हे अवलंबून नव्हते. शिवाजी राजा , नेताजी व दौलोजी त्रिशूळासारखे तिन दिशांनी बाहेर पडले आणि आदिलशाही मुलूखात घुसले.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७५


सांभार : मराठा साम्राज्यकोश

आदिलशाही फौजा पन्हाळगडाजवळ पराभूत
शिवरायांनी पन्हाळगड जिंकला तोवर प्रतापगडावरुन पळालेले आदिलशाही सरदार विजापुरास पोहोचले. आदिलशाहने लगेच रुस्तुमेजमानला शिवरायांना रोखण्यासाठी पाठवले. विजापूर सोडल्यावर रुस्तुमेजमानला पन्हाळा पडल्याचे कळले.
रुस्तुमेजमानबद्दल कळल्यावर शिवाजी राजे पन्हाळ्याहून निघाले व २८ डिसेंबर १६५९ रोजी कोल्हापूरजवळ दोन्ही सैन्य समोरासमोर आली. जेधे शकावली सांगते की शिवरायांना ह्या युद्धात बारा हत्ती व दोन हजार घोडे मिळाले. आदिलशाही सैन्याला पळ काढून विजापुरास जावे लागले. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दहा हजाराचे सैन्य असावे असे अनुमान आहे.
शिवरायांसाठी आदिलशाहीविरुद्ध खुल्या मैदानात झालेल्या युद्धात हा अत्यंत महत्वाचा विजय होता. ह्या विजयानंतर शिवरायांनी नेताजीला आदिलशाही भागात कर वसूल करायला धाडले व तो परत पन्हाळगडावर गेला.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९४९-९६०
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७४


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखानच्या मोहिमेचे सार
सैनिकी धोरण व युद्ध ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून शिवाजी राजा व अफजलखान मधल्या लढाईकडे पाहता येईल. शिवरायांनी त्याला अनुरुप अशा भागात अफजलखानाला कसे ओढले हे त्यातून दिसून येते. शिवरायांना स्वतःच्या कमतरतांची जाणीव होतीच पण त्याबरोबर त्याच्या प्रतिस्पर्धीच्या उणीवांचीही चांगली माहिती होती. आदिलशाही फौजेला जावळीसारख्या धनदाट जंगलात घेऊन जाणे हा निव्वळ वेडेपणा होता.
अफजलखानने मे १६५९ मधे विजापूर सोडले व तो १० नोव्हेंबर १६५९ ला मारला गेला. म्हणजे तो पूर्ण पावसाळ्यात प्रवास करत वाईला पोहोचला आणि पावसाळ्यानंतर शिवरायांना भेटायला प्रतापगडाशी गेला. आजही महाबळेश्वरच्या भागातून वाईहून निघून प्रतापगड किंवा जावळी गाठणे महाकठीण जाते. इथले अरण्य इतके दाट आहे की वाट चुकणे किंवा जंगली श्वापदांचा उपद्रव होणे अगदी सहज शक्य आहे. त्यामुळे अफजलखानाला भुलविण्यात शिवाजी राजा किती सफल झाला होता हेच दिसते.
शिवरायांनी घाबरण्याचा आव आणून अफजलखानाला पूर्णपणे गाफिल ठेवले. ज्यावेळी अफजलखानाने प्रतापगडास जायचे ठरविले तेव्हाच ह्या युद्धाचे पारडे शिवरायांच्या बाजूने पूरते झुकले. आदिलशाही सैन्यालातर हे सगळ्या पळवाटा संपल्यासमानच होते.
जगातील इतर युद्धांप्रमाणेच ह्या युद्धात सैनिकांच्या मनोधैर्याने कलाटणी घडविली. मराठ्यांकडे अफजलखानापेक्षा कित्येक कमी लोक व दारूगोळा होता. पण त्यांच्याकडे अफजलखानाशी भिडायला तयार असलेला एक शूर व निर्धारी सेनापती होता. ह्या एका माणसाच्या उपस्थितीने मराठी सैन्याचे मनोधैर्य जणू प्रचंड उंचावले असावे. ह्यानंतर शिवरायांनी अफजलखानाला मारले ही बातमी वणव्यासारखी सगळ्या सैन्यात पसरली असावी. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी विखुरलेल्या व बेसावध अशा आदिलशाही सैन्याची वाताहत केली.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८८३-८८५
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७३


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखानच्या वधानंतरचे युद्ध
अफजलखानाला मारल्यानंतर गडावरून ठरलेला इशारा केला गेला. झाडात लपलेले मराठी सैन्य बेसावध आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. पळण्याचे सर्व मार्ग आधीच रोखले होते.
नारायण नावाच्या एका ब्राह्मणाकडे पाच हजार लोक दिले होते. ही पूर्ण फळी आदिलशाही सैन्यावर बरसली. कमळोजी साळुंखे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी वडखले आणि रामजी पांगरे ह्यांनी प्रत्येकी एक हजार मावळांनी वेगवेगळ्या बाजूने आक्रमण केले. सेनापती नसलेल्या आदिलशाही सैन्याची दयनीय अवस्था झाली होती. माघार घेण्यासाठीही जागा उरली नव्हती.
मुसाखानने मराठ्यांच्या पहिल्या फळीचा हल्ला थोपवून धरला. हसनखान, याकुतखान, अंकुशखान व इतर काहींनी त्याला मदत केली. आदिलशाहीच्या घोडदळापुढे शिवाजीच्या पायदळाला त्या घनदाट अरण्याचा पुरेपूर फायदा होत होता. मुसाखानचा हा प्रयत्न मावळ्यांनी हाणून पाडला व त्याला माघार घेत अरण्यात जावे लागले.
आदिलशाही सैन्यात पूर्ण गोंधळ उडाला होता व त्यांची निर्णायक हार झाली. त्यांचे कित्येक लोक मारले गेले व सर्व युद्धसाहित्य-दारूगोळा वगैरे शिवरायांना मिळाले. शाहजीचा चुलतभाऊ मंबाजी भोसले हा आदिलशाहीकडून लढताना मारला गेला. अफजलखानाची दोन मुले, रणदुल्लाखान (दुसरा), अंबरखान, राजाजी घाटगे व इतर काही सरदार पकडले गेले.
मुसाखान, हसनखान, याकुतखान, अंकुशखान व अफजलखानचा थोरला मुलगा फजलखान कसेबसे त्या जंगलात लपून रातोरात वाईला पोहोचले. शिवाजीने नेताजी पालकरला त्याच वेळी वाईवर चालून जायला सांगितले होते पण तो वेळेत पोहोचू शकला नाही.
अफजलखानचे सैन्य जणू जावळीचा अरण्यात इतिहासजमा झाले. आदिलशाहीसाठी हा एक जणू विजेचा आघात होता. विजापुरास ही बातमी जायच्या आधीच शिवाजी राजे प्रतापगडाहून निघाले व वाईला पोहोचले . निर्णायक वेळी प्रतिस्पर्ध्यावर आघात करायची त्याची क्षमता अतुलनीय होती.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९३८-९४२
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७२


