इतिहास
इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवरायांनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ असलेल्या बेटांवर धाडून खांदेरी-उंदेरी किल्ल्याची उभारणी केली.मुंबईच्या समोरच असलेल्या या दुर्गामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त झाले.
|
इंग्रजांनी
मायनाक भंडारीला किल्ला बांधत असताना अटकाव करण्याचा प्रयत्न
केला.नामांकित अश्या सागरी सेनानींना खांदेरी-उंदेरी वर पाठवून ते बेट
मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.पण मायनाक
भंडारी व दौलतखानाच्या आरमारापुढे इंग्रजांची मात्रा चालली नाही.
|
|
| |
उंदेरी
किल्ल्यावर अंदाजे १५ ते १६ तोफा आहेत.किल्ल्यावर तीन पाण्याची टाकी असली
तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज मजबूत
आहेत.
|
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
अलिबागच्या
उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ या लहानश्या गावातून
खांदेरी आणि उंदेरीला जाता येते. थळ पासून खांदेरी-उंदेरी किल्ल्याला
जाण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्या उपलब्ध आहेत.गडावर
राहण्या-खाण्याची व्यवस्था नाही.उंदेरीवर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.