कोणतही शिवकाव्य येथे शोधा

किल्ले बाणकोट



इतिहास
प्राचीन कालखंडात मंदारगिरी या नावाने बाणकोटचा उल्लेख आहे.आदिलशहाकडून हा गड शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर किल्ल्याचे हिंमतगड असे नामकरण केले. संभाजीराजांच्या वधानंतर पुढे बाणकोट जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात गेला.

   
पेशवाईच्या कालखंडामध्ये सन १७३३ साली बंगाजी महाडिक यांनी बाणकोट मराठ्यांच्या ताब्यात आणला. सन १७३४ मध्ये सिद्धीने हा किल्ला परत काबीज केला.पुढे पिलाजी जाधव यांनी हा किल्ला जिंकला त्यानंतर याचा ताबा आंग्रेकडे आला. १७५६ मध्ये आंग्रेंच्या पराभवानंतर पेशवे व इंग्रज यांच्यात तह झाला व बाणकोट इंग्रजांना मिळाला.
  
 bankot1     


 bankot5         
किल्ल्याची तटबंदी ७० मीटर रूंद व ३० मीटर उंच असून किल्ल्याचे दोन भव्य बुरुज उत्तराभिमुख आहेत. किल्ल्यातून आत प्रवेश केल्यानंतर पहारेकरांच्या प्रशस्त देवड्या दिसतात तेथून किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी दगडी जिना बांधलेला आहे.किल्ल्यावर खंदक,चोर दरवाजा,दारू कोठार आहे.गडावर दगडमातीने बुजलेली विहीर आहे.
 


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

रत्नागिरीहून मंडणगड मार्गे बाणकोटला जाता येते तसेच हरिहरेश्वरहून वागमांडला येऊन तेथून बोटीने साधारणत: अर्ध्या तासात बाणकोटला जाता येते. गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,जेवणाची सोय स्वत: करावी.
bankot8