सांभार : मराठा साम्राज्यकोश

शिवाजी राजा -अफझलखान भेट
भेटीचा दिवस ठरला - १० नोव्हेंबर १६५९. शिवभारतात ह्या घटनेचे तपशीलवार वर्णन मिळते. शिवरायांनी अंगरख्याखाली चिलखत, मंदिलाखाली शिरस्त्राण अशी आवश्यक ती सर्व सुरक्षा घेतली होती. कमरेला तलवार व दांडपट्टाही होताच. शिवाजी राजे भेटीच्या जागी पोहोचले तेव्हा अफजलखान तिथे आधीच पोहोचला होता.
जसा शिवाजी राजा शामियान्याजवळ गेला तसे अफजलखानने हात पुढे करत त्याचे स्वागत केले. शिवाजी राजे साधारण पाच फुट पाच इंच उंचीचा असल्याने त्या धिप्पाड अफजल समोर खुजा भासत होते . त्याने शिवरायांना सर्व चिंता सोडून आदिलशाहीत येण्याचे आमंत्रण दिले. भोळेपणाचा आव आणत स्वतःची तलवारही त्याने बाजूला ठेवली.
पुढे येत त्याने शिवरायांना आलिंगन दिले व एकदम त्याच्या डाव्या हाताने शिवरायांची मान दाबत त्यांना धरले. उजव्या हाताने खंजीर उपसून त्याने शिवरायांच्या शिवरायांनी चटकन वाघनखीने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला.
शिवरायांच्या वाराने अफजल कळवळून ओरडला व झोकांड्या देत शामियान्यातून बाहेर पडला. तेवढ्यात अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्करने शिवाजीवर तलवारीने वार केला. शिवरायांनी तो परतवून लावला. काही साधनांमधे असे म्हटले आहे की कृष्णाजी ब्राह्मण असल्याने शिवरायांनी त्याला मारले नाही. काहीत असे म्हटले आहे की शिवरायांचा अंगरक्षक जीवा महाला ह्याने मधे पडून कृष्णाजीला मारले.
तोवर दोन्ही बाजूंचे अंगरक्षक तिथे आले. अफजलखानाच्या दहा बारा अंगरक्षकांना शिवरायांच्या लोकांनी यमसदनी धाडले. सैयद बंडानेही शिवाजीवर वार केला पण जीवा महालाने तो स्वतःवर घेतला आणि दंडपट्ट्याच्या दुसऱ्या घावात त्याला पाडले.
हा सर्व प्रकार बहुदा दहा बारा मिनीटात संपला असावा. शिवरायांनी त्याच्यापेक्षा कितीतरी बलाढ्या शत्रूला चतुरतेने व शेवटी शस्त्रबळाने पस्त केले. ह्या घटनेचे महत्व किती होते ते ब्रिटनमधल्या वर्तमानपत्रातील त्याच्या उल्लेखाने दिसून येते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७१


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान भेटीची तयारी
उपलब्ध साधनांतून असे दिसते की शिवरायांचा अफजलखानच्या दुर्हेतूबद्दल जराही शंका नव्हती. त्यांनी स्वतःला व त्याच्या मावळ्यांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे चुकून जर शिवाजी राजा मारला गेला तरी अफजलखानाला सोडायचे नाही असेच त्याच्या सरदारांना सांगितले होते.
तेव्हा अंतःस्ते विचार कान्होजी जेधे व सरकारकडून बैसोन राजश्री स्वामींनी विचार केला की मुसलमान बेभान आहे. बांदलांचा जमाव जाउलीस व पाराच्या रानात राहणे. कदाश्चित भेटीचे समई त्याणे बेईमानी केली तरी त्याचे लस्कर पारात आहे ते डोंगरास चढू न देणे आणि निवडक माणूस घेऊन आपली मदत करणे. कदाश्चित श्री अंबेच्या वरदे अफजलखान मृत्यू पावला तरी इशारतीचे आवाज गडावरी होतील तेव्हा पारावरी चालून घेऊन अगदी लस्कर बुडवणे. हैबतराऊ व बाळाजी नाईक सिलिंबकर जमावानिसी बोचेघोळीचे घाटी ठेविले आहेत. ते घाट लस्करास चढू देणार नाहीत. यैसा अंतःस्ते विचार जाला आणि बंदोबस्ती केली.
जेधे शकावली
अफजलखान जावळीत पोहोचल्यानंतर शिवरायांनी परतीचे ठरलेल्या मार्गांवर आपली माणसे जंगलात दडवून ठेवली. अफजलखानाच्या सैन्यापासून व हेरांपासून सावध राहण्याचे आदेश त्यांना दिले होते. बांदलांना त्यांची माणसे घेऊन पार गाव व जावळीजवळ पार घाट रोखून धरायला सांगितले होते. हैबतराव व बाळाजी नाईक सिलिमकरांना बोचेघोळीचा घाट आडवायला सांगितले होते. शिवरायांना काही अपाय होता आदिलशाही सैन्याला घाट चढून वर न जाऊ देणे असेच आदेश होते.
गडावरून तोफेचा इशारा होताच आदिलशाही सैन्यावर हल्ला करण्याचा आदेश होता. जावळीहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या सर्व वाटा शिवरायांनी बंद केल्या होत्या. अफजलखानला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच कल्पना नसावी. तो शिवरायांच्या फासात अगदी बेसावधपणे फसला होता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७०


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान जावळीस पोहोचतो
सध्याचा पाचगणी मार्गे जाणारा पसरणीचा घाट तेव्हा वापरत नसत. त्यावेळी आदिलशाही सैन्याने तायघाटातून वर येत महाबळेश्वर गाठले व रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाकडे वळले. हा सगळा परिसर आजही पूर्ण जंगलमय आहे त्यामुळे तेव्हा काय परिस्थिती असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. आदिलशाही सैन्याला त्यांच्या तोफा, हत्ती व सामान-सुमान नेताना अनंत हाल झाले असणार हे निश्चित.
अफजलखानाला त्या दिव्यातून जात शेवटी जावळीला पोहोचल्यावर निश्चितच आनंद झाला असेल. त्याने जावळीतून वाहणाऱ्या कोयनेच्या बाजूला तळ ठोकला. शिवरायांनी त्याच्याकडे वकील पाठवला व औपचारीक चौकशी केली. अफजलखाननेही त्याला प्रतिसाद दिला. बहुदा ह्या वेळेपर्यंत आपण न लढताच जावळी घेतली अशी त्याची समज झाली असावी.
मग शिवरायांनी आदिलशाहच्या सैन्यातील जवाहिऱ्यांना बोलावणे धाडले. त्यांच्याकडील दाग-दागीने विकत घेऊन अफजलखानाच्या सरदारांना नजराणे देण्यासाठी हा खटाटोप असावा असे समजून ते जवाहिर प्रतापगडावर गेले. शिवरायांनी त्यांना सगळा माल विकत घेण्याचे आश्वासन दिले व गडावरच त्यांची राहायची सोय केली.
त्या बिचाऱ्या जवाहिऱ्यांना स्वप्नातही जाणवले नसेल की ते घनदाट अरण्याने वेढलेल्या एका कडेकोट अशा गडावर बंदिस्त झाले होते. त्यानंतर भेटीचा दिवस व वेळ ठरली - १० नोव्हेंबर १६५९.
अफजलखान त्याच्या दोन-तीन अंगरक्षकांसमवेत भटीच्या जागी पोहोचेल असे ठरले. त्याचे दहा सैनिक भेटीच्या जागेपासून बाणाच्या अंतरावर थांबतील असेही ठरले. शिवरायांना तेच नियम होते फरक इतकाच की ते भेटीच्या जागी गडावरून खाली येणार होते .
उपलब्ध साधनातून असे दिसते की दख्खनमधल्या लहान-मोठ्या अशा सर्व लोकांचे लक्ष शिवाजी राजा - अफजलखाना युद्धाकडे होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९२१-९२७
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६९


