इतिहास
जयगड किल्ल्याचे बांधकाम अदिलशाहाच्या कालखंडात झाले आहे.छत्रपती शिवराय तसेच सरखेल कान्होजी आंग्रेच्या कालखंडात जयगड किल्ल्यास वैभव प्राप्त झाले होते. या किल्ल्यामुळे रत्नागिरी जवळच्या समुद्रात मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला होता.
|
सन
१७५६ साली इंग्रजांच्या मदतीने जयगड किल्ला पेशव्यांनी जिंकला त्यामुळे
कोकण किनारपट्टीवरील मराठ्यांचा वचक कमी झाला,नानासाहेब पेशवा व आंग्रे
यांच्यातील भांडणाचा इंग्रजांनी फायदा करून घेत आपले सामर्थ्थ कोकण
किनारपट्टीवर वाढविले.
|
|
| |
किल्ल्याची
तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.किल्ल्यावर अंदाजे पन्नास फूट खोल
विहिर आहे.समुद्राच्या जवळ असलेल्या या विहिरीचे पाणी गोड आहे.किल्ल्यावर
दारूगोळ्याची कोठारे तसेच पहारेकर्यांच्या देवड्या आढळतात.संपूर्ण गड
पाहण्यास एक तास पुरेसा आहे.
|
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
रत्नागिरीहून
जयगडला बससेवा उपलब्ध आहे.हे अंतर एक तासाचे आहे.गडावरील गणपतीच्या
मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते.गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
नाही,जेवणाची सोय स्वत: करावी.