कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६६


सांभार : मराठा साम्राज्यकोश

मोहिमेतल्या सुरूवातीच्या चाली
मोहिमेच्या सुरुवातीला आदिलशाहकडून मावळातल्या देशमुख-पाटलांना फर्मान मिळाले होते. कान्होजी जेधे रोहिडखोऱ्यातील भोरचे देशमुख होते. त्यांना १६ जून १६५९ तारखेचे एक फर्मान मिळाले. अशीच फर्माने मावळातील इतर देशमुखांना मिळाली होती.
अफजलखानने त्याच्या सैन्याला काही ठिकाणे जिंकण्यासाठी धाडले होते. त्याप्रमाणे जाधवांनी सुपे, पांढऱ्यांनी शिरवळ, खराड्यांनी सासवड, सिद्दी हिलालने पुणे आणि सैफखान हबशीने कोकण जिंकून घेतले. अशा प्रकारे अफजलखानने शिवरायांवर जणू फास अवळला होता. शिवरायांनी नेजाजी पालकरला आदिलशाही मुलुख लुटण्यासाठी पाठवले होते. शिवरायांना थेट युद्ध टाळायचे होते त्यामुळे त्याने अफजलखानच्या कुठल्याही आक्रमणाचा फारसा प्रतिकार केला नाही.
अफजलखाननेही मावळातल्या देशमुखांना पत्रे धाडली. कान्होजी जेधेच्या मुलाला लिहीलेले त्याचे पत्र उपलब्ध आहे. त्याने शिवाजी जेधेला त्याच्या सैन्यात मानाचे पद देऊ केले होते. पण त्याआधीच कान्होजी त्याच्या पाच मुलांना घेऊन शिवरायांकडे गेला होता. उत्रवळी तरफेतले केदारजी व खंडोजी खोपडे हे दोघे मात्र अफजलखानकडे गेले.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९१२-९२१
शिवभक्त विनोद जाधव's photo.