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखानची मोहिम
अफजलखानाची मोहिम ही बहुदा शिवरायांच्या आयुष्यातली सगळ्यात प्रसिद्ध व बऱ्याच साधनांमधे दिलेली घटना असेल. दोन जुने पोवाडे, जेधे शकावली, शिवभारत, तारीख-ए-अली, अलीनामा व इतर काही तत्कालीन साधनांमधे ह्या घटनेचा तपशील किंवा उल्लेख सापडतो. अफजलखानाचा वध हा आदिलशाहीसाठी फार मोठा हादरा होता. ह्या घटनेनंतर शिवरायांच्या नावानेच त्याच्या शत्रुंमधे जरब बसली.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६८


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान व शिवरायांचा पत्रव्यवहार
अफजलखान जेव्हा वाईला पोहोचला तेव्हा शिवाजी राजे प्रतापगडावर होते . वाईचा हवालदार कृष्णाजी भास्कर ह्याला अफजलखानचा वकील म्हणून नेमण्यात आले. शिवरायांच्या बाजूने गोपीनाथपंताने वकीलीचे काम केले. आदिलशाहीविरुद्ध त्याच्या कारवायांची आठवण करून देणारे पत्र अफजलखानने शिवरायांना लिहीले.
शिवरायांनी त्याला मनापासून क्षमायाचना करणारे उत्तर लिहीले. अफजलखान जर त्याला भेटायला प्रतापगडावर आला तर मिळविलेले सर्व भाग व किल्ले आदिलशाहीला सुपूर्त करण्याचे त्याने मान्य केले. अफजलखानाबद्दल नितांत आदर व्यक्त करत शिवरायांनी त्याच्या थोर पराक्रमांचे कौतुकही केले.
उपलब्ध साधनांतून असे दिसते की अफजलखानने शिवरायांना त्याने मिळवलेले भाग आदिलशाहीकडून जाहगीर म्हणून मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने शिवरायांना वाईला भेटायचा आदेशही दिला. शिवरायांनी अफजलखानला पुन्हा लिहीले की वाईला त्याला भेटण्याची भिती वाटत असल्याने अफजलखानने प्रतापगडावर येऊन त्याला भेटावे.
शिवरायांच्या कळकळीच्या विनंत्या व त्याने व्यक्त केलेली भिती ह्यामुळे शेवटी अफजलखानने जावळीस जाऊन शिवरायांची भेट घेण्याचे मान्य केले. त्याच्या काही सरदारांनी अफजलखानला ह्या आत्मघातकी निर्णयापासून परावृत करण्याचा प्रयत्नही केला. शिवरायांचा हेतु स्वच्छ असेल तर तो स्वतः वाईला येऊन अफजलखानची भेट का घेत नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्याबरोबरच शिवाजी राजा जर अफजलखानाला जावळीत बोलावतो आहे तर त्यामागे त्याचा काहीतरी मोठा डाव असावा हे सुद्धा त्यांनी ताडले.
जावळीचा भाग दाट अरण्याचा होता व हत्ती-घोडे व तोफा घेऊन तिथून जाणे म्हणजे महामुश्किल होते. पण तरीही अफजलखानने त्याचा निर्णय बदलला नाही. त्याने काही हत्ती, घोडे व काही मुल्यवान वस्तू वाईलाच मागे ठेवायचे ठरविले.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९२१-९२७
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६७


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान वाईत पोहोचतो
मे १६५९ मधे अफजलखानने वाजत-गाजत विजापूर सोडले. त्याने घेतलेली नेमकी वाट साधनांमधे उपलब्ध नाही. पण अज्ञानदासाचा एक पोवाडा सांगतो की त्याने तुळजापूरचे मंदिर पाडले. नकाशावर बघितल्यावर लक्षात येते की तुळजापूर काही विजापूर ते वाई ह्या वाटेवर येत नाही.
त्यामुळे त्याने कोणालातरी तुळजापूरला पाठवून ते मंदिर पाडले अशी शक्यता नाकारता येत नाही. दुसरी शक्यता अशी आहे की ही मोहीम सुरू होण्यापूर्वी कधीतरी त्याने हे मंदिर उध्वस्त केले. पण ह्यात शंका नाही की त्याच्या सांगण्यावरून तुळजापूरच्या मंदिराला इजा झाली होती.
त्यानंतर तो पंढरपूरास आला व विठ्ठल मंदिरावर गदा आणली. सभासद बखरीत, अज्ञानदासाच्या पोवाड्यात व शिवभारतात ह्याचा उल्लेख आहे. २० जानेवारी १६६८ च्या एका महजरातही ह्या घटनेचा उल्लेख मिळतो. अफजलखानने वाईकडे जाताना पंढरपूर मंदिराची नासधूस केली हे उघड आहे.
ही दोन्ही मंदिरे हिंदूंना वंद्य होती. तुळजापूरचे मंदिर तर शिवरायांच्या घराण्याचे आराध्यदैवत होते. शिवरायांना चिथवून मोकळ्या मैदानात आणायचा त्याचा हा डाव असावा. कारण कोणतेही असो, त्या निमित्ते त्याने महाराष्ट्राचा दोन आराध्य दैवतांवर हात उगारला हे खरे.
सन १६४९ पासून वाई परगणा अफजलखानकडे होता. शिवभारतातही अफजलखानने वाईला तळ का ठोकला ते दिले आहे. जेव्हा शिवरायांनी चंद्ररावकडून जावळी घेतली त्यावेळी त्याचा भाऊ प्रतापराव तेथून निसटला व आदिलशाहीत गेला. जावळीची चांगली माहिती असल्याने नंतर त्याला अफजलखानाबरोबर पाठविण्यात आले.
त्याने अफजलखानाला सावध करायच्या ऐवजी असे सांगितले की जर जावळी काबीज झाली तर शिवरायांचे इतर भाग सहज घेता येतील. वाई जावळीच्या जवळच असल्याने व तो भाग त्याच्याकडे असल्याने अफजलखानने तिथे तळ ठोकला. ह्यातून असे दिसते की प्रतापरावाला अफजलखानाच्या मोहीमेपेक्षा जावळी परत मिळविण्यामधे जास्त रस होता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६६


सांभार : मराठा साम्राज्यकोश

मोहिमेतल्या सुरूवातीच्या चाली
मोहिमेच्या सुरुवातीला आदिलशाहकडून मावळातल्या देशमुख-पाटलांना फर्मान मिळाले होते. कान्होजी जेधे रोहिडखोऱ्यातील भोरचे देशमुख होते. त्यांना १६ जून १६५९ तारखेचे एक फर्मान मिळाले. अशीच फर्माने मावळातील इतर देशमुखांना मिळाली होती.
अफजलखानने त्याच्या सैन्याला काही ठिकाणे जिंकण्यासाठी धाडले होते. त्याप्रमाणे जाधवांनी सुपे, पांढऱ्यांनी शिरवळ, खराड्यांनी सासवड, सिद्दी हिलालने पुणे आणि सैफखान हबशीने कोकण जिंकून घेतले. अशा प्रकारे अफजलखानने शिवरायांवर जणू फास अवळला होता. शिवरायांनी नेजाजी पालकरला आदिलशाही मुलुख लुटण्यासाठी पाठवले होते. शिवरायांना थेट युद्ध टाळायचे होते त्यामुळे त्याने अफजलखानच्या कुठल्याही आक्रमणाचा फारसा प्रतिकार केला नाही.
अफजलखाननेही मावळातल्या देशमुखांना पत्रे धाडली. कान्होजी जेधेच्या मुलाला लिहीलेले त्याचे पत्र उपलब्ध आहे. त्याने शिवाजी जेधेला त्याच्या सैन्यात मानाचे पद देऊ केले होते. पण त्याआधीच कान्होजी त्याच्या पाच मुलांना घेऊन शिवरायांकडे गेला होता. उत्रवळी तरफेतले केदारजी व खंडोजी खोपडे हे दोघे मात्र अफजलखानकडे गेले.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९१२-९२१
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६५


