सांभार : मराठा साम्राज्यकोश
अफझलवधानंतरच्या शिवरायांच्या मोहिमेचा आढावा
शिवरायांच्या हाती अफजलखानाचा मृत्यू व त्यानंतर त्याच्या सैन्याची झालेली वाताहत ह्या गोष्टी भारतातील राज्यकर्त्यांना धक्कादायक होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आदिलशाहीच्या दख्खनवरील अधिपत्यावर बसलेली ही सणसणीत चपराक होती. ह्या धक्क्यातून आदिलशाही सावरण्यापूर्वी शिवरायांनी त्यावर जबरदस्त प्रत्याक्रमण केले.
शिवरायांच्या सैन्याचा त्रिशूळ आदिलशाही मुलुखात घुसला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की अफजलखानाला मारल्या दिवशीच शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे शिरवळ व सासवड परत मिळविले होते. म्हणजे प्रतापगडावर काहीही झाले तरी ह्या तीन जागा घेण्याचे आदेश आधीच सुटले होते व त्याहून महत्वाचे म्हणजे ते आदेश पाळले गेले होते.
अफजलखान वाईला आला तेव्हा प्रतापगड हा शिवरायांच्या राज्याच्या दक्षिण सीमेवर होता. तिथून ते पन्हाळगडाचा भाग शिवरायांनी अफजलवधानंतर केवळ १८ दिवसात मिळवला. हा पराक्रम अतुलनीयच म्हटला पाहिजे पण त्यापुढे जाऊन शिस्तबद्ध योजनेशिवाय अशक्य होता असेही म्हणावे लागेल.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८
शिवरायांच्या हाती अफजलखानाचा मृत्यू व त्यानंतर त्याच्या सैन्याची झालेली वाताहत ह्या गोष्टी भारतातील राज्यकर्त्यांना धक्कादायक होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आदिलशाहीच्या दख्खनवरील अधिपत्यावर बसलेली ही सणसणीत चपराक होती. ह्या धक्क्यातून आदिलशाही सावरण्यापूर्वी शिवरायांनी त्यावर जबरदस्त प्रत्याक्रमण केले.
शिवरायांच्या सैन्याचा त्रिशूळ आदिलशाही मुलुखात घुसला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की अफजलखानाला मारल्या दिवशीच शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे शिरवळ व सासवड परत मिळविले होते. म्हणजे प्रतापगडावर काहीही झाले तरी ह्या तीन जागा घेण्याचे आदेश आधीच सुटले होते व त्याहून महत्वाचे म्हणजे ते आदेश पाळले गेले होते.
अफजलखान वाईला आला तेव्हा प्रतापगड हा शिवरायांच्या राज्याच्या दक्षिण सीमेवर होता. तिथून ते पन्हाळगडाचा भाग शिवरायांनी अफजलवधानंतर केवळ १८ दिवसात मिळवला. हा पराक्रम अतुलनीयच म्हटला पाहिजे पण त्यापुढे जाऊन शिस्तबद्ध योजनेशिवाय अशक्य होता असेही म्हणावे लागेल.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८

