कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १८०


सांभार : मराठा साम्राज्यकोश

नेताजीच्या वादळी हलचाली
कोल्हापूरच्या युद्धानंतर नेताजीने आदिलशाही भागात खोलवर छापे घातले. अनपेक्षित असलेल्या ह्या आक्रमणांने आदिलशाहीला स्तंभित केले. नेताजीला थांबवू शकणारा कुठलाही सरदार ते पुढे करु शकले नाहीत. नेताजीने कर्नाटकातील महत्वाची व्यापारी नगरे लुटली. जास्तीजास्त लूट कशी मिळवता येईल हे त्याच्या छाप्याचे मुख्य लक्ष्य होते. स्वराज्य प्राप्तीसाठी हा उपक्रमही अत्यंत महत्वाचा होता.
नेताजीने मिरज, सांगली, गोकक, गदग, दुदवाड, कुरुंदवाड, रायबाग, हुकेरी, अथणी, धारवाड व अशी छत्तीस नगरे लुटली. विजापुरापासून फक्त तीस किमीवर असलेले तिकोटा देखिल त्याने लुटून फस्त केले. अत्यंत वेगवान व कमी वेळात केलेल्या ह्या छाप्यात दक्षिणेत त्याने थेट लक्षमेश्वरपर्यंत धडक मारली.
त्याच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या की आदिलशाही सैन्याला त्याचा पाठलाग करणे अवघड होते. तिकोट्यावरचा हल्लातर दख्खनमधील आदिलशाहीच्या अधिपत्यावर झालेला मोठ्या आघात होता. छाप्यानंतर नेताजी पुन्हा पन्हाळ्यावर शिवरायांना भेटायला गेला. त्याला फक्त तेरदळ परगण्यात थोडा प्रतिकार झाला. तिथे त्याला कृष्णगौडा देसाई पुढे माघार घ्यावी लागली.
ह्या महत्वाकाक्षी पण यशस्वी धाडींनी आदिलशाही भागात प्रचंड खळबळ माजविली. शिवाजी राजा हा आदिलशाहीच्या सामर्थ्यासमोर एका मोठ्या प्रश्नचिन्हासारखा उभा राहिला.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.