कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०४

 संभाजीराजांचे बोट धरून चालत येणारे रामराजे, जिजाऊ थकल्या नजरेनेच पण कौतुकाने बघू लागल्या. त्या मनोमन म्हणाल्याही " असेच रहा. रामभरतासारखे!' - “राजे, यांना कशाला त्रास देता ? " वैद्यांकडे बघत जिजाऊंनी विचारले. " आईचं करताना मुलाला त्रास कसला ? " वैद्यांनी त्यांना धीर द्यायचा यत्न केला.


मंचकावर टेकून महाराजांनी जिजाऊंचा हात हाती घेतला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या संभाजीराजे आणि रामराजांनी मंचकावर बसावे म्हणून जिजाऊंनी हात थोपटून खूण दिली. संभाजीराजांनी उचलून रामराजांना मंचकावर ठेवले. जिजाऊंचा थरथरता हात रामराजांच्या पाठीवरून फिरू लागला. शांत आवाजात त्या म्हणाल्या, “बाळराजे, दादामहाराजांचे धरले बोट सोडू नका.' “मासाहेब, कसं वाटतंय ? जिजाऊ आपणाला टाळू बघताहेत हे जाणून


"महाराजांनी विचारले. 'आता काय वाटायचं राजे ? आम्ही वाटण्याच्या पलीकडे गेलोत. या सान्यांना नजरभर बघून बरं वाटतं.” जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. "राजे, एक वाटतं.” जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. " आज्ञा मासाहेब.” महाराजांनी त्यांचा हात मायेने थोपटला.


"आम्हास आम्हास आईचा गोंधळ ऐकावा वाटतो! " - महाराज चरकल्या नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिले. मग त्यांनी मोरोपंतांना नजर दिली. तिचा इशारा ओळखून पंत गोंधळ्यांना निरोप धाडण्यासाठी बाहेर पडले. औषधी पोतडी खोलून वैद्यांनी नाना प्रकारच्या मात्रा जोडल्या.


रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला. आपल्या हाताने जिजाऊंनी जमल्या गोंधळ्यांना पानविडा आणि वस्त्रे दिली. ती पाजळून गोंधळ्यांनी नमन घरले.. त्यांचा म्होरक्या उदासवाण्या आबाजीत आईचा महिमा गाऊ लागला.


" उदर परडी देऊन हाती- ब्रह्मांडी फिरवी. लक्ष चौऱ्याऐशी घरची भीक्षा मागविली बरवी- ज्या ज्या घरी मी भीक्षा केली - ते ते घर रुचले ! आदिशक्तीचे कवतुक मोठे भुत्या मज केले. 


ते ऐकताना जिजाऊंचे पाय चेपणाऱ्या संभाजीराजांचे डोळे झरझरू लागले. राजांच्या गळ्यात दम्यासारखी दाटण झाली. जिजाऊ मात्र डोळे मिटून शांत पडून होत्या. बाहेर वाड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या गजरात संबळ तुणतुण्याचे सूरसाद क्षीण होत विरून जात होते.


ज्येष्ठ वद्य नवमीची काळरात्र पाचाडच्या वाड्याभोवती घिरट्या घालू लागली. बाहेर पावसाची रपरप धुडगूस घालीत होती. आत दरुणीमहालात मायेच्या मंचकाभोवती जमलेली मने चिंतेने कळंजली होती. आऊसाहेबांच्या हट्टी दम्यासमोर मात्रा हरल्या होत्या, काढे कंटाळले होते, वनस्पती वरमल्या होत्या. खोकून खोकून फासळी फासळी खिळखिळी झालेल्या जिजाऊंचा डोळा लागला होता. त्यांची झोपमोड होईल म्हणून हाती धरलेला त्यांचा हात तसाच ठेवून संभाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारीच महाराज आणि रामराजे टेकले होते...


मोरोपंत, आण्णाजी, चांगोजी, हंबीरराव, अंतोजी, रायाजी साऱ्या जिव्हाळ्याच्या माणसांचे मंचकाला कडे पडले होते. मंचकाच्या उशालगतीला पुतळाबाई, येसूबाई, धाराऊ, सोयराबाई असा स्त्रीवसा चिंतावल्या डोळ्यांनी उभा होता.


बाहेर घोंघावणाऱ्या पावसाळी वाऱ्यांचा झपकारा मधूनच महालात घुसला. चिराखदाने आणि समयांच्या ज्योती त्याने अंगभर थरथरल्या. त्यांच्या धरथरत्या उजेडाबरोबर आतले मननू मन नको त्या शंकेने चरकून उठले. मधरात्रीचा सुमार झाला. "राजे ऽ" मंचकावरून दमादाटली क्षीण साद आली.


