सांभार : मराठा साम्राज्यकोश
अफझलखान व शिवरायांचा पत्रव्यवहार
अफजलखान जेव्हा वाईला पोहोचला तेव्हा शिवाजी राजे प्रतापगडावर होते . वाईचा हवालदार कृष्णाजी भास्कर ह्याला अफजलखानचा वकील म्हणून नेमण्यात आले. शिवरायांच्या बाजूने गोपीनाथपंताने वकीलीचे काम केले. आदिलशाहीविरुद्ध त्याच्या कारवायांची आठवण करून देणारे पत्र अफजलखानने शिवरायांना लिहीले.
शिवरायांनी त्याला मनापासून क्षमायाचना करणारे उत्तर लिहीले. अफजलखान जर त्याला भेटायला प्रतापगडावर आला तर मिळविलेले सर्व भाग व किल्ले आदिलशाहीला सुपूर्त करण्याचे त्याने मान्य केले. अफजलखानाबद्दल नितांत आदर व्यक्त करत शिवरायांनी त्याच्या थोर पराक्रमांचे कौतुकही केले.
उपलब्ध साधनांतून असे दिसते की अफजलखानने शिवरायांना त्याने मिळवलेले भाग आदिलशाहीकडून जाहगीर म्हणून मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने शिवरायांना वाईला भेटायचा आदेशही दिला. शिवरायांनी अफजलखानला पुन्हा लिहीले की वाईला त्याला भेटण्याची भिती वाटत असल्याने अफजलखानने प्रतापगडावर येऊन त्याला भेटावे.
शिवरायांच्या कळकळीच्या विनंत्या व त्याने व्यक्त केलेली भिती ह्यामुळे शेवटी अफजलखानने जावळीस जाऊन शिवरायांची भेट घेण्याचे मान्य केले. त्याच्या काही सरदारांनी अफजलखानला ह्या आत्मघातकी निर्णयापासून परावृत करण्याचा प्रयत्नही केला. शिवरायांचा हेतु स्वच्छ असेल तर तो स्वतः वाईला येऊन अफजलखानची भेट का घेत नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्याबरोबरच शिवाजी राजा जर अफजलखानाला जावळीत बोलावतो आहे तर त्यामागे त्याचा काहीतरी मोठा डाव असावा हे सुद्धा त्यांनी ताडले.
जावळीचा भाग दाट अरण्याचा होता व हत्ती-घोडे व तोफा घेऊन तिथून जाणे म्हणजे महामुश्किल होते. पण तरीही अफजलखानने त्याचा निर्णय बदलला नाही. त्याने काही हत्ती, घोडे व काही मुल्यवान वस्तू वाईलाच मागे ठेवायचे ठरविले.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९२१-९२७
अफजलखान जेव्हा वाईला पोहोचला तेव्हा शिवाजी राजे प्रतापगडावर होते . वाईचा हवालदार कृष्णाजी भास्कर ह्याला अफजलखानचा वकील म्हणून नेमण्यात आले. शिवरायांच्या बाजूने गोपीनाथपंताने वकीलीचे काम केले. आदिलशाहीविरुद्ध त्याच्या कारवायांची आठवण करून देणारे पत्र अफजलखानने शिवरायांना लिहीले.
शिवरायांनी त्याला मनापासून क्षमायाचना करणारे उत्तर लिहीले. अफजलखान जर त्याला भेटायला प्रतापगडावर आला तर मिळविलेले सर्व भाग व किल्ले आदिलशाहीला सुपूर्त करण्याचे त्याने मान्य केले. अफजलखानाबद्दल नितांत आदर व्यक्त करत शिवरायांनी त्याच्या थोर पराक्रमांचे कौतुकही केले.
उपलब्ध साधनांतून असे दिसते की अफजलखानने शिवरायांना त्याने मिळवलेले भाग आदिलशाहीकडून जाहगीर म्हणून मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने शिवरायांना वाईला भेटायचा आदेशही दिला. शिवरायांनी अफजलखानला पुन्हा लिहीले की वाईला त्याला भेटण्याची भिती वाटत असल्याने अफजलखानने प्रतापगडावर येऊन त्याला भेटावे.
शिवरायांच्या कळकळीच्या विनंत्या व त्याने व्यक्त केलेली भिती ह्यामुळे शेवटी अफजलखानने जावळीस जाऊन शिवरायांची भेट घेण्याचे मान्य केले. त्याच्या काही सरदारांनी अफजलखानला ह्या आत्मघातकी निर्णयापासून परावृत करण्याचा प्रयत्नही केला. शिवरायांचा हेतु स्वच्छ असेल तर तो स्वतः वाईला येऊन अफजलखानची भेट का घेत नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्याबरोबरच शिवाजी राजा जर अफजलखानाला जावळीत बोलावतो आहे तर त्यामागे त्याचा काहीतरी मोठा डाव असावा हे सुद्धा त्यांनी ताडले.
जावळीचा भाग दाट अरण्याचा होता व हत्ती-घोडे व तोफा घेऊन तिथून जाणे म्हणजे महामुश्किल होते. पण तरीही अफजलखानने त्याचा निर्णय बदलला नाही. त्याने काही हत्ती, घोडे व काही मुल्यवान वस्तू वाईलाच मागे ठेवायचे ठरविले.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९२१-९२७

