इतिहास
कोरलाईच्या
किल्ल्याची बांधणी पोर्तुगिजांनी केलेली आहे.सन १६८३ साली छत्रपती संभाजी
राजेंनी किल्ल्यावर चाल केली होती,पण किल्ला ताब्यात घेण्यात त्यांना
अपयश आले.चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी
पोर्तुगीजांशी झुंजून कोरलाईवर ताबा मिळवला होता.
| |
किल्ल्याच्या
पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची
खाडी आहे.किल्ल्यावर पोर्तुगीज बांधणीच्या चर्चचे अवशेष आहेत.
किल्ल्याच्या बुरुजावर ठिकठिकाणी तोफा आहेत,या किल्ल्यामुळे सागर आणि
कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते.
|
|
किल्ल्याच्या
पश्चिमेकडून दिंडी दरवाजा जाता येते,तर पूर्वेकडून दर्या दरवाजाकडे जाता
येते.दिंडी दरवाजातून बाहेर पडल्यानंतर सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जाता
येते.दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे खूप चांगल्या रीतिने
न्याहळता येते.
|
|
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
कोरलाई
गाव हे अलिबाग-मुरुड या गाडी रस्त्यावर,अलिबाग पासून अंदाजे २२
कि.मी.अंतरावर आहे.किल्यावर राहण्याची तसेच जेवणाची सोय नाही,पिण्याच्या
पाण्याची व्यवस्था किल्यावर उपलब्ध आहे.