कोणतही शिवकाव्य येथे शोधा

किल्ले उंदेरी



इतिहास
 
इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवरायांनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ असलेल्या बेटांवर धाडून खांदेरी-उंदेरी किल्ल्याची उभारणी केली.मुंबईच्या समोरच असलेल्या या दुर्गामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त झाले.

 
इंग्रजांनी मायनाक भंडारीला किल्ला बांधत असताना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.नामांकित अश्या सागरी सेनानींना खांदेरी-उंदेरी वर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.पण मायनाक भंडारी व दौलतखानाच्या आरमारापुढे इंग्रजांची मात्रा चालली नाही.
    
 underi5    


  underi1        
उंदेरी किल्ल्यावर अंदाजे १५ ते १६ तोफा आहेत.किल्ल्यावर तीन पाण्याची टाकी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज मजबूत आहेत.
 


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

अलिबागच्या उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ या लहानश्या गावातून खांदेरी आणि उंदेरीला जाता येते. थळ पासून खांदेरी-उंदेरी किल्ल्याला जाण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्या उपलब्ध आहेत.गडावर राहण्या-खाण्याची व्यवस्था नाही.उंदेरीवर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.
underi