कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८२

 आपले सबनीस म्हणून रावजी सोमनाथ आणि प्रल्हाद निराजी यांना औरंगाबादेत मागे ठेवून, राजांचे राजकारण मार्गी लावून संभाजीराजे राजगडी परतले,


याच वेळी राजांनी आदिलशाहीशी तह केला. विजापूर दरबाराने राजांना सालिना तीन लाख होनांची खंडणी देण्याचे मान्य केले. स्वराज्याच्या दोन आघाड्या बिनघोर झाल्या मुगलशाही आणि आदिलशाही. -फिरंगाणातील गरीब रयत तर जिवाला कंटाळून गेली होती. तिथे फिरंग्यांनी सक्तीच्या धर्मांतराचा वरवंटा गावागावांवरून फिरवण्याचा सपाटा चालविला होता. विरोध करणाऱ्यांना गावचौकात आणून उभे जाळण्यात येत होते. शेकडो वर्षांचा गावठाव सोडून निराश्रित, त्राता नसलेली रयत कारवार, कोकणपट्टीत उतरत होती. देशमुख आणि फिरंगी लोकांचा माज टापांखाली रगडण्यासाठी खुद्द राजे फौजबंदीने कोकणपट्टीत उतरले!


त्यांना निरोप दिलेले संभाजीराजे आणि जिजाऊ खासेमहालात गिर्दीच्या बैठकीवर बसले होते. समोर एका शिसवी चौरंगावर कपाळी आडवे गंधपट्टे घेतलेले केशव पंडित मांड-बैठक घेऊन बसले होते. त्यांच्यासमोर लाकडी तिकाटण्याच्या भगव्या बिछायतीवर रामायणाच्या स्कंधाची पोथी होती. त्या पोथीतील एक एक पान पंडित उचलीत होते. स्वच्छ उच्चारात, लयीत देववाणीतील श्लोक वाचीत होते. वाचल्या श्लोकांचा प्राकृत अर्थ सांगीत होते.


" रावणाचा अंत केलेले प्रभू रामचंद्र अयोध्येत सिंहासनाभिषिक्त झाले. आपल्या वीरांचा भेटवस्तू देऊन त्यांनी गौरव केला. भक्त हनुमंताला त्यांनी स्वकंठातील मोत्याचा हार प्रदान केला.


“ तो घेऊन हनुमंत अयोध्येच्या नगरवेशीजवळ आला. एका उंच वटवृक्षावर चढून 46 त्याने बैठक घेतली. रामप्रभूंनी दिलेल्या मोत्यांच्या हारातील एक एक मोती तो आपल्या सामर्थ्यवान दाढांखाली फोडू लागला! त्यात प्रभू राम आहेत का हे पाहण्यासाठी ! एकाही मोत्यात त्यास : रामचंद्र' दिसेनात! तो विव्हळ झाला! वृक्षाखाली मोत्यांची " टरफले पसरली. ' ऐकल्या कथाभागाने संभाजीराजांच्या मनाची नौका न कळणाऱ्या प्रकाशपात्रावरून


सरसर धावू लागली -


"हरबाबीत 'राम' शोधला पाहिजे! जसे हनुमंताला आपल्या फोडल्या छातीत रामप्रभूंचे दर्शन झाले तसे आम्हास. आम्हास महाराजसाहेबांचे होईल ?


'कसला विचार करता ?" पाठीवर हात फिरवीत जिजाऊ मायेने म्हणाल्या. उत्तरासाठी म्हणून संभाजीराजांनी त्यांच्या रोखाने मान उठविली. एवढ्यात गोमाजीबाबा महालात आले. झुकता मुजरा रुजू ठेवून म्हणाले, “आऊसाब, कोलापूर तरफेचा पुनाळ गावठाणाचा योक असामी आलाय. केसरकरांच्या बीयाचा. जोत्याजी म्हनत्यात त्याला मानूस कसबाचा हाय. चाकरीसाठनं आऊसाबांच्या पायाची भेंट घ्यायची म्हन्तो. '


"पेश करा त्यास." जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. भरल्या माटाचा आणि मावळी श्राटाचा तरणाबांडा जोत्याजी आत आला. चांदीच्या कड्यांचे मनगट फरसबंदीकडे नेत स्थाने मुजरा घातला. "कोण गाव ? " जिजाऊंनी त्याला निरखीत विचारले.


