सांभार : मराठा साम्राज्यकोश
अफझलखानच्या वधानंतरचे युद्ध
अफजलखानाला मारल्यानंतर गडावरून ठरलेला इशारा केला गेला. झाडात लपलेले मराठी सैन्य बेसावध आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. पळण्याचे सर्व मार्ग आधीच रोखले होते.
नारायण नावाच्या एका ब्राह्मणाकडे पाच हजार लोक दिले होते. ही पूर्ण फळी आदिलशाही सैन्यावर बरसली. कमळोजी साळुंखे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी वडखले आणि रामजी पांगरे ह्यांनी प्रत्येकी एक हजार मावळांनी वेगवेगळ्या बाजूने आक्रमण केले. सेनापती नसलेल्या आदिलशाही सैन्याची दयनीय अवस्था झाली होती. माघार घेण्यासाठीही जागा उरली नव्हती.
मुसाखानने मराठ्यांच्या पहिल्या फळीचा हल्ला थोपवून धरला. हसनखान, याकुतखान, अंकुशखान व इतर काहींनी त्याला मदत केली. आदिलशाहीच्या घोडदळापुढे शिवाजीच्या पायदळाला त्या घनदाट अरण्याचा पुरेपूर फायदा होत होता. मुसाखानचा हा प्रयत्न मावळ्यांनी हाणून पाडला व त्याला माघार घेत अरण्यात जावे लागले.
आदिलशाही सैन्यात पूर्ण गोंधळ उडाला होता व त्यांची निर्णायक हार झाली. त्यांचे कित्येक लोक मारले गेले व सर्व युद्धसाहित्य-दारूगोळा वगैरे शिवरायांना मिळाले. शाहजीचा चुलतभाऊ मंबाजी भोसले हा आदिलशाहीकडून लढताना मारला गेला. अफजलखानाची दोन मुले, रणदुल्लाखान (दुसरा), अंबरखान, राजाजी घाटगे व इतर काही सरदार पकडले गेले.
मुसाखान, हसनखान, याकुतखान, अंकुशखान व अफजलखानचा थोरला मुलगा फजलखान कसेबसे त्या जंगलात लपून रातोरात वाईला पोहोचले. शिवाजीने नेताजी पालकरला त्याच वेळी वाईवर चालून जायला सांगितले होते पण तो वेळेत पोहोचू शकला नाही.
अफजलखानचे सैन्य जणू जावळीचा अरण्यात इतिहासजमा झाले. आदिलशाहीसाठी हा एक जणू विजेचा आघात होता. विजापुरास ही बातमी जायच्या आधीच शिवाजी राजे प्रतापगडाहून निघाले व वाईला पोहोचले . निर्णायक वेळी प्रतिस्पर्ध्यावर आघात करायची त्याची क्षमता अतुलनीय होती.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९३८-९४२
अफजलखानाला मारल्यानंतर गडावरून ठरलेला इशारा केला गेला. झाडात लपलेले मराठी सैन्य बेसावध आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. पळण्याचे सर्व मार्ग आधीच रोखले होते.
नारायण नावाच्या एका ब्राह्मणाकडे पाच हजार लोक दिले होते. ही पूर्ण फळी आदिलशाही सैन्यावर बरसली. कमळोजी साळुंखे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी वडखले आणि रामजी पांगरे ह्यांनी प्रत्येकी एक हजार मावळांनी वेगवेगळ्या बाजूने आक्रमण केले. सेनापती नसलेल्या आदिलशाही सैन्याची दयनीय अवस्था झाली होती. माघार घेण्यासाठीही जागा उरली नव्हती.
मुसाखानने मराठ्यांच्या पहिल्या फळीचा हल्ला थोपवून धरला. हसनखान, याकुतखान, अंकुशखान व इतर काहींनी त्याला मदत केली. आदिलशाहीच्या घोडदळापुढे शिवाजीच्या पायदळाला त्या घनदाट अरण्याचा पुरेपूर फायदा होत होता. मुसाखानचा हा प्रयत्न मावळ्यांनी हाणून पाडला व त्याला माघार घेत अरण्यात जावे लागले.
आदिलशाही सैन्यात पूर्ण गोंधळ उडाला होता व त्यांची निर्णायक हार झाली. त्यांचे कित्येक लोक मारले गेले व सर्व युद्धसाहित्य-दारूगोळा वगैरे शिवरायांना मिळाले. शाहजीचा चुलतभाऊ मंबाजी भोसले हा आदिलशाहीकडून लढताना मारला गेला. अफजलखानाची दोन मुले, रणदुल्लाखान (दुसरा), अंबरखान, राजाजी घाटगे व इतर काही सरदार पकडले गेले.
मुसाखान, हसनखान, याकुतखान, अंकुशखान व अफजलखानचा थोरला मुलगा फजलखान कसेबसे त्या जंगलात लपून रातोरात वाईला पोहोचले. शिवाजीने नेताजी पालकरला त्याच वेळी वाईवर चालून जायला सांगितले होते पण तो वेळेत पोहोचू शकला नाही.
अफजलखानचे सैन्य जणू जावळीचा अरण्यात इतिहासजमा झाले. आदिलशाहीसाठी हा एक जणू विजेचा आघात होता. विजापुरास ही बातमी जायच्या आधीच शिवाजी राजे प्रतापगडाहून निघाले व वाईला पोहोचले . निर्णायक वेळी प्रतिस्पर्ध्यावर आघात करायची त्याची क्षमता अतुलनीय होती.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९३८-९४२
