सांभार : मराठा साम्राज्यकोश
अफझलखान भेटीची तयारी
उपलब्ध साधनांतून असे दिसते की शिवरायांचा अफजलखानच्या दुर्हेतूबद्दल जराही शंका नव्हती. त्यांनी स्वतःला व त्याच्या मावळ्यांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे चुकून जर शिवाजी राजा मारला गेला तरी अफजलखानाला सोडायचे नाही असेच त्याच्या सरदारांना सांगितले होते.
तेव्हा अंतःस्ते विचार कान्होजी जेधे व सरकारकडून बैसोन राजश्री स्वामींनी विचार केला की मुसलमान बेभान आहे. बांदलांचा जमाव जाउलीस व पाराच्या रानात राहणे. कदाश्चित भेटीचे समई त्याणे बेईमानी केली तरी त्याचे लस्कर पारात आहे ते डोंगरास चढू न देणे आणि निवडक माणूस घेऊन आपली मदत करणे. कदाश्चित श्री अंबेच्या वरदे अफजलखान मृत्यू पावला तरी इशारतीचे आवाज गडावरी होतील तेव्हा पारावरी चालून घेऊन अगदी लस्कर बुडवणे. हैबतराऊ व बाळाजी नाईक सिलिंबकर जमावानिसी बोचेघोळीचे घाटी ठेविले आहेत. ते घाट लस्करास चढू देणार नाहीत. यैसा अंतःस्ते विचार जाला आणि बंदोबस्ती केली.
जेधे शकावली
अफजलखान जावळीत पोहोचल्यानंतर शिवरायांनी परतीचे ठरलेल्या मार्गांवर आपली माणसे जंगलात दडवून ठेवली. अफजलखानाच्या सैन्यापासून व हेरांपासून सावध राहण्याचे आदेश त्यांना दिले होते. बांदलांना त्यांची माणसे घेऊन पार गाव व जावळीजवळ पार घाट रोखून धरायला सांगितले होते. हैबतराव व बाळाजी नाईक सिलिमकरांना बोचेघोळीचा घाट आडवायला सांगितले होते. शिवरायांना काही अपाय होता आदिलशाही सैन्याला घाट चढून वर न जाऊ देणे असेच आदेश होते.
गडावरून तोफेचा इशारा होताच आदिलशाही सैन्यावर हल्ला करण्याचा आदेश होता. जावळीहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या सर्व वाटा शिवरायांनी बंद केल्या होत्या. अफजलखानला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच कल्पना नसावी. तो शिवरायांच्या फासात अगदी बेसावधपणे फसला होता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
उपलब्ध साधनांतून असे दिसते की शिवरायांचा अफजलखानच्या दुर्हेतूबद्दल जराही शंका नव्हती. त्यांनी स्वतःला व त्याच्या मावळ्यांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे चुकून जर शिवाजी राजा मारला गेला तरी अफजलखानाला सोडायचे नाही असेच त्याच्या सरदारांना सांगितले होते.
तेव्हा अंतःस्ते विचार कान्होजी जेधे व सरकारकडून बैसोन राजश्री स्वामींनी विचार केला की मुसलमान बेभान आहे. बांदलांचा जमाव जाउलीस व पाराच्या रानात राहणे. कदाश्चित भेटीचे समई त्याणे बेईमानी केली तरी त्याचे लस्कर पारात आहे ते डोंगरास चढू न देणे आणि निवडक माणूस घेऊन आपली मदत करणे. कदाश्चित श्री अंबेच्या वरदे अफजलखान मृत्यू पावला तरी इशारतीचे आवाज गडावरी होतील तेव्हा पारावरी चालून घेऊन अगदी लस्कर बुडवणे. हैबतराऊ व बाळाजी नाईक सिलिंबकर जमावानिसी बोचेघोळीचे घाटी ठेविले आहेत. ते घाट लस्करास चढू देणार नाहीत. यैसा अंतःस्ते विचार जाला आणि बंदोबस्ती केली.
जेधे शकावली
अफजलखान जावळीत पोहोचल्यानंतर शिवरायांनी परतीचे ठरलेल्या मार्गांवर आपली माणसे जंगलात दडवून ठेवली. अफजलखानाच्या सैन्यापासून व हेरांपासून सावध राहण्याचे आदेश त्यांना दिले होते. बांदलांना त्यांची माणसे घेऊन पार गाव व जावळीजवळ पार घाट रोखून धरायला सांगितले होते. हैबतराव व बाळाजी नाईक सिलिमकरांना बोचेघोळीचा घाट आडवायला सांगितले होते. शिवरायांना काही अपाय होता आदिलशाही सैन्याला घाट चढून वर न जाऊ देणे असेच आदेश होते.
गडावरून तोफेचा इशारा होताच आदिलशाही सैन्यावर हल्ला करण्याचा आदेश होता. जावळीहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या सर्व वाटा शिवरायांनी बंद केल्या होत्या. अफजलखानला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच कल्पना नसावी. तो शिवरायांच्या फासात अगदी बेसावधपणे फसला होता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