पुनाळ जी." जोत्याजी अदबीने उत्तरला. कोण कोण हत्यारांची चाल येते ? "


'पट्टा, भाला, बोथाटी, गदका सम्द्यांची सरकार. "

'इमान कोण जातीचं ? "


क्षणभर जोत्याजी घोटाळला. “आऊसाहेबांच्या पायाशी ल्येकराच्या जातीचं !' जोत्याजीच्या जाबाने जिजाऊंचा चेहरा उजळला, आणि संभाजीराजे तर उत्तराने खूषदिल होऊन जोत्याजीच्या छातीवरच्या बाराबंदीच्या गाठी मोजू लागले !

" गोमाजी, यास फडावर नेऊन बाळाजींची भेटी पाडा. रुजू करून घ्या.” जिजाऊ गोमाजींना म्हणाल्या.


गोमाजी, जोत्याजी मुजरे घालून मागे हटू लागले. ते गर्दन वर करून वळणार एवढ्यात जिजाऊ जोत्याजीला थोपवीत पुन्हा म्हणाल्या, "पुनाळकर, मनास किंतू येऊ देऊ नकोस आम्ही इमान विचारलं म्हणून. एक वेळ राज्य मिळणं सोपं जातं पण पण इमानी - चाकर मिळणं ते घडत नाही. रामायण हाच दाखला देते! "


राजांनी मंत्रिगण आणि संभाजीराजे यांच्या साक्षीने सदर बसविली वन्हाड, खानदेशात आपले मुतालिक म्हणून जाणाऱ्या प्रतापराव, निराजी, आनंदराव यांना संभाजीराजांनी वस्त्रे, श्रीफळ, विडा मरातबाने बहाल केला. त्या तिन्ही मावळी हत्यारबाजांनी संभाजीराजे आणि राजांना अदब मुजरे घातले.


प्रतापरावांची मराठी फौज राजगड उतरू लागली. तिच्या कूचासाठी पाली दरवाज्यावरची नौबत घुमू लागली. ती ऐकताना संभाजीराजांना वाटले- "आमची फौज सरलष्करानिशी आमच्या पाठीशी घेऊन दौडीवर जाण्याचा योग आम्हास केव्हा येणार ?


आता राजगडावर राणीवसा, मंत्रिगण, अठरा कारखाने, फड सर्व ठिकाणी संभाजीराजे मानले जात होते. राजांची ' चालती बोलती सावली' म्हणून !


धाराऊचा आणि येसूबाईंचा तर आता गडावर काळीजमेळ जमून गेला. येसूबाई धाराऊला 'मामीसाहेब' म्हणत होत्या आणि मानीत होत्या. धाराऊ त्यांना 'सूनबाई' म्हणत होती आणि 'लेक' म्हणून मानीत होती. दररोज दिवस उगवताना 'सूर्याचा' आणि मावळताना 'दिवट्याचा' नमस्कार जिजाऊंना घालण्यासाठी ती येसूबाईंना खासेमहालात घेऊन येत होती.


सुरुवातीला बावरलेल्या येसूबाई जिजाऊ, धाराऊ, पुतळाबाई, आणि राजे यांच्या धीर देणाऱ्या मायेच्या वागण्याने आता गडाला चांगल्या रुळल्या. फक्त एकाच महाली त्यांची जवान कशी जखडल्यागत होऊन जात होती. सोयराबाईंच्या मासाहेबांचा नाही, आबासाहेबांचा नाही, कधी खुद 'त्या' हिंदोळत्या मोतीलगाच्या 'टोपाचा' नाही पण येसूबाईना सोयराबाईंचा धाक वाटायचा! ह्या 'मामीसाहेब' येसूबाईंना, त्यांच्या झळझळीत गोरेपणामुळे, म्यानखेच करून उन्हात गडाच्या तटबंदीवर तळपत ठेवलेल्या हत्यारासारख्या वाटायच्या!