जी." महाराज पुढे झुकले. " तीर्थ द्या. गंगेचं." दमा निर्धारी झाला. " तुळशीपत्रही आणा.'


महाराज उठले. देव्हाऱ्यात ठेवलेली गंगाजलाची तीर्थकुपी आणि तुळशीपत्र घेऊन पुन्हा मंचकाजवळ आले. पळीने त्यांनी गंगोदक मासाहेबांच्या ओठांत सोडले. त्यांच्या हातीचे सोनकडे थरथरले. मासाहेबांच्या ओठांत तुळशीपत्र देताना उभा रायगडच उचलून कुणीतरी आपल्या छातीवर ठेवला आहे असे त्यांना वाटले.


मासाहेबांच्या सेवेत सर्वांत शेवटी रुजू होऊन गंगाजल आणि तुळशीपत्र पावन झाले ! "शिवबा, जवळ या." तुळशीपत्राआडून सावळे, निर्बंध बोल आले.


महाराज पुढे झाले.


" हात द्या." कधी नव्हे ते, मानी स्त्री खानदान राजांच्याकडे मागणे घालीत होते.. महाराजांनी सोनकड्याचा हात जिजाऊंच्या कंकणे घरंगळणाऱ्या हाती दिला. " शिवबा, आम्ही तुमच्याकडे कधी काही मागणं टाकलं नाही. आज टाकतो


आहोत. आम्हास आण द्या.


“मासाहेब आज्ञा व्हावी -" राजांची छाती दाटून आली. -


“शिवबा , शिवबा, आमच्या शंभूराजांच्या आऊ आता तुम्ही व्हा! आम्ही वचनात आहोत थोरल्या सूनबाईच्या. ते तडीस लाव."


ते ऐकताना संभाजीराजांच्या मनाचा बांध बांध फुटला. हाती धरलेला जिजाऊंचा हात गदगदून हलवून ते मुसमुसत म्हणाले, “आऊसाहेब तुम्ही... तुम्ही हव्यात

आम्हाला, आमच्या महाराजसाहेबांना.' "


"शंभूराजे, शांत व्हा. तो ऋणबंध सरला. एक नीट ऐका. तुम्ही तुम्ही आमच्या - स्वारीसारखेच दिसता. पण पण ते जसे आम्हास पारखे झाले तसे तुम्ही कधी येसूबाईंना - होऊ नका !

'राजे, आम्ही सारं बघितलं. फक्त एक राहून गेलं. आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेलं बघण्याचं! ते करा. आणि आणि जीवावरच्या साकड्यात आता स्वतःला कधी गुंतवून घेऊ नका. तुमच्यासाठी जगदंबेच्या पायाशी धरणं घरायला आता कुणी उरलं नाही !"


ते ऐकताना नाकगड्डा चिमटीत धरलेल्या राजांचा टोप डावा उजवा हिंदकळला. त्यांच्या पोटात पोकळीचा खड्डा पसरला. शब्द थरथरले - " माऽसा ऽ हे ऽब!" "राजे, केशवपंडितांना बोलवा. आम्हास समर्थांचा बोध ऐकवा !"


बाहेर पाचाडभर ऐन मध्यरात्र हट्टी धरणे धरून बसली. मेटामेटावरचे पहारेकरी एकमेकांच्या हाती बदलत्या पहाऱ्यांचे भाले देताना गस्त घालू लागले - " मेटकरी हुश्या र!" वाड्याच्या छतावर मावळी पाऊस दाभणधारेनं कोसळतच होता. केशव पंडितांनी अडंगीच्या बैठकीवर दासबोध मांडून चौरंगावर बैठक घेतली. त्यांना बोध दिसावा म्हणून धाराऊने अडंगीजवळ तेवती समई ठेवली.


केशवपंडितांच्या तोंडून समर्थांचे बैरागी शब्द थरथरत बाहेर पडू लागले- 'सरतां संचिताचे शेष। नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां न भरतां निमिष जाणे लागे ॥


गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळाचे।


गेले बहुतां कुळांचे। कुळवंत राजे ॥ बहुतां जन्माचा सेवट । नरदेह सांपडे अवचट ।


येथ वर्तावे चोखट नीतिन्यायें ॥


काया बहुत कष्टवावी। उत्कट कीर्ति उरवावी । चटक लावुनी सोडावी काही एक ॥


पंडितांची जवान थरथरू लागली. शब्दाशब्दांबरोबर भवतीची मने थिजू लागली.


चिराखदानांच्या ज्योती थरथरू लागल्या.