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान शिवरायांना मारण्याचा विडा उचलतो
तारीख-ए-अली ह्या आदिलशाहीच्या समकालीन साधनात अफजलखानला स्वारीसाठी पाठवितानाच्या परिस्थतीचे वर्णन केले आहे. त्यातील महत्वाच्या भागाचे मराठी भाषांतर खाली दिले आहे.
स्वर्गवासी बादशाह आजारी पडला तेव्हा लबाडीत व कपटविद्येत सैतानाचा गुरू असलेला बहिष्कृत काफिर सीवा भोसले याने तळकोकणचा संपूर्ण मुलूख लुटीच्या झाडूने साफ करून त्या मुलूखातील राहीरचा किल्ला काबीज केला. स्वर्गवासी बादशाह निधन पावला तेव्हा ती बातमी त्या दुष्ट काफिराने विजयवार्तेपेक्षा आनंददायी मानून त्या मुलूखातील किल्ले हस्तगत केले. अधाशी व भुकेलेल्या कुत्र्याने प्रेताच्या हाडाने तृप्त न होता वारंवार अधिकाची अपेक्षा करीत असावे त्याप्रमाणे तो जुलमाचा व अन्यायाचा हात लांबवून लूट करीत होता आणि ईशचिंतनात निमग्र असलेल्या धर्मश्रद्ध लोंकांवर अन्याय करीत होता.
ही बातमी समजल्यावर बादशाहाने मुहम्मदी धर्माच्या पालनाला बादशाहाच्या रक्तपिपासू तलवारीच्या पाण्याशिवाय टवटवी येणार नाही आणि काफिरत्वाचे व अनेकेश्वरोपासनेचे काटवण शत्रूला जाळणा-या तलवारीच्या आगीशिवाय जळणार नाही म्हणून त्या दुष्ट बहिष्कृतास मुळापासून उखडून टाकण्याकरिता अफझलखानाची दहा हजार स्वारांसह नेमणूक केली की क्रोधाग्नी तीव्र करून त्याच्या आयुष्याची शिल्लक रक्कम विनाशाच्या मुशीत वितळवावी आणि त्याच्या आयुष्याचे शेत घोड्यांच्या टापांखाली तुडवावे
अफझलखानची रवानगी करताना बादशाहाने त्याला अशी सूचना दिली होती की त्या काळतोंड्या काफिराने लबाडीचे पत्र पाठविले तरी त्याचे लबाडीचे व तोंडपुजेपणाचे म्हणणे न ऐकता त्याच्या आयुष्याच्या पिकावर मृत्यूचा अग्नी फेकण्याशिवाय आणि त्याच्या जीविताची गढी पाडण्याशिवाय दुसरे काहीही करू नये
शिवरायांना मारण्यासाठीच अफजलखानाला पाठविले होते हे वरील उल्लेखातून स्पष्ट होते. अली आदिलशाह तेव्हा केवळ वीस वर्षांचा होता. त्यामुळे हा निर्णय व त्याची तयारी बहुदा बडी बेगमने केली असावी. ह्यात अफजलखानाबरोबर दहा हजाराचे सैन्य होते असेही म्हटले आहे.
आदिलशाही सैन्यात अंबरखान, याकुतखान, मुसाखान, रणदुल्लाखान (दुसरा), सिद्दी हिलाल, घोरपडे, नाईकजी पांढरे, नाईकजी खराडे, मंबाजी भोसले व इतर नामांकित सरदार होते. उत्रवळी तरफेतील केदारजी व खंडोजी खोपडेही ह्या सैन्यात सामिल होते. शिवरायांच्या मुलुखातील हे दोघेच अफजलखानाला मिळाले होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८८५-८९०
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६४


अफझलखानच्या मोहिमेचे पूर्वसूत्र
सन १६५६ मधले शिवरायांचे जावळीवरील आक्रमण पुढच्या आदिलशाही भागावरच्या चालींचे सुतोवाच होते. आदिलशाहीला महत्वाचा असलेला कोंढाणाही त्याने परत घेतला. ह्या सगळ्यामुळे एखादे आदिलशाही वावटळ शिवरायांवर येणार हे उघड होते.
आदिलशाहीचे मुघलांबरोबरचे युद्ध तीन वर्ष चालले होते. आग्र्याकडे जाताना औरंगजेबने ४ एप्रिल १६५८ ला नर्मदा ओलांडली. लगेच आदिलशाहीत अंतर्गत कलह सुरू झाला व शेवटी डिसेंबर १६५८ च्या सुमारास तो शमला. ह्या सगळ्यानंतर शिवरायांकडे लक्ष द्यायला आदिलशाहला वेळ झाला.
शाहजी राजांनी शिवरायांच्या कारवायांचे उत्तरदायित्व घेण्याचे नाकारल्यावर ह्या मोहिमेवर शिक्कामोर्तब झाला असावा. शाहजी राजांचा शिवरायांना पाठींबा असावा पण ते आदिलशाहीत नोकरीस असल्याने त्यांना ते उघडपणे व्यक्त करणे शक्य नव्हते. जे काही असो, आदिलशाहने शाहजी राजांना शिवरायांच्या कारवायांसाठी दोषी ठरविले नाही असे २७ मार्च १६५९ च्या एका पत्रातून दिसते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८८३-८८५
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १६३



शिवरायांनी १६५९ जून मध्ये औरंगजेब गादीवर बसला तेव्हा सोनोपन्तांबरोबर एक अर्जदास्त राज्यारोहण प्रसंगी पाठवली त्यास उत्तर म्हणोन उंची पोशाख आणि उत्तर पाठवले.
औरंगजेबाने दिलेली तंबी आदिलशहाने बरीच मनावर घेतली कारण बरेच सरदार दरबारात शिवरायांविषयी कागाळ्या करत यात अफझल आघाडीवर होता,वाई प्रांत आणि आसपासचा मुलुख सर्वात जास्त शिवरायांकडून प्रभावित होता...येथील वतनदार राजांच्या बाजूने फिरले त्यामुळे महसूल नीट येत नव्हता,तसेच राजांच्या सैन्याचा वारंवार त्रास होत असे.वळवाचा पाउस येतो तशी शिवाजीची माणसे येतात आणि जातात हाती कोणी लागत नाही त्यामुळे हे काम पत्करण्यास कोणीही तयार नव्हते.वाईचा सुभेदार म्हणून हि कामगिरी अफझलखानच्याच माथ्यावर आली तो कबूल हि झाला. मोहिमेला जाण्यापूर्वी तो आपल्या कोणी अवलिया फकिराला भेटायला गेला होता तेथे फकिराने त्यास अनिष्ट होईल असे सांगितले म्हणतात.
स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये.

या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात.
अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंवभोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर
(भोसले बखर मध्ये खान भिमतीरी होता असा उल्लेख आहे, खानाने तुळजाभवानी ची मूर्ती जात्यात भरडली,पांडुरंगाची मूर्ती फोडली असे बखरकार सांगतात परंतु त्यास तत्कालीन पुरावे नाहीत)
 

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १६२



अफजल खानाने स्वतासाठी बनवून घेतलेली कबर ...पण बिचारा तेथे दफन नाही होऊ शकला !
(शहाबाग,विजापूर )

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १६१

 कोण होता हा अफजलखान ?

