सांभार : मराठा साम्राज्यकोश
अफझलवधानंतर शिवरायांची चढाई
अफजलखानला मारण्याआधीच शिवरायांची पुढची मोहीम सुरू झाली होती. त्यांच्या हालचाली अतिशय नियोजनबद्ध व अचूक होत्या. आदिलशाही मोहीमेत गेलेली सर्व ठाणी त्यांनी परत मिळविली. इतकेच नव्हे तर नवीन आदिलशाही मुलूखही त्यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली आणला. शिरवळ, सासवड व सुपे ही ठाणी अफझलवधाच्या दुस-या दिवशीच शिवरायांच्या सैनिकांनी जिंकून घेतली. ह्या ठिकाणांची अंतरे बघता असे दिसते की प्रतापगडावर च्या निकालावर हे अवलंबून नव्हते. शिवाजी राजा , नेताजी व दौलोजी त्रिशूळासारखे तिन दिशांनी बाहेर पडले आणि आदिलशाही मुलूखात घुसले.
अफजलखानला मारण्याआधीच शिवरायांची पुढची मोहीम सुरू झाली होती. त्यांच्या हालचाली अतिशय नियोजनबद्ध व अचूक होत्या. आदिलशाही मोहीमेत गेलेली सर्व ठाणी त्यांनी परत मिळविली. इतकेच नव्हे तर नवीन आदिलशाही मुलूखही त्यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली आणला. शिरवळ, सासवड व सुपे ही ठाणी अफझलवधाच्या दुस-या दिवशीच शिवरायांच्या सैनिकांनी जिंकून घेतली. ह्या ठिकाणांची अंतरे बघता असे दिसते की प्रतापगडावर च्या निकालावर हे अवलंबून नव्हते. शिवाजी राजा , नेताजी व दौलोजी त्रिशूळासारखे तिन दिशांनी बाहेर पडले आणि आदिलशाही मुलूखात घुसले.
