कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८४

 राजे देवमहाली पूजेला बसले होते. त्यांनी समोरच्या ताम्हनात, हाती घेतलेले आचमनाचे पाणी तसेच सोडले आणि " जगदंब.” म्हणत ते प्रभाकरभट आणि केशव - पंडिताकडे बघत चौरंगीवरून उठले!

हीच वर्दी जोत्याजी केसरकराने जिजाऊंच्या महाली येऊन त्यांच्या पायांवर घातली. जिजाऊ पुण्याहून बलाऊ धाडून आणलेल्या खोंद्याशी, सोयराबाईंच्या 'डोहाळजेवणाच्या वेळी ' लागणाऱ्या फुलांच्या मखराबद्दल बोलत होत्या. वर्दी ऐकताच त्यांनी चालते बोलणे तसेच सोडले आणि त्या उठल्या.


जिजाऊंच्या महाली 'मखराचा साज कंचा' ते ऐकायला आलेली सोयराबाईंची कुणबीण चंद्रा जिजाऊ महालाबाहेर पडेपर्यंत थांबली ! मग ती चटक्या पावलांनी सोयराबाईसाहेबांच्या महाली आली. पण आत धाराऊ आणि संभाजीराजांना बघून ती जागीच घोटाळ्यात पडली.


गर्भारपणाने सतेज दिसणाऱ्या सोयराबाई पलंगावर लेटून होत्या. दूरवर झरोक्यातून दिसणाऱ्या कालेश्वरीच्या मंदिराचा सोनकळस त्यांनी क्षणभर निरखला. त्यांच्या पलंगाच्या काठाळीवर बसलेले संभाजीराजे विचारात गुंतून गेले. बरेच दिवस त्यांना या मासाहेबांच्या चालीबोलीत फेर पडलेला जाणवत होता.


फुलत्या कुशीत सोयराबाई संभाजीराजांशी त्यांनाच न कळणाच्या मायेने वागत होत्या! डोळ्यांआड असणारे राजांचे रूप त्यांना संभाजीराजांच्यात दिसत होते. त्यांचे मन तडफेच्या संभाजीराजांतून काहीतरी उचलू बघत होते ! चंद्राला आत येताना बघून सोयराबाईंनी विचारले, “ये. आज फुटता दिवस धरून कुणासाठी नौबत उठली ?


चंद्रा संभाजीराजांकडे बघत गप्पच राहिली. " बोल. ते आमचेच आहेत!" सोयराबाई हसत म्हणाल्या.


गोंधळलेली चंद्रा बोलून गेली, "सरलस्कर परातलं न्हवं मोगलाईतनं! " चंद्राचे बोल ऐकून संभाजीराजे काठाळीवरून उठले.


"आम्हास आज्ञा द्या मासाहेब. आम्ही येतो. ""या" सोयराबाईंनी पडल्या पडल्या हात उभविला.


धाराऊसह बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना सोयराबाई, ते आड होईपर्यंत निरखीत राहिल्या. मग पुन्हा त्यांनी मंदिराच्या उन्हात तळपत्या सोनकळसाला नजर दिली ! संभाजीराजे सदरेवर आले. राजे आणि जिजाऊंच्या समोर प्रतापरावं व रावजी उभे होते. त्यांनी संभाजीराजांना येते बघून मुजरे दिले. काही क्षण तसेच गेले. मग प्रतापराव राजांना अर्धवट राहिलेला मोगलाईचा करिणा पेश करू लागले.


. एका रातीत सारा तळ आमी उठविला. ह्ये रावजी वन्हाडात हुतं. त्येस्नी ... खबरगीर धाडून आपला मुलूख गाटायची झ्यायली कराय सांगितलं. धनी, बादशानं लई आतल्या गाठीनं डाव टाकला हुता. आमची आन रावजींची उभी फौज दस्त व्हायची हुती ! पर शाजाद्यानं हात दिला! खुद्द त्येनंच आपला वजीर धाडून आम्हाला कानगोष्टी केली- 'रातीत तळ सोडायची!' न्हाईतर..." प्रतापराव थांबले.

औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शहाआलमला औरंगाबादेला हुक्म सोडला होता. त्यांची आगाऊ कुणकूण लागलेल्या शहजाद्यानेच प्रतापरावांना हुक्म हातात पडण्यापूर्वीच इशारत भरली होती !


'प्रतापरावांचा वृत्तांत ऐकून राजे शेजारी बसलेल्या संभाजीराजांकडे बघत राहिले. एक दीर्घ हुस्कार त्यांच्या नाकपाळीतून सुटला. तो एकाच विचाराने" आता फर्मान असो, भेट असो, जहागिरीची वस्त्रे असोत, मोगलांच्या छावणीत आमचे संभाजीराजे कधी-कधीच जाणार नाहीत! आम्ही त्यांना पाठवणार नाही!" " राजश्रियाविराजित, अखंड सौभाग्य अलंकृत, वज्रचुडामंडित थोरल्या राणीसरकार सोयराबाईसाहेब प्रसूत जाहल्या. पुत्ररत्न प्राप्त जाहले. '


चौवाटा पुत्रजन्माची वार्ता घेऊन थैलीस्वार सुटले. गडागडांवर साखरमुठी वाटण्यात आल्या. चौघडे, नगारे दुडवुडले. तोफांची भांडी फुटली. राजाच्या 'थोर' संसारातील नातेबंधाची मंडळी राजगड जवळ करू लागली. पाचवी झाली. सटवी येऊन जन्मल्या बाळाच्या भाळी आपल्या अज्ञात हातांनी 'भाकितलेख 'रेखून गेली.


राजांचा सारा गोतावळा दरुणीमहालातील सोयराबाईंच्या दालनासमोर एकवटला. बाळराजाचे दर्शन घ्यायला. त्यात संभाजीराजे होते. येसूबाई पण धाराऊच्या सोबतीने होत्या. उपाध्यायांनी दिलेल्या शुभमुहूर्तावर 'दर्शन' घ्यायचे होते.


जमल्या गोतावळ्यात राजे येऊन दाखल झाले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली. घंगाळातील मुहूर्ताचे पात्र डुबले. दालनाचा दरवाजा कुरकुरला. जिजाऊंच्या पाठीशी होत सारे भोसलेमंडळ दालनात प्रवेशले.


सुईणीने दुपट्यात लपेटलेले बाळ सोयराबाईंच्या कुशीतून उचलले. हलक्या हातांनी हसत जिजाऊंच्या समोर धरले. जिजाऊंनी मोहरांचा सतका बाळाच्यावरून उतरला आणि आईचा भंडारा ओंजळीत घ्यावा तसे बाळराजे हळुवार आपल