सांभार : मराठा साम्राज्यकोश
अफझलखान जावळीस पोहोचतो
सध्याचा पाचगणी मार्गे जाणारा पसरणीचा घाट तेव्हा वापरत नसत. त्यावेळी आदिलशाही सैन्याने तायघाटातून वर येत महाबळेश्वर गाठले व रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाकडे वळले. हा सगळा परिसर आजही पूर्ण जंगलमय आहे त्यामुळे तेव्हा काय परिस्थिती असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. आदिलशाही सैन्याला त्यांच्या तोफा, हत्ती व सामान-सुमान नेताना अनंत हाल झाले असणार हे निश्चित.
अफजलखानाला त्या दिव्यातून जात शेवटी जावळीला पोहोचल्यावर निश्चितच आनंद झाला असेल. त्याने जावळीतून वाहणाऱ्या कोयनेच्या बाजूला तळ ठोकला. शिवरायांनी त्याच्याकडे वकील पाठवला व औपचारीक चौकशी केली. अफजलखाननेही त्याला प्रतिसाद दिला. बहुदा ह्या वेळेपर्यंत आपण न लढताच जावळी घेतली अशी त्याची समज झाली असावी.
मग शिवरायांनी आदिलशाहच्या सैन्यातील जवाहिऱ्यांना बोलावणे धाडले. त्यांच्याकडील दाग-दागीने विकत घेऊन अफजलखानाच्या सरदारांना नजराणे देण्यासाठी हा खटाटोप असावा असे समजून ते जवाहिर प्रतापगडावर गेले. शिवरायांनी त्यांना सगळा माल विकत घेण्याचे आश्वासन दिले व गडावरच त्यांची राहायची सोय केली.
त्या बिचाऱ्या जवाहिऱ्यांना स्वप्नातही जाणवले नसेल की ते घनदाट अरण्याने वेढलेल्या एका कडेकोट अशा गडावर बंदिस्त झाले होते. त्यानंतर भेटीचा दिवस व वेळ ठरली - १० नोव्हेंबर १६५९.
अफजलखान त्याच्या दोन-तीन अंगरक्षकांसमवेत भटीच्या जागी पोहोचेल असे ठरले. त्याचे दहा सैनिक भेटीच्या जागेपासून बाणाच्या अंतरावर थांबतील असेही ठरले. शिवरायांना तेच नियम होते फरक इतकाच की ते भेटीच्या जागी गडावरून खाली येणार होते .
उपलब्ध साधनातून असे दिसते की दख्खनमधल्या लहान-मोठ्या अशा सर्व लोकांचे लक्ष शिवाजी राजा - अफजलखाना युद्धाकडे होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९२१-९२७
सध्याचा पाचगणी मार्गे जाणारा पसरणीचा घाट तेव्हा वापरत नसत. त्यावेळी आदिलशाही सैन्याने तायघाटातून वर येत महाबळेश्वर गाठले व रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाकडे वळले. हा सगळा परिसर आजही पूर्ण जंगलमय आहे त्यामुळे तेव्हा काय परिस्थिती असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. आदिलशाही सैन्याला त्यांच्या तोफा, हत्ती व सामान-सुमान नेताना अनंत हाल झाले असणार हे निश्चित.
अफजलखानाला त्या दिव्यातून जात शेवटी जावळीला पोहोचल्यावर निश्चितच आनंद झाला असेल. त्याने जावळीतून वाहणाऱ्या कोयनेच्या बाजूला तळ ठोकला. शिवरायांनी त्याच्याकडे वकील पाठवला व औपचारीक चौकशी केली. अफजलखाननेही त्याला प्रतिसाद दिला. बहुदा ह्या वेळेपर्यंत आपण न लढताच जावळी घेतली अशी त्याची समज झाली असावी.
मग शिवरायांनी आदिलशाहच्या सैन्यातील जवाहिऱ्यांना बोलावणे धाडले. त्यांच्याकडील दाग-दागीने विकत घेऊन अफजलखानाच्या सरदारांना नजराणे देण्यासाठी हा खटाटोप असावा असे समजून ते जवाहिर प्रतापगडावर गेले. शिवरायांनी त्यांना सगळा माल विकत घेण्याचे आश्वासन दिले व गडावरच त्यांची राहायची सोय केली.
त्या बिचाऱ्या जवाहिऱ्यांना स्वप्नातही जाणवले नसेल की ते घनदाट अरण्याने वेढलेल्या एका कडेकोट अशा गडावर बंदिस्त झाले होते. त्यानंतर भेटीचा दिवस व वेळ ठरली - १० नोव्हेंबर १६५९.
अफजलखान त्याच्या दोन-तीन अंगरक्षकांसमवेत भटीच्या जागी पोहोचेल असे ठरले. त्याचे दहा सैनिक भेटीच्या जागेपासून बाणाच्या अंतरावर थांबतील असेही ठरले. शिवरायांना तेच नियम होते फरक इतकाच की ते भेटीच्या जागी गडावरून खाली येणार होते .
उपलब्ध साधनातून असे दिसते की दख्खनमधल्या लहान-मोठ्या अशा सर्व लोकांचे लक्ष शिवाजी राजा - अफजलखाना युद्धाकडे होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९२१-९२७
