इतिहास
इ.स.१६७९
च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवरायांनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ
असलेल्या बेटांवर धाडून खांदेरी-उंदेरी किल्ल्याची उभारणी केली.मुंबईच्या
समोरच असलेल्या या दुर्गामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त
झाले.
|
इंग्रजांनी
मायनाक भंडारीला किल्ला बांधत असताना अटकाव करण्याचा प्रयत्न
केला.नामांकित अश्या सागरी सेनानींना खांदेरी-उंदेरी वर पाठवून ते बेट
मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.पण मायनाक
भंडारी व दौलतखानाच्या आरमारापुढे इंग्रजांची मात्रा चालली नाही.
|
|
| |
सिद्दी
आणि मुंबईकर इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारल्या गेलेल्या या
जलदुर्गामुळे सिद्दी आणि इंग्रज या दोघांचीही कोंडी झाली. सिद्दीला
मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखले गेले,तर मुंबईकर
इंग्रजांवर मराठ्यांची टांगती तलवार राहिली.खांदेरीच्या किल्यात वेताळ
मंदिर, हनुमान मंदिर, बुद्ध मंदिर अशी अनेक श्रद्धास्थाने आहेत.
|
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
अलिबागच्या
उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ या लहानश्या गावातून
खांदेरी आणि उंदेरीला जाता येते. थळ पासून खांदेरी-उंदेरी किल्ल्यावर
जाण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्या उपलब्ध आहेत.गडावर
राहण्या-खाण्याची व्यवस्था नाही.खांदेरीवर पिण्याचे पाण्याचे टाके आहे.