बोलता बोलता सोयराबाईंच्या शेंडा नकळत लालावून येतो हे येसूबाईंच्या नजरेतून सुटले नव्हते! हातीच्या सुवर्ण-कंकणांचा नाद व्हावा म्हणून सोयराबाई पदर पुन्हा पुन्हा नीट करतात हेही येसूबाईंच्या ध्यानी आले होते. आणि दर्पणात मेणमळल्या कुंकवाची कपाळी आडवी घेतलेली बोटे एकलगीत आलीत का नाहीत हे बघताना तर 'मामीसाहेबांना' कशाचेच भान उरत नाही हेही त्यांच्याच महाली उभे राहून येसूबाईंनी अनेकदा अनुभवले होते!


नेहमीसारखी धाराऊ येसूबाईंना घेऊन दिवटीचा नमस्कार घालण्यासाठी जिजाऊच्या महाली आली. तिथे सगळा गोतावळाच आऊसाहेबांचे पाय शिवण्यासाठी जमला होता.


त्यात संभाजीराजे होते. सारा राणीवसा होता. राजे महाड-रायगडाकडे कूच झाले होते.


रोषणनाईकाने महालीची शमादाने पाजळली. देवमहाली अंबेचे दर्शन घेतलेल्या जिजाऊसाहेब कुणबिणींच्या सोबतीने महालात आल्या. त्यांनी शमादानांना हात जोडले. आता त्यांचे वय झाले होते. डुईभर पदर असल्याने कुणाला सहज दिसत नव्हती पण त्यांच्या केसावर चुनेवाणाची पांढरी शिकल उतरली होती. एक एक करता राणीवशातील बाईसाहेब जिजाऊ सामोरे येत नमस्कार घालू लागल्या. जिजाबाई जबानभर आशीर्वाद देऊ लागल्या.


संभाजीराजे पुढे झाले. त्यांनी जिजाऊंचे पाय शिवले. त्यांच्या पाठीशी रायजी, अंतोजी हे धाराऊचे मुलगे आणि जोत्याजी केसरकर अदबीने उभे होते. "शंभूराजे, तुम्ही आता एकट्यानं नाही करायचा दिवट्यांचा रिवाज ! येसूड, अशा जोडीला या आपल्या स्वारींच्या ! " जिजाऊंनी धाराऊकडे हसत बघत येसूबाईंना साद घातली.


धाराऊच्या सोबतीने येसूबाई पुढे झाल्या. संभाजीराजांच्या डाव्या हाताशी जोड देऊन उभ्या राहिल्या. दोघांनीही वाकून जिजाऊंना दिवळ्यांचा रिवाज दिला. जिजाऊंच्या चर्येवर हास्य तरळले. भरल्या जिभेने त्या म्हणाल्या, "औक्षवान व्हा ! जे करणं भोगणं असेल ते जोड साथीनं भोगा !!


येसूबाईंची हनुवटी तर्जनीने वर घेत जिजाऊंनी त्यांच्याकडे काही न बोलता नुसते. 64 बघितले. आणि त्यांना आज पहिल्याने जाणवले, "नातसूनबाईंचा चेहरा मोहरा त्यांच्या आबा आऊसारखा शिक्यांच्या माटानं आहे, पण पण डोळे आहेत साक्षात - जगदंबेच्या डोळ्यांसारखे! टपोरे दूरचे बघणारे!" -


जिजाऊंनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक करता राजांच्या गोतावळ्यातील आसामी जिजाऊंच्या महालाबाहेर पडू लागली. कधी नव्हे त्या सोयराबाई आपल्या चंद्रा दासीशी काहीतरी बोलत मागे रेंगाळल्या ! महालाबाहेर पडू बघणाऱ्या येसूबाईंच्या जवळ येत त्यांना त्या हळुवार म्हणाल्या, "येता आमच्या महाली ?"


येसूबाईंनी मान डोलावली होकाराची. आणि त्या अदबीने सोयराबाईंच्या मागून चालल्या. धाराऊने गोंदल्या कपाळावर घड्या घालीत आपल्या 'लेकीची ' पाठ धरली. सोयराबाईंच्या मागून चालणाच्या येसूबाईंना बघून पुतळाबाईंना खिनभर वाटले-" आपण स्वतःच जावं सूनबाईंना सोबत - " 'पण धाराऊला जाताना पाहून त्या बिनघोर झाल्या!