या अफजलखानावर आददलिहाचा भयंकर जीव ददसतो अफजलपूर आणण िहापूर या दोन्ही शिलालेखात आददलिाहने त्याच्या कडून ह्या दोन गावांचा मोकासा देताना काही वचने घेतली आहेत की दहंदुना अमानुष त्रास देणार नाही तसेच कुणीही दहंदू तनपुबत्रक मेल्यास त्याची संपत्ती सरकारात जमा न करता ती त्याच्या वंिजांना देईन. ५२ सालचे हे लेख आहेत म्हणजे पुढे ७ वषा त्याने काय केले हे जरा प्रकािात आणून पदहले तर सत्य अधधक कळेल . अफजलखान देखील स्वतःला संबोधताना अफजलखान मुहम्मद्िाही म्हणतो त्याला आणखी एक वविेषण लावलेले आढळते ते म्हणजे ‘फजंद-ए-रिीद‘ म्हणजे िहाणा पुत्र. ह्या अथी हा
कारभारात चोख असावा. त्याचा शिक्का म्हणजे गवााचा फुगाराच ! गर अजा कुनद शसपहार अअला फजल फुजला व फजल अफजल – अज हर मलकी बजाए तश्स्बह आवाज आयद की अफजल अफजल याचा अथा असा की “आकािाने उत्कृष्ट्ट व्यक्तींची उत्कृष्ट्टता आणण अफजलची उत्कृष्ट्टता यांची तुलना केली तर जप माळेच्या मण्यासारखा प्रत्येक देवदुताकडून आवाज येईल अफजल अफझल!! अफझल हाच सवाश्रेष्ट्ठ आहे” अफजलखान आधी रणदौलाखानकडे नोकरीत होता. २१ ऑगस्ट १६३८ च्या एका पत्रावर ‘परवानगी अफजलखान’ असा एक िेरा आहे. म्हणजे पहा शिवाजीराजे ८ वषााचे होते तेव्हापासून हा अफजलखान राजनीतीचे डाव खेळत होता. त्याचा स्वभाव मुळतः क्रूर आणण कपटी होता हे त्याच्या अनेक कृत्यातून आणण पत्रातून ददसते.आपल्या जहाधगरीत पेरणीला उिीर झाला म्हणून त्याला कारणीभूत असणाऱ्या शलंगिेट्टीला दम भरताना अफजलखान शलदहतो – “रयत आमचे पोन्गडे [शमत्र] आहेती ” असेही तो म्हणतो तर पुढे “यैसे न कररता बाहीर बैसून रादहलीयामध्ये तुझी खैररयत नाही जेथे असिील व जेथे जासील तेथुणु खोदुणु काढूणु जो अशसरा देवूणु ठेवूणु घेईल त्यास जनोबासमेत कातुणु घाणीयात घाळूणु वपलोन हे तुम्ही येकीन व तहककक जाणणे “. ह्याच अफजलने कनााटक स्वारीच्या वेळी शिरेपट्टणच्या कस्तुरीरंगनला तहासाठी आमंत्रण देवून त्याचा दगाबाजीने खून केला होता आणण शिऱ्याचे बलाढ्य संस्थान खालसा करून ते आददलिाहीला शमळवले. माचा १६५७ नंतर जेव्हा औरंगझेब ववजापुरवर चालून आला असता कोंडीत सापडला तेव्हा ददल्लीहून मोठी फौज येऊ नये म्हणून खान मुहम्मदाने औरंगजेबाला सोडले आणण हे जेव्हा अफजलखानला समजले तेव्हा त्याने भर दरबारात थैमान घातले आणण बड्या बेग्मेिी संधान साधून ददवसाउजेड्या भर दरबारी खान महम्मदाची खांडोळी करवली. ह्याचा क्रूरतेचा उच्चांक आपल्या समोर येतो तो फ्रेंच साधनातून, Ba’rthelemu Abey Carey नावाचा एक फ्रेंच प्रवासी १६७३ दरम्यान अफजलपूर जवळून प्रवास करीत असता त्याला ततथे अफजलखानाच्या बायकांच्या समाध्यांची काही कामे चाललेली ददसली आणण चौकिी करता त्याला समजले की स्वारीवर जाण्यापूवी अफजलखानाने आपल्या बायकांना इथे असणाऱ्या ववदहरीत बुडवून मारले होते का तर त्याच्या पश्चात यांनी कुणािी संधान साधू नये म्हणून.ती ववदहर आजही आहे ततला सुरुंगबावडी असे म्हणतात.त्या ६४ कबरी आजही आहेत.अबे कारेने आपल्या प्रवास वणानात हे सवा दटपून ठेवले आहे म्हणून आज आपल्याला हा इततहास समजला. ह्याच अफजलखानाने कनकधगरीच्या वेढ्यात ऐनवेळी कुमक मागी रोखली आणण थोरल्या िंभूराजांना दगाबाजीने ठार केले.असा हा अफजलखान भोसले कुळीचे एक कपाळ पांढरे करून आता मावळावर नामजाद जाहला होता आणण श्जजाऊसाहेबांच्या उरलेल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्या मोठया भावाचे उसने फेडायचे होते.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १६०


कोण होता हा अफजलखान ?

ववजापूर दरबारातील अफजलखान हा शिवकालीन सुलतानी सत्तेचे दाहक प्रततक आहे. क्रूर, कपटी, खुनिी, द्वेष्ट्टा पण स्वतःच्या फायद्याचे असणारे राजकारण आणण व्यवस्थापन उत्तमपणे तडीस नेणारा अफजलखान, म्हणजे शिवकालातील सत्तेचा मूततामंत धमांध चेहरा.अफजलखान ही खरी तर एक पदवी आहे ह्याचे खरे नाव अब्दुल्लाखान असे होते.ववजापूरच्या दरबारातील मुदपाकखान्यात असणाऱ्या भटारणीचा हा पुत्र असावा असे ददसते.अज्ञानदासाच्या पोवाड्यात आणण संकषाण सकळकळेकृत शिवकाव्यात शिवाजीराजांच्या तोंडी जी वाक्ये ददली आहेत त्यावरून हे समजते की हा सामान्य कुळातला भटारी असावा .जवळ-जवळ सवाच समकालीन मराठी व अमराठी साधने अफजलखानाला अब्दुल भटारी ककंवा अफजल भटारी म्हणतात. औरंगझेबाने िहाजहानला ५७ साली शलदहलेल्या एका पत्रात अफजलखान हा रणदुलाखानाचा सेनापती असून त्याला बादिहा आददलखानाने पुत्र म्हणवून मोठी दौलत ददली आहे असा एक उल्लेख आला आहे.
अफजलखान - समकालीन धचत्र हे झाले लोकांचे मत पण अफजलखानाच्या अपयिाचे मुख्य कारण ठरणार होते ती त्याची घमेंड आणण त्याचा स्वतःवर आणण स्वतःच्या ताकदीवर असणारा प्रमाणाबाहेर आत्मववश्वास. अफजलखानाचे शिलालेख वाचू लागलो की याचा प्रत्यय येतो. ववजापूरजवळ असणाऱ्या एका गावाला त्याने स्वतःचे नाव ‘अफजलपूर‘ असे ददले होते. ततथे आणण िहापूर इथे उपलब्ध झालेल्या शिलालेखात तो स्वतःला काही वविेषणे लावतो – “कातील -इ मुत्मरररदान व काकफरान” म्हणजे बंडखोर आणण काकफरांची कत्तल करणारा आणण ”शिकनन्दा -इ बुतान“ म्हणजे मूती पायासकट फोडणारा. अफजलखानाने मंददरे फोडल्याचे अनेक पुरावे आहेत, शिवभारत आणण शिवकाव्यासारखे मराठीच नव्हे तर ४ जुलै १६५० (ग्रेगोरीअन) च्या चौलच्या पोतुाधगझ टपाल पत्रात अफजलखानाला चौलचा मोकासा शमळाला असून त्याने ततथली सवा दहंदू मंददरे पाडल्याचा उल्लेख आहे.अफजलखानाने १६५९ पूवी कधीतरी तुळजाभवानीच्या देवळावरही आघात केला होता – काही बखरीत त्याने ववजापूरहून येत असता तुळजाभवानी फोडीली,
जात्यात भरडली वगैरे प्रक्षोभक उल्लेख आहेत परंतु सूक्ष्म तनरीक्षण करता असे ददसते की अफजलखानाने मंददरास उपसगा हा १६५९ पूवी कधीतरी केला आहे कारण शिवभारत,९१ कलमी बखर आणण शिवकाव्य हे सगळे अफजलखान तनघाला की ज्याने मागे तुळजाभवानी/तुळजाश्म्बका दहला उपद्रव ददला होता असा उल्लेख करतात.अफजलखानाने पंढरपुरच्या ववठोबालाही त्रास ददल्याचे एका ६६ सालच्या महजरावरून ददसते.त्यात बडवेमंडळी “तो क्षेत्रास खाने आजम अफजलखानाची तसववस लागली” असा उल्लेख करतात. हे सवा पुरावे समकालीन आहेत तेव्हा प्रत्येकाने ववचार करावा इतके असूनही महाराष्ट्र देिात अफजल मेमोररअल रस्ट सारखे उपक्रम उभे राहतात.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १५९