'जीव जीवांत घालावा। आत्मा आत्म्यांत मिसळावा ।


राह राहो शोध घ्यावा 51 परांतराचा ॥


केशव पंडितांचा हात कापू लागला. डोळ्यांच्या कडा दाटून आल्या. एक एक शब्द त्यांच्या दाटल्या गळ्यातून घोगरत बाहेर पडू लागला-


'सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट


येथ सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन ॥


" पंडित, नको ऽ, वाचू नका 5. संभाजीराजांच्या या कळवळत्या बोलांनी केशवपंडितांच्या पापण्यांवर थरारलेले अश्रूंचे थेंब हातीच्या पानावर टपटपले! त्यांना वाचवेना. कुणालाच काही बोलवेना.

ना छत्रपती शिवाजीमहाराजांना, ना युवराज संभाजीराजांना, महालातील कुणालाच कल्पना नव्हती की मिटल्या डोळ्यांच्या जिजाऊंनी आत्मा केव्हाच आत्म्यात घातला होता. देहभान हरपलेल्या, माणसांच्या जगापार गेलेल्या, लोकमाता जिजाऊसाहेबांच्या जीवज्योतीला प्रकाशच प्रकाश दिसत होता शेवटचा प्रकाश.


होय! साक्षात अष्टभुजा, शस्त्रधारी, वाघावर आरूढ झालेली जगदंबाच त्यांच्या रोखाने येत होती! वाजत-गाजत, तिच्या समोर डोर-चोळणा घातलेला, छातीवर कवड्यांच्या माळाच माळा मिरविणारा, भंडाऱ्याने मळवट भरलेला, हाती पोत नाचविणारा भुत्यांचा सरंजामी तांडाच तांडा "उदंऽ उदं ऽ" गर्जत येत होता!


ती 'भवानी यात्रा' थेट जिजाऊंच्या समोर येऊन थांबली. वाद्यांचा गलका विरला. वाघावर बसल्या जगदंबेने जिजाऊंच्या रोखाने आठी हात पसरले! भुत्यांनी बेहोष उदोकार दिला- "उदं उदं ऽ".


देहाच्या सिंहासनावरून खंबीर जिजाऊ उठल्या! त्यांनी भगवा पदरकाठ ठाकेठीक केला. जगदंबेच्या डोळ्यांना डोळे जोडून बरेच दिवस मनाच्या खोलवटात रुजून बसलेला एक जाब तिला त्यांनी खानदानी बोलीत विचारून घेतला -


'आम्हास वाटलं होतु तुम्हीच याल! पण वाटलं नव्हतं, तुम्ही अशा याल! वाटलं होतं तुम्ही येताना आपल्या संगती एक जीनकसला घोडा घेऊन याल ! त्याच्या रिकिबीत आमचाही पाय भरून फरफट करीत आम्हास तुमच्या दरबारी घेऊन जाल! जसं होदिगेरीच्या रानातून तुम्ही आमच्या स्वारीची शिकार करून त्यांना घेऊन गेला होतात तशा ! पण !! चला. आम्ही सिद्ध आहोत! "


राजे, संभाजीराजांसकट साऱ्यांना जिजाऊंच्या ओठांतून 'जगदंब ! जगदंब !' असे शब्द बाहेर पडताहेत असा भास झाला.


डुईवर सप्तनद्यांचे पवित्र जल घेतलेले छत्रधारी, अभिषिक्त राजे खऱ्या अर्थानि पोरके झाले ! छत्रधारी छत्रहीन ! राजांच्या डुईवरचे आऊपणाचे छत्र गेले... आणि आणि..... संभाजीराजांच्या ? जिजाऊंचा निष्प्राण झालेला, थंडगार हात गद्गदा हलवीत, उभ्या चेहऱ्याला इंगळ्याच इंगळ्या डसाव्यात तसे आक्रसल्या चर्येने, महाराजांच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत, संभाजीराजांनी मध्यरात्रीचे पाषाणकठोर काळीजही तडकेल असा हंबरडा फोडला-- आबा, आमच्या आऊसाहेब गेऽल्या ! 


पाठच्या भिंतीवर थडाथड गोंदले कपाळ बडवीत "मासाब, मासा 5 ब" म्हणत पाय गेलेली धाराऊ मटकन खालीच बसली. उठलेल्या आक्रोशाने शमादानांच्या ज्योतीन ज्योती थरथरल्या. जिजाऊंच्या निष्प्राण देहावर दुअंगाने डोके घुसळीत महाराज नि संभाजीराजे स्फुंदू लागले. बाहेर पाचाडभर फतेबाज मध्यरात्र सरत होती. थेंबाथेंबाने गळत होते !

