सांभार : मराठा साम्राज्यकोश
अफझलवधानंतर शिवरायांची वेगवान चाल
अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यावर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजीला भेटले . नेताजीला त्यांनी आदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्दी हिलाल हे आदिलशाहीतून फुटलेले सरदार त्याला मिळाले.
दख्खनच्या पठारावरुन दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन गडांना वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले .
कोल्हापूरही सहजपणे जिंकून घेतले व राजे पन्हाळ्याकडे वळले . गडावर वेढ्याची काहीच तयारी केली नव्हती. बहुदा त्यांना शिवरायांच्या मृत्यूची किंवा फारतर तहाची अपेक्षा होती. अफजलखानचा मृत्यू व नंतरच्या शिवरायांच्या चालीने गडावरचे लोक गलितगात्र झाले.
केवळ दोन दिवसात पन्हाळगडासारखा मोठा गड शिवरायांनी जिंकून घेतला. शिवभारत सांगते की आतील सैन्याने तोफांनी, बाणांनी व छोट्या हत्यारांनी प्रतिकार केला. पण शिवरायांचे लोक तटापर्यंत पोहोचले व दोऱ्या लावून तटावरुन आत गेले. २८ नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी पन्हाळगड घेतला. तेव्हा अफजलखानाच्या वधाला फक्त आठरा दिवस झाले होते.
इतक्या कमी वेळात शिवरायांनी प्रतापगडापासून पन्हाळगडापर्यंतची ठाणी जिंकून घेतली. इथे हेही सांगणे आवश्यक आहे की जेव्हा अफजलखानाने आक्रमण केले होते त्यावेळी प्रतापगड हा शिवरायांच्या मुलुखाच्या सीमेवर होता. आदिलशाही वावटळापासून त्यांना त्याच्या रयतेचे रक्षण करायचे होते हे त्यातून स्पष्ट होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९४३-९४७
अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यावर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजीला भेटले . नेताजीला त्यांनी आदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्दी हिलाल हे आदिलशाहीतून फुटलेले सरदार त्याला मिळाले.
दख्खनच्या पठारावरुन दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन गडांना वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले .
कोल्हापूरही सहजपणे जिंकून घेतले व राजे पन्हाळ्याकडे वळले . गडावर वेढ्याची काहीच तयारी केली नव्हती. बहुदा त्यांना शिवरायांच्या मृत्यूची किंवा फारतर तहाची अपेक्षा होती. अफजलखानचा मृत्यू व नंतरच्या शिवरायांच्या चालीने गडावरचे लोक गलितगात्र झाले.
केवळ दोन दिवसात पन्हाळगडासारखा मोठा गड शिवरायांनी जिंकून घेतला. शिवभारत सांगते की आतील सैन्याने तोफांनी, बाणांनी व छोट्या हत्यारांनी प्रतिकार केला. पण शिवरायांचे लोक तटापर्यंत पोहोचले व दोऱ्या लावून तटावरुन आत गेले. २८ नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी पन्हाळगड घेतला. तेव्हा अफजलखानाच्या वधाला फक्त आठरा दिवस झाले होते.
इतक्या कमी वेळात शिवरायांनी प्रतापगडापासून पन्हाळगडापर्यंतची ठाणी जिंकून घेतली. इथे हेही सांगणे आवश्यक आहे की जेव्हा अफजलखानाने आक्रमण केले होते त्यावेळी प्रतापगड हा शिवरायांच्या मुलुखाच्या सीमेवर होता. आदिलशाही वावटळापासून त्यांना त्याच्या रयतेचे रक्षण करायचे होते हे त्यातून स्पष्ट होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९४३-९४७