बिरवाडी किल्ला
बिरवाडी किल्ला Birwadi Fort – १२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
रोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तलगड, मानगड कुर्डुगड, बीरवाडी असे अनेक छोटेछोटे किल्ले आहेत. इतिहासात फारसा कुठे उल्लेख नसलेला बीरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ कि.मी. अंतरावर आहे. स्वतःचे वाहन असलेतर १ ते २ तासात किल्ला सहज पाहून होते.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० बांधलेल्या पायऱ्या आहेत. सध्या देवळाचा जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्यामागील बाजूस शिवरायांचा ६ फूटी पुतळा उभा आहे. येथून वर चढल्यावर एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते. ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळून गडावर पोहचते. वाटेत एका ठिकाणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ठ्य असे की किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे प्रवेशद्वार आहे. आजही हे बऱ्यापैकी शाबूत आहे. येथून थोडेवर गेल्यावर आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अनेक अवशेष आहेत. किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी आढळतात. गडमाथा फारच निमुळता असल्यामुळे तो फिरण्यास अर्धातास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाणाचा एकच मार्ग आहे. तो बिरवाडि गावातून जातो. रोहा मुरुड मार्गावर चणेरा नावाचे गाव आहे. रोह्यापासून १८ कि.मी. वर तर मुरुड पासून ५ कि.मी. वर चणेरा गाव ५ कि.मी. वर चणेरा गाव आहे. चणेरा गावापासून बिरवाडी गाव ५ कि.मी. वर आहे. बिरवाडी हे पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास पायवाटा आहे. बिरवाडी गावातून किल्ला गाठण्यास अर्धा तास लागतो.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही मात्र बिरवाडी गावात असणाऱ्या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : जेवण आपण स्वतः घेवून जावे.
पाण्याची सोय : गडावर बारामही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : बिरवाडी गावातून अर्धातास.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १५८


एक सुंदर किल्ला घेरा सुरगड
रोहा हे रायगड जिल्ह्य़ातलं टुमदार गाव. तालुक्याचं ठिकाण असा मान मिळाल्याने अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं. पोह्य़ाचे पापड़, मिरगुंड, सुकामेवा इत्यादी खास कोकणी पदाथार्ंचं माहेरघर! जवळच असणारा मुरूडचा नितांतसुंदर सागरतीऱ वन्यजीवांचं नंदनवन असणारं फणसाड अभयारण्य़ अवचितगड़, बिरवाडी, तळा-घोसाळा हे किल्ले आणि देखण्या नक्षीकामानं नटलेली कुडे-मांदाड लेणी ही तर रोह्य़ाची खास ओळख. पण याच रोहा तालुक्यात कोलाड नागोठणे रत्यावरील खांब गावाजवळ एक अपरिचित दुर्ग उभा आहे..सुरगड!
आपल्या कातळकडयामुळे लांबूनही लक्ष वेधणारा आणि खास पावसाळयात भेट देण्याजोगा असा हा किल्ला. मुंबई-गोवा महामार्गाच्या अगदी जवळ हा किल्ला. पुण्याहून ताम्हिणी उतरून विळेमार्गे कोलाडला पोहोचलो की मुंबई-गोवा महामार्ग आडवा येतो. त्याचंच बोट धरून ५ किलोमीटरवरील खांब गावात पायउतार व्हायचं. मुंबईकडच्या दुर्गप्रेमींनी पेण -नागोठणे मार्गे थेट खांब गाव गाठावं. मुंबई गोवा महामार्ग ओलांडून पक्क्या सडकेनं दहा मिनीटात वैजनाथमार्गे पायथ्याचं घेरा सुरगड हे खास कोकणी गाव गाठलं की समोर सुरगडाचा हिरवागार कातळकडा दिसतो. त्याच्यावरून शांतपणे वाहणाऱ्या जलप्रपातांमुळे त्यांचं ते रूप आणखीनचं खुललेलं असतं. गावातील भातखाचरं तुडवत निघावं आणि थांबावं ते थेट एका खळाळत्या ओढय़ापाशी. नितळ शुभ्र पााण्याचा तो जलौघ आपली दृष्टी दूरवरुनच खेचून नेतो. हा ओढा ओलांडला की सुरगडाचं घनदाट जंगल सुरू होतं. सुरगडाचा कडा या झाडीमागं लपलेला असल्याने आपल्याला दिसत नाही. पावसाळयात तर हे जंगल खास अनुभवावं. वृक्षसंपदा तर इथं आहेच, पण फुलपाखरांचेही अनेक प्रकार आणि त्यांच्या रंगांच्या कैक अप्रतिम छटा सहजपणे बघायला मिळतात.
पायथ्याच्या गावकऱ्यांनी ‘घेरा सुरगड बचाओ समिती’ स्थापन केली असून त्यामार्फत सुरगडाच्या विकासाचे काम चालू आहे. तोच वसा सध्या मुंबईच्या ‘दुर्गवीर’ संस्थेने पुढे चालवला आहे. पायथ्याहून अध्र्या पाऊण तासात आपण एका पठारावर पोहोचतो. सुरगडाचा कातळ एव्हाना आपल्यासमोर उभा असतो. सुरगडाचा माथा गाठायचे दोन मार्ग. एक घळीतून जाणारा मुख्य दरवाजाचा, तर दुसरा गडाला फेरी मारून मागच्या बाजूने वर चढणारा. हा मार्ग लांबचा असला तरी या मार्गावर अणसाई देवीचं मंदिर आणि एक तोफ बघण्यासारखी आहे. जाता-येता स्वतंत्र मार्ग वापरल्यास संपूर्ण किल्ला फिरून होतो.
घळीच्या वाटेने निघालो, की कडय़ाच्या पोटात खोदलेलं पाण्याचं एक टाकं समोर येतं. शेजारी एक भुयारही पहायला मिळतं. घळीच्या पायथ्याशीही एक छोटेखानी गुहा आहे. घळीच्या जागीच गडाचा दरवाजा असावा. पुढे बुरूजही दिसतात. पावसाळयात हा मार्ग काहीसा निसरडा होतो, पण वाटतो तितका कठीण अजिबात नाही. त्या खोदीव खोबण्यांचा आधार घेत काळजीपूर्वक वर चढायचं की उजव्या बाजूला मिश्या असलेल्या मारूतीची देखणी मूर्ती दिसते. कमरेला खंजीर लावलेला आणि डोक्यावर झाडांचं छत्र! या प्रकारची मूर्ती किल्ल्यांवर क्वचितच पहायला मिळते. इथून दोन वाटा फुटतात. आपण उजवीकडच्या वाटेने गेलो, की घेरा सुरगड गावाकडे तोंड करून उभा असलेला एक बुरूज आहे. इथून अर्धचंद्राकृती कुंडलिकेचं पात्र, अवचितगड, घोसाळगड हे किल्ले आणि पायथ्याचं टुमदार घेरा सुरगड गाव दिसतं.
गडमाथ्यावर किल्ल्यावरील कोठार, भग्नावस्थेतील हेमाडपंती मंदिर, पाण्याची टाकी, सदर आदी वास्तू दिसतात. या गडावर एक अवाढव्य बांधणीचा बुरूजही दिसतो. गडाच्या माचीवर एक शिलालेख अवश्य पाहावा असा आहे. अरबी व देवनागरीत कोरलेल्या या शिलालेखानुसार सिद्दीसाहेब नावाच्या माणसाच्या हुक मावरून सूर्याजी याने हा किल्ला बांधला. या वेळी तुकोजी हैबतराव गडाचे सुभेदार होते. कर्नल प्रॉथरने १८१८ साली किल्ल्याचा ताबा घेतल्याची इतिहासात नोंद आहे.
किल्ल्याचा पसारा तसा लहान असल्याने तासाभरात किल्ला बघून पूर्ण होतो. वर्षांऋुतुचा खरा आनंद हा सुरगडासारख्याच आडवाटेवरच्या पण देखण्या किल्ल्यांमध्ये सामावला आहे. आजही तुम्ही गेलात तर सुरगडाचे ते देखणं पावसाळी रूप तुमच्यावर जादू करेल आणि शरीरानं तुम्ही तिथे नसलात तरी मन तिथेच ठेवून जायला भाग पाडेल.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १५७