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०३

 देकार सरला. दरबारी कलाकारांनी पवाडे, नृत्य, भजन यांच्या शेलक्या चिजा पेश केल्या. सर्वांत शेवटी व्रजकवी भूषण कमरशेला आवळून सिंहासनाच्या सामोरा आला. त्याची बिजलीवर मांड घेतलेली दिमडी धडबडू लागली. कानावर हात घेत त्याने राजांच्या कुलदेवाचे नमन धरले.


'जै जयंती जै आदि सकति-


जै चमुंड जै मुंड भंडासुर खंडिनी। जैसुक्त, जे रक्तबीज बिडाल बिहंडिनी ॥'


ते नमन ऐकताना राजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. डोळे मिटलेल्या संभाजीराजांना साक्षात अष्टभुजा दिसू लागली. दिमडी छळकत थडाडू लागली -


'दशरथ जू के राम, मैं वसुदेव के गोपाल ।


सोई प्रगटे साहि के, श्री सिवराज भुपाल ॥


सिव हि औरंग जिति सके, और न राजा राव। हदि मत्थ पर सिंह बिनु, और न पाले पाव ॥


औरस को जो जनम है, सो याको यक रोज औरस को राज है सो, सिर सरजा को मौज ॥


"भरल्या दरबारातून भूषणच्या ढंगदार शिवगौरवाला सहज दादी येऊ लागल्या. डोळे मिटलेला भूषण हात छताकडे उडवीत शब्दाचे पोतचे पोत नाचवू लागला-


'जीवन मैं नर लोग बडो, कवि भूषन भाषत पैज अडो है। है नर लोगन मैं राज बड़ों, सब राजनमें सिवराज बडो है ॥


को दाता ? को रन चढो ? को जग पालनहार ?


कवि भूषन उत्तर दिखो, सिव नृप हरि अवतार ॥ " युवराजपण विसरून संभाजीराजे हात उठवून कवी भूषणच्या तेजासी, रोमांचक रचनेला दाद देऊ लागले. चौकात मागे पाण्याची कारंजी उसळत होती. पुढे शब्दांची कारंजी उराळू लागली - राजांचे यश वर्णन करताना बेमान भूषण स्वतःला विसरला.


'तेरे तेज है सरजा दिनकरसो-दिनकर है तेरो तेज के निकर सो।। तेरो जस है सरजा हिमकर सो-हिमकर है तेरो जस के अकर सो ॥ कुंद कहीं, पयवृंद कहाँ, अरू चंद कहाँ- सरजा जस आगे ?


बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ तेरो साहस के आगे ?"

"व्वा ऽ!" भले." संभाजीराजांच्यातील कविमन दाद देऊन गेले. भूषण थांबला. घामाघूम झालेल्या भूषणसमोर सरपोसाने झाकलेले मोहरांचे तबक आले. राजे सिंहासनावरून उठले. संभाजीराजे सोनपायरीवर खडे झाले. सोयराबाईंनी राणीवसा सोडला. राजमंडळ गडदेव जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघाले. " श्रीमान् छत्रपति शिवाजीमहाराज की "ऽऽ


" जय ऽ जय जय !" जयकारांनी भोवतीचे झिरझिरे पडदे सळसळून उठले. राजमंडाळाच्या कदमा-कदमाबरोबर दुहातीची शेकडो इमानी मस्तके झुकू लागली. महामुजरे झडू लागले.


नगारखान्यासमोर राजयात्रेचा सरंजाम सिद्ध झाला होता. गळ्यात सोनेरी घाट किणकिणवीत, कानांच्या झापा फडफडविणारा, सोंड, गंडनाळ यावर रंगी नक्षी फिरलेला, उजव्या पायात चांदीचा तोडा भरलेला, पाठीवरच्या भरजरी झुलीवर देखणी, किरणांत झळझळती सोनअंबारी घेतलेला 'त्रिशूल' हत्ती 'राजऐरावत' म्हणून अलमस्तपणाने झुलत होता. त्याच्यासमोर पांढराशुभ्र, जातवान घोडा, आयाळीवर पिसांचा मोर्चेल मिरवीत, अंगी तलम झूल घेऊन, गळ्यात सोनकोयऱ्याची माळ आणि उजव्या पायात सोनतोडा मिरवीत लाभाचा 'राजअश्व' म्हणून उभा होता. नंग्या तलवारी हाती पेलून निवडीच्या पेहरावातील दरबारी मानकऱ्यांनी दुहाती शिस्त धरली होती. अब्दागिरे, निशाणबार्दार, चवरीवाले, गुर्झबे यांनी ऐरावताला कडे टाकले होते. माहुताने इशारा देत राजऐरावत बसता केला. त्याला शिडी लावण्यात आली. उजव्या हाती सुवर्णी अंकुश घेऊन फीलवान म्हणून सरलष्कर हंबीरराव प्रथम राजऐरावतावर आरूढ झाले. पाठोपाठ राजे व बाकीचे राजमंडळ ऐरावतावरील सोनअंबारीत स्थानापन्न झाले. सोनमोर्चेल घेऊन चढलेले मोरोपंत त्यांच्या पाठोशी वीरबैठकीत बसले.


