अफझलखानच्या मोहिमेचे पूर्वसूत्र
सन १६५६ मधले शिवरायांचे जावळीवरील आक्रमण पुढच्या आदिलशाही भागावरच्या
चालींचे सुतोवाच होते. आदिलशाहीला महत्वाचा असलेला कोंढाणाही त्याने परत
घेतला. ह्या सगळ्यामुळे एखादे आदिलशाही वावटळ शिवरायांवर येणार हे उघड
होते.
आदिलशाहीचे मुघलांबरोबरचे युद्ध तीन वर्ष चालले होते. आग्र्याकडे जाताना औरंगजेबने ४ एप्रिल १६५८ ला नर्मदा ओलांडली. लगेच आदिलशाहीत अंतर्गत कलह सुरू झाला व शेवटी डिसेंबर १६५८ च्या सुमारास तो शमला. ह्या सगळ्यानंतर शिवरायांकडे लक्ष द्यायला आदिलशाहला वेळ झाला.
शाहजी राजांनी शिवरायांच्या कारवायांचे उत्तरदायित्व घेण्याचे नाकारल्यावर ह्या मोहिमेवर शिक्कामोर्तब झाला असावा. शाहजी राजांचा शिवरायांना पाठींबा असावा पण ते आदिलशाहीत नोकरीस असल्याने त्यांना ते उघडपणे व्यक्त करणे शक्य नव्हते. जे काही असो, आदिलशाहने शाहजी राजांना शिवरायांच्या कारवायांसाठी दोषी ठरविले नाही असे २७ मार्च १६५९ च्या एका पत्रातून दिसते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८८३-८८५
आदिलशाहीचे मुघलांबरोबरचे युद्ध तीन वर्ष चालले होते. आग्र्याकडे जाताना औरंगजेबने ४ एप्रिल १६५८ ला नर्मदा ओलांडली. लगेच आदिलशाहीत अंतर्गत कलह सुरू झाला व शेवटी डिसेंबर १६५८ च्या सुमारास तो शमला. ह्या सगळ्यानंतर शिवरायांकडे लक्ष द्यायला आदिलशाहला वेळ झाला.
शाहजी राजांनी शिवरायांच्या कारवायांचे उत्तरदायित्व घेण्याचे नाकारल्यावर ह्या मोहिमेवर शिक्कामोर्तब झाला असावा. शाहजी राजांचा शिवरायांना पाठींबा असावा पण ते आदिलशाहीत नोकरीस असल्याने त्यांना ते उघडपणे व्यक्त करणे शक्य नव्हते. जे काही असो, आदिलशाहने शाहजी राजांना शिवरायांच्या कारवायांसाठी दोषी ठरविले नाही असे २७ मार्च १६५९ च्या एका पत्रातून दिसते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८८३-८८५