एक सुंदर किल्ला घेरा सुरगड
रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात खांब गावाजवळ एक सुंदर किल्ला घेरा सुरगड या नावानं ओळखला जातो. रोहा-कोलाड-खांब-वैजनाथ (एस. टी. / सहा आसनी रिक्षा) असं २० किलोमीटर अंतर पार करून तुम्ही पायथ्याला पोहोचता. गडाची उंची २५० मीटर आहे. मध्यम चढाई श्रेणीत मोडणाऱ्या या गडावर जाण्यासाठी खांब गावातून दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग चढताना मध्येच एक दगडी घळ चढून जावं लागतं. दोराच्या साहाय्यानं ही घळ पार करता येते. दुसरा मार्ग घळीच्या सभोवती फिरून गडावर जातो. घळ येण्यापूर्वी डाव्या बाजूला इंजाई देवीचं मंदिर आहे. गडावर जाण्यापूर्वी वाटेत एक मारुती शिल्प आहे, या मारुतीच्या कमरेला खंजीर लावलेला आहे. धान्य कोठार, उत्तरेकडे हेमांडपंथी मंदिराचे अवशेष, १४ टाक्या, बुरुज आणि अरबी-फारसी भाषेतील एक शिलालेख असे अवशेष आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठान ही मुंबईची संस्था संतोष हसुरकर यांच्या संकल्पनेतून गडावर श्रमदान करत आहे. ते पाहाण्यासाठी गडाला जरुर भेट द्यावी. सोबत जेवणाचा डबा आणि पाणी आवश्यक.
Nearby cities: गोरेगाव, लोणावळा, पिरंगुट
अक्षांश-रेखांश : 18°27'17"N 73°13'35"E
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १५६


अवचितगड किल्ला
अवचितगड किल्ला Avachitgad Fort – ३०० मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
कर्जत जिल्ह्यातील रोहा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगडा पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या पिंगलसई गावापासून गडाची उंची ३०० मी. भरते. घनदाटा झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूणंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर फारसे पाहण्यासारखे काही नाही. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसऱ्या दरवाजात पाण्याने तुडूंब भरलेला तलाव आहे. कुंडातील पाणी एकदम पिण्यायोग्य आहे. जवलच खंडोबाची काल्या पाषाणातील मूर्ती आहे. पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगडा, धनगड, कोरीगड, रायगड, सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर न्याहाळता येतो.
गडावर जाण्यच्या वाटा : गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
१. पिंगळसई मार्ग : अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून पायी दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपन पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते.
२. मेढा मार्ग : मुंबई-रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ कि.मी. असलेल्या ढा या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. वाट दाट झाडांमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोऱ्यातील मेढा व पिंगळसई ही गावे दिसतात.
३. पडम मार्ग : गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना रोहा नागोठाणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखानाच्या मागून जाणारी वाट. गडाच्या दक्षिण प्रवेशद्वारापाशी घेवून जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.
राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : जेवण आपण स्वतः घेवून जावे.
पाण्याची सोय :गडावर बारमही पिण्याच्या पाण्याने तळे आहे.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १५५


रम्य तळागड .
इतिहास
तळागड शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून इ. स. १६५८ मध्ये जिंकून घेतला. पुढे पुरंदरच्या तहात २३ किल्ले मुघलांना दिले गेले. पण तळागड शिवाजी महाराजांकडेच राहिला. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर तळागड सिद्दीकडे आला. पेशवेकाळात थोरल्या बाजीरावांनी सिद्दीवर मात करत १७ एप्रिल १७३५ मध्ये तळागड जिंकला. १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने घोसाळगडाबरोबरच तळागडाचाही ताबा मिळवला. पावसाळ्यातला डोळ्यांना सुखावणारा नितांत सुंदर कोकणी निसर्ग व किल्ल्यांवर असणारी अवशेषांची मुबलकता हे तळगड सफरीचं मुख्य वैशिष्टय़. त्यात एखादी पावसाची हलकी सर आली, तर ‘याचसाठी केला अट्टहास’ असं वाटून जातं! किल्ल्याची चढाई अतिशय सोपी असून सहकुटुंब बघता येईल असा हा देखणा दुर्ग आहे. तळागडाजवळच भटकण्यासाठी अवचितगड, सुरगड, घोसाळगड व बिरवाडी हे किल्ले असून सुंदर कोरीवकामानं नटलेली कुडे-मांदाडची लेणीही आहेत. वर्षांऋतूच्या ‘ऑफबीट’ अनुभवासाठी तळागड व कुडय़ाची लेणी हा मस्त पर्याय आहे. वर्षांतले बाराही महिने दुर्गप्रेमींच्या कौतुकास पात्र ठरणारा तळागड हा पावसाळ्यात आपली वेगळी ओळख मागे ठेवतो आणि ही छोटीशीच पण लक्षात राहणारी सफर पुन्हा पुन्हा आठवायला भाग पाडतो!
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १५४