हंबीररावांनी ऐरावताला अंकुशमार देऊन खडे केले. सुवर्णी फुले, गुलाल, पुष्पे ऐरावतावर उधळली जाऊ लागली. राजयात्रा निघाली. कुबेरी थाटात. लेझमाचे तांडे खेळीला पडले. रणहलग्या, ताशे तडतडू लागले. तोड्यांच्या बंदुका आणि जडशीळ उखळ्या दणाणू लागल्या. दांडपट्टे, फरीगदगा, बोथाट्या यांचे खेळगडी अंबारीतल्या राजमंडळाला आपले कसब दावण्यासाठी समोरच्या खेळगड्यावर इरेसरीने घालून घेऊ लागले. गुर्झबदार राजअल्काब देऊ लागले-


"राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित... " दाटल्या कंगणी पगड्यांचा ... लालदर्या सरकू लागला. त्या सरकत्या दर्यावर अंबारीच्या रूपाने वर आलेला, मावळी अभिमानाचा सूर्य बघून उगवतीला कासराभर वर चढलेला आभाळीचा सूर्यही क्षणभर श्वरथरला! लपकन कमरेत झुकला!! 'शिव' आणि 'शंभो शंकराच्या दर्शनाला निघाले. राजयात्रा जगदीश्वराच्या मंदिरासमोर आली.


एका बाजूला महाराणी सोयराबाई, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे घेऊन महाराज जगदीश्वराच्या चौकआवारात आले.

देवदर्शन करून राजयात्रा बालेकिल्ल्याकडे परतली. राजमंडळ जिजाऊंच्या खासेमहालाकडे निघाले. राजमातेच्या दर्शनासाठी.


"छत्रपती महाराज येताहेत.” वर्दी ऐकताना जिजाऊंचे सुरकुतलेले अंग रोमांचून थरले. त्यांच्या बैठकीच्या भवत्याने पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई उभ्या होत्या.


जिजाऊंच्या पायांवर डोके ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराजांनी गुडघे टेकले.. त्यांच्या बगलेने संभाजीराजांनी गुडघे टेकले. रायगडाएवढ्या उंच थोरल्या मायेसमोर त्यांनी मस्तक झुकविली. जिजाऊंच्या मिटल्या डोळ्यांतून सुटेलेले थेंब सुरकुत्यांना न जुमानता घरंगळले. महाराजांच्या राजटोपावर उतरले. झालेला अभिषेक पावन झाला !


जिजाऊ आशीर्वादासाठी बोलू बघत होत्या. शब्द फुटेना. उभे अंग थरथरू लागले. आठवणींच्या हजारो सुरकुत्या त्यांच्या मनी उलगडल्या होत्या. मन असंख्य विचारांच्या कल्लोळात होलपटू बघत होते. त्यांच्या पायांवर डोके ठेवून महाराज तसेच काही क्षण थांबले. कसल्यातरी निर्धारी विचाराने महाराजांनी मान वर घेतली. भरल्या डोळ्यांमुळे त्यांना जिजाऊ दिसतच नव्हत्या. महाराजांच्या दोन्ही हातांचे झोले मस्तकीच्या राजटोपाला भिडले. कुणाला कल्पना नसताना त्यांनी तो कीर्तिधवल राजटोप उतरून • सरळ जिजाऊंच्या पायांवर ठेवला! आणि तो ठेवताना त्यांचे उभे अंग गद्गद् लागले.


"शिवबा ऽ! " डोळे पदराने निपटून टाकीत जिजाऊसाहेबांनी लगबगीने तो टोप उचलला. महाराजांच्या मस्तकी पुन्हा चढवून त्यांना उठवून मिठीत घेताना कसल्याही आशीर्वादाऐवजी पुन्हा त्या एवढंच म्हणू शकल्या, "शिवऽ बा!"


