सांभार : मराठा साम्राज्यकोश
सुपे, शिरवळ व सासवड परत शिवरायांकडे
१० नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला. त्याच दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे, शिरवळ व सासवड जिंकले. प्रतापगडापासून ह्या ठिकाणांचे अंतर पाहता ही आक्रमणे निर्धारित योजनेनुसार केली गेली होती व ती शिवाजीराजा -अफजलखान भेटीच्या परिणामावर अवलंबून नव्हती.
ह्या प्रकरणात शिवरायांनी आदिलशाही सैन्य व विशेषकरुन अफजलखानला ज्या प्रकारे भुलविले ते अभ्यास करण्याजोगे आहे. शिरवळ, सुपे व सासवड परत जिंकून घेणे ही निश्चितच आक्रमक चाल होती. भेटीच्या योजनेच्या सफलतेवर शिवरायांना किती दृढ विश्वास होता हे त्यातून दिसते. जरी अफजलखानला मारता आले नसते तरी ह्या तीन जागा घेतल्याने त्याला एक कणखर संदेश मिळाला असता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
१० नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला. त्याच दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे, शिरवळ व सासवड जिंकले. प्रतापगडापासून ह्या ठिकाणांचे अंतर पाहता ही आक्रमणे निर्धारित योजनेनुसार केली गेली होती व ती शिवाजीराजा -अफजलखान भेटीच्या परिणामावर अवलंबून नव्हती.
ह्या प्रकरणात शिवरायांनी आदिलशाही सैन्य व विशेषकरुन अफजलखानला ज्या प्रकारे भुलविले ते अभ्यास करण्याजोगे आहे. शिरवळ, सुपे व सासवड परत जिंकून घेणे ही निश्चितच आक्रमक चाल होती. भेटीच्या योजनेच्या सफलतेवर शिवरायांना किती दृढ विश्वास होता हे त्यातून दिसते. जरी अफजलखानला मारता आले नसते तरी ह्या तीन जागा घेतल्याने त्याला एक कणखर संदेश मिळाला असता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