रम्य तळागड
. रायगड जिल्ह्य़ातील तळा तालुक्यातला तळागड हा अशाच नशीबवान किल्ल्यापैकी एक! अत्यंत सोपी चढाई, भरपूर प्रमाणात असलेले दुर्गावशेष आणि पावसाळ्यात बहरलेलं सृष्टिसौंदर्य यांच्यामुळे तळागडाची ट्रेकर्सकडून मोठय़ा प्रमाणात दखल घेतली जाऊ लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या सान्निध्यात असल्याने तळागडाचा पायथा गाठणेही सहजसाध्य आहे. म्हणूनच एका दिवसाच्या भटकंतीसाठी तळा किल्ला हा झकास पर्याय आहे.
तळा किल्ल्याच्या पायथ्याचं तळा गाव हे तालुक्याचं ठिकाण असल्याने गावाचा पसारा बऱ्यापैकी मोठा आहे. साहजिकच खासगी वाहने व एस.टी. यांची भरपूर प्रमाणात असणारी सोय हा तळागडाच्या सफारीतला ‘बोनस पॉइन्ट’ आहे. तळा गावाला जाण्यासाठी पुणे व मुंबई या दोन्ही बाजूंच्या ट्रेकर्सनी आधी मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर गाव गाठावे. पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे व मुंबईच्या बाजूने आल्यास कोलाडनंतर इंदापूर गाव आहे. पुणे व मुंबई दोन्हीकडून तळा गावासाठी थेट बसेस आहेत पण त्या न मिळाल्यास इंदापूरपासून तळा गावासाठी खासगी वाहने व एस.टी. यांची सारखी वाहतूक सुरू असते. इंदापूरपासून तळा किल्ला १५ कि. मी. वर आहे. इंदापूरवरून निघाल्यापासून थोडय़ाच वेळात तळागडाचा चौकोनी आकार नजरेत भरायला लागतो. साधारणपणे तासाभरात आपण तळा गावात पोहोचतो. तळा गावात चहा-नाश्ता, जेवण व निवासाची उत्कृष्ट व्यवस्था आहे. गावातून तळागड बराच उंच दिसत असला, तरी घाबरण्याचं कारण नाही. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी ठशठशीत मळलेली पायवाट असून १५ मिनिटांत आपण गडाच्या पहिल्या पठारावर दाखल होतो. या ठिकाणी तुरळक तटबंदीचे अवशेष असून इथून तळागडाचे दोन टप्पे आपल्याला दिसतात. या पठारापासून १० मिनिटांच्या अंतरावर गडाचा भग्नावस्थेत असलेला ‘हनुमान दरवाजा’ लागतो. दरवाजाजवळच कातळात कोरलेली हनुमानाची प्रतिमा असून खडकात खोदलेले शरभशिल्पही आपल्याला पाहायला मिळते. या दरवाजाची कमान ढासळलेली असून दोन्ही बाजूंचे फक्त खांब शिल्लक असले, तरी दरवाजात नेणाऱ्या गडाच्या पायऱ्या मात्र सुस्थितीत आहेत. प्रवेशद्वाराजवळच उजवीकडे कातळात खोदलेले पाण्याचे खांबटाके आहे. इथून समोर आपल्याला पहिल्या पठारावरून दिसलेला गडाचा बुरूज लागतो. आता गडाच्या बालेकिल्ल्याकडे नेणारी पायवाट सुरू होते. या वाटेवर डावीकडे उत्तम स्थितीतला व बंदुकांच्या माऱ्यासाठी जंग्यांची सोय असलेला बुरूज आहे. तळागडाच्या बालेकिल्ल्याचा दरवाजाही पूर्णपणे नामशेष झालेला असून गावातून निघाल्यापासून अध्र्या तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. दरवाजाजवळ एक मोठा बुरूज असून इथून दिसणारी तळागडाच्या पठारावरही हिरवळीची चादर म्हणजे अवर्णनीय दृश्य! या बुरुजावरून घोसाळगडाचा घुमटाकृती व सहज लक्ष वेधणारा आकार, सह्य़ाद्रीची मुख्य रांग, मांदाडची खाडी हा देखावा निखालस सुंदर आहे. बुरुजाच्या शेजारी एक जोते असून हे पूर्वीचे रत्नाकर महादेवाचे मंदिर आहे, असे तळा गावातील रहिवासी सांगतात. या जोत्यावर जाण्यासाठी दोनतीन पायऱ्याही आहेत. तळागडाच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे गडाची उंची मर्यादित असून त्यास कुठेही ताशीव कडय़ाचे संरक्षण नाही. त्यामुळे शत्रूला गडावर प्रवेश करणे सहजसाध्य आहे. ही बाब लक्षात घेऊनच गडाच्या चारही बाजू भक्कम तटबंदीने संरक्षित केल्या आहेत. या सर्व तटांमध्ये जंग्यांची मुबलक प्रमाणात सोय केलेली आहे. म्हणूनच तळागड उंचीने लहान जरी असला, तरी त्याला चारही बाजूंनी पूर्णपणे कडेकोट बंदोबस्त लाभलेला आहे. अशाच प्रकारच्या तटबंदीचे उदाहरण आपल्याला सातारा जिल्यातील कोरोगावजवळील वर्धनगड किंवा क ऱ्हाडजवळील वसंतगडावर पाहायला मिळते. जीवधन, सरसगड, कुलंग, गोरखगड यांसारख्या सह्य़ाद्रीच्या अभेद्य कडय़ांचे वरदान लाभलेल्या किल्ल्यांना परिघावरच्या तटबंदीची आवश्यकता भासलेली नाही.
रत्नाकर महादेवाच्या मंदिरापासून पुढे गडाच्या अवशेषांना सुरुवात होते. मंदिराच्या पुढे प्रथम खडकात खोदलेली पाण्याची टाकी लागतात. या टाक्यांच्या मागेच सदरेचे अवशेष आहेत. सदरेनंतर खोदीव टाक्यांची मालिकाच असून त्यात एक खांबटाकेही आहे. प्रत्येक टाक्याजवळ पाण्यावर आच्छादन करण्यासाठी ‘पोस्ट होल्स’ची व्यवस्था आहे. टाक्यांच्या शेजारी शिवलिंग असलेले पण छत नसलेले छोटेखानी मंदिरही आपल्याला बघायला मिळते. ही टाक्यांची मालिका जिथे संपते, तिथे मुख्य इमारत ढासळलेले पण दोन्ही बाजूंच्या भिंती सुस्थितीत असलेले ‘लक्ष्मी कोठार’ आहे. लक्ष्मी कोठाराच्या मागे तळागडाची तटबंदीने संरक्षित केलेली माची असून शेवटी एक भक्कम बांधणीचा बुरूज आहे. या बुरुजावर भगव्या झेंडय़ाचे निशाण लावलेले आहे. तळागडाच्या या माचीसारखीच माची जवळच्या घोसाळगडावरही आपल्याला बघायला मिळते. किल्ल्याचा विस्तार तसा लहान असल्याने अध्र्या-पाऊण तासात संपूर्ण गड भटकून होतो.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १५३


घोसाळगड
‪#‎इतिहास‬
शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पुर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज ‪#‎प्रतापगडाच्या‬ समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्याच्या सिद्धीने ‪#‎घोसाळगडाला‬ वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळाल्यावर सिद्धी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी ‪#‎घोसाळगड‬ मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला ‪#‎दुर्लक्षीत‬ आहे. गडदर्शन करून आल्यावाटेने उतरुन परतीचा मार्ग पकडता येईल. अथवा येथून चालत तीन तासांच्या पायपिटीनंतर बिरवाडीच्या किल्ल्याला जाता येते. बसने तळा किल्ला अथवा जंजिरा किल्ला ही गाठता येईल.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.