जिजाऊंचा थरथरता हात महाराजांच्या पाठीवरच्या जरीकोयरीवर, उपरण्यावर फिरत राहिला. बाहेरून अत्यंत मूक वाटणारी पण आतून पार गलबलून आलेली ती राजमातेची आणि श्रीमंत योग्याची मिठी दोघांनाच नीटपणे कळू शकत होती. महाराजांनी खांद्याला लावलेल्या समर्थांच्या बैरागी कोदंडाला आणि आणि महाराज - जिजाऊंनी अंगाखांद्यावर खेळवून ऐन भरीत आणलेल्या संभाजीराजांना !!


राज्याभिषेकाचे उत्तरविधी आटोपले. आचार्य गागाभट्टांना सव्वालक्ष होनांची दक्षणा देऊन, पहायासाठी हत्यारबंद शिबंदी त्यांच्या दिमतीला जोडून महाराजांनी त्यांची गौरवी बोळवण केली.


राजमाता जिजाऊसाहेबांच्या महालीचा राबता वाढला. जेधे, बांदल, कंक, सिलिंबकर यांच्या जमेतीतील पगडीधारी मस्तके जिजाऊंच्या पायांना भिडू लागली. 'आऊसाहेब, येताव. तब्येतीला धरा. लई तापदरा करू नगासा आता. पाऊस धराय लागलाय. आमास्नी जाय पायजे. शेतीवाडी हाय. निगताव. गारठ्याला दम्याचं दुखणं दुनावतया. हतं न्हावू नगासा. खालतं पाचाडात जावा कसं." नितळ, भाबड्या, मावळी प्रेमभावनांच्या अभिषेकानं चिंब होऊन लोकमाता जिजाऊ निथळू लागल्या.

जमले मावळमाणूस चौवाटा पांगले. गड उलगला. मृगाची काळी छपरी आभाळाला घरून आली. पावसाळी चावरा वारा रायगडावर सूंकारत पिसाट घोंघावू लागला. झाडांचे डेरे पलट्या खाऊ लागले. बांधल्या झड्या उधळल्या. निकराने बसून असलेल्या जिजाऊंनी बिछायतीवर अंग टाकले. दम्याच्या धुसकान्यात त्यांच्या घशातील 'जगदंब " घुसमटू लागला. कांबळ्याच्या दोन दोन घड्या टाकल्या तरी अंगभर काटा उठू लागला. त्यांना गडावरून पाचाडात हलविणे भाग होते.


पडवेबंद मेणे जोडण्यात आले. हातजोड देत, शाल पांघरलेल्या जिजाऊंना महाराज आणि संभाजीराजे यांनी खासेमहालाबाहेर घेतले. पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सोयराबाई, रामराजे सारा गोतावळा त्यांच्या भवती दाटला होता. - 'राजे. आम्हास जरा दरवारीचौकात नेता ?” जिजाऊंच्या तोंडून शब्द आले.


'जी.” महाराज व युवराज यांचा दुहाती आधार घेत जिजाऊ चालू लागल्या.


जागजागी अगिषेकाच्या खुणा मिरविणारा, सजला दरबारी महाल आला. पूर्वाभिमुख, सुवर्णमंडित, रत्नजडावाच्या बत्तीसमणी सिंहासनासमोर उभ्या राहिलेल्या जिजाऊंचे उभे अंग थरथरले. डोळे भरून आले. म्हाताऱ्या उरात भावनांचा कल्लोळ दाटला. सिंहासनावरच्या मोतीलगाच्या छत्राकडे बघत जिजाऊ घोगरट आवाजात म्हणाल्या, " चला. राजे, तुमच्यावर छत्र आलं .... "


बालेकिल्ल्याच्या पालखीदरवाज्याने जिजाऊंचा मेणा मनोऱ्याबाहेर पडला. त्याच्या दोन्ही तर्कांना महाराज आणि संभाजीराजे पायी चालू लागले. पाठीमागून जनान्याचे सात-आठ मेणे चालले. ... जिजाऊ रायगड सोडून निघाल्या. मेण्याची काठाळी धरून चालताना संभाजीराजांच्या मनी विचार उठू लागले. "ही गडउताराची वाट कधीच सरू नये! पलीकडे महाराज, अलीकडे आम्ही. मेण्यात मासाहेब. ही चालणी अशीच राहावी! भोवी थकले तर त्यांच्या हातीचे थोपे आम्ही घेऊ, महाराज घेतील. मासाहेबांना धक्के बसणार नाहीत अशी तोलती चाल धरू !


* कधीतरी महाराज मासाहेबांना म्हणाले होते 'आम्ही आपला मान काय करावा? तो आमचा वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी चढविल्या तरी ते थिटेच आहे.' मासाहेब खोकू लागल्या की आमचाच जीव घोटाळणीला पडतो. खंत वाटते. त्यांचा दमा आम्हास घेता येत नाही.


'आता अभिषेक संपला. हा पावसाळा आम्ही पाचाडातच राहू मासाहेबांच्या पायांजवळ. आम्ही रचलेली काव्ये त्यांना ऐकवू. त्यांच्या धरल्या सांध्यांना मालिश देऊ. दम्याची उबळ तुटताच त्यांच्यासमोर तस्त धरू. धाप लागलेली असली तरीही त्या हसतच म्हणतील, 'हं. ऐकवा तुमची गीतं. आमच्या शिवबानं कधी गीतं रचली नाहीत. तेवढी वाण शंभूराजे तुम्ही भरून काढलीत.' मग आम्ही त्यांच्यावरच रचलेले गीत सर्वांत शेवटी वाचू. ते ऐकताना डोळे मिटते घेत पुटपुटतील, 'जगदंब, जगदंब!' बिछायतीवर हात थोपटीत आम्हास बोलावून जवळ बसवून घेतील. तोंडाने त्या काहीच बोलणार नाहीत; पण आमच्या पाठीवरून फिरणारा त्यांचा हात उदंड बोलेल ! बोलतच राहील! "


पाचाडच्या दरुणीमहालातील समया मंद तेवत होत्या. शिसवी मंचकावर जिजाऊ पडून होत्या. खालती सहाणेवर औषधीमात्रा उगाळणाऱ्या धाराऊच्या हातांतील किणकिणणाऱ्या काकणाबरोबर जिजाऊच्या मनाने विचित्र सूर धरला होता.


"आमच्या थोरल्या सूनबाईंच्या सेवेत अशाच औषधीमात्रा झिजल्या! मात्रा घेऊन घेऊन त्या कंटाळत. तेव्हा आम्ही त्यांना मायेच्या रागाची जरब देऊन त्या घ्यायला लावीत होतो. तेव्हा जाणवलं नाही की शेवटी शेवटी मात्राही नकोशा होतात. आज ही सारीजणं आमचं ऐकत नाहीत. आम्हास त्या घ्यायला लावतात.' " या." दरुणीमहालाचा उंबरठा ओलांडणान्या सोयराबाईंना बघून जिजाऊ क्षीण बोलल्या. त्यांनीच वर्दी पाठवून सोयराबाईंना बोलावून घेतले होते. बाहेर सदरी जोत्यावर महाराज आणि युवराज महाडहून आलेल्या वैद्यांचा सल्ला ऐकताना चिंतातुर बसले होते. त्यांच्या ओढल्या चेहऱ्याकडे बघत तुळईची घाट निश्चल टांगती होती. मध्येच वाऱ्याचा झपकारा येत होता. त्याने घाटेतील टोल थरारत होता. तिकडे कुणाचेच ध्यान नव्हते. सोयराबाईंनी मंचकावर झुकून पदर तळहाती घेत तीन वेळा जिजाऊंना नमस्कार केला. त्यामुळे उठलेल्या त्यांच्या सुवर्णी कंकणांच्या किणकिणाटाचा माग घेत काही क्षण शांततेत तसेच गेले.


" सूनबाई, काही एक मनचं तुमच्या कानी घालावं म्हणून आम्ही तुम्हाला याद केलंय." जिजाऊंना धाप लागल्यागत वाटले. त्यानी नजर वरच्या तख्तपोशीत जोडली होती. हात छातीवर होते. सोयराबाईंच्या कपाळीचे कुंकूपट्टे आक्रसले. जीव कानांत गोळा झाला. नाकाची नथ काच देतेय असे त्यांना वाटले. " सूनबाई, आता अधिकाचं सांगायला आम्ही राहू याचा भरवसा नाही! ते ऐकताना सहाणेवर फिरणारे धाराऊचे हात कलम झाल्यासारखे गपकन थांबले. " जे सांगतो आहोत ते शेवटचं. ते तुमच्या कानी घातल्याखेरीज आम्ही मरणास मोकळ्या नाही! सूनबाई, आता तुम्हास एक नाही तीन फर्जद आहेत हे नीट ध्यानी घ्या ! राजे, शंभूराजे आणि रामराजे ! दमा जिजाऊंशी भांडू लागला. त्या त्याला खानदानी अरब देत जागी बसवू लागल्या. धाराऊचे हात थाबले. कान टवकार झाले.


" बाई, भोसल्यांचे पुरुष हाती लागणं मुश्किल. तुमच्या हातांत तीन आहेत! त्यांना सांभाळून घ्या. हा वाढला पसारा, याहून अधिक वाढवा. शंभूराजांना तर सर्वाहून अधिक जपा. त्याच्या आऊ गेल्या नि आम्हीच त्यांच्या आऊ झाला. आता आम्हा दोघींचा भार तुमच्यावर आहे. धाराऊ कोरड पडल्याने जिजाऊनी धाराऊला हाक दिली. त्यांना काय पाहिजे हे ओळखून धाराऊ पाण्याचा गडवा, वाटी घेत चटक्याने पुढे झाली. पाणी घशाखाली जाताच जिजाऊंना कितीतरी हपार वाटले. "तुम्ही महाराणी झालात. आम्ही भरून पावला. आता महामाता व्हा. त्यासाठी येईल ते आपलं घेण्यासाठी पदर मोठा करा. आईला मानअपमान मानून नाही चालत. ते बळ येण्यासाठी जगदंबेची आण भाका. आमची याद ठेवा न ठेवा, पण जगदंबेला कधी विसरू नका. आम्हास भरोसा आहे पडल्या न पडल्याला ती तुम्हास मार्ग दाखवील. हे एवढंच सांगणं. या तुम्ही.” जिजाऊंनी डोळे मिटते घेतले. सोयराबाईंची नथ ओळांबलो. सुवर्णी कंकणे किणकिणली. नमस्कार करून त्या महालाबाहेर पडू लागल्या.


" हां. घेवा मासाहेब.” धाराऊने उगाळली मात्रा बोटाने राजमाता जिजाऊंना चाटवली. महालाबाहेर पडणाऱ्या राणीसाहेबांच्या शालूवरचे झळझळणारे जरीबुट्टे जिजाऊंना दिसत होते. मंचकाच्या उशाकडे जिजाऊंना दिसणार नाही अशी उभी राहिलेली धाराऊ न राहवून हणाली, "मासाब, तुमी बऱ्या व्हनार. मग असं कशापायी बोलता ते! आम्ही हाव की सायांस्नो!" आणि घशातून फुटणारा हुंदका जिजाऊंनी ऐकू नये म्हणून तिने आपल्या पदराचा बोळा तोंडात कोंबून घेतला.


मृगाची पाणझडप पाचाडावर पडली. सावित्री, काळ, गांधारी नद्या लाल पाण्याने भरून आल्या. टपटपती थेंबावळ झाडांच्या पानापानांवरून उतरू लागली. जिजाऊंचे पाय चेपीत बसलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यांवरची झापड केव्हा हटतेय याची टक लावून वाट बघत होत्या.


'येसू." मासाहेबांच्या हलक्या सादेने त्यांची तंद्री मोडली. " जी." म्हणत येसूबाई उठल्या. चौरंगीवरचे पंचपात्र उचलून जिजाऊंच्या जवळ गेल्या. " तीर्थ घ्या मासाहेब आईचं.” येसूबाईंनी पळी जिजाऊंच्या ओठांशी नेली. जिजाऊंनी तीर्थ घेतले. “येसू, इथल्या सदरीजोत्यावर आम्ही उभ्या राहिलो की गडाच्या मावळमाचीवर तुम्हीही असाल काय असा विचार मनी यायचा !"


"हां मासाहेब, स्वारी मनोऱ्याच्या पाचव्या मजल्यावर आहेसं बघून आम्ही एकदा मावळमाचीवर आपल्या दर्शनास येण्याचं धाडस केलं होतं. आबासाहेब गडावर नव्हते. '


येसूबाईंचे उत्तर ऐकून जिजाऊ क्षीण हसल्या. “तुम्ही तसं घेतलेलं ते पहिलं नि शेवटचं दर्शन आहे आमचं!" असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्या बोलण्याने येसूबाईंचा चेहरा किती दुखरा होईल याची कल्पना असल्याने त्या म्हणाल्या, " नातसूनबाई, तुम्हाला काही सांगणं कधी साधलंच नाही. आमच्या स्वारीनं खूप सालांपूर्वी एक तुला केली होती. नांगरगावी. इंद्रायणी आणि भीमेच्या संगमावर. हत्तीचा बच्चा नावेत चढवून." उबळ आल्याने जिजाऊ आपोआप थांबल्या..


येसूबाई पदर सावरीत मंचकावरून उठल्या. कारण त्यांच्या स्वारीसह महाराज महालात आले. त्यांच्या पाठीशी राजवैद्य नि मोरोपंत होते. जिजाऊंना येसूबाईंना सांगायची होती ती हत्तीच्या तुलेची कथा त्यामुळे त्यांच्या ओठांत तशीच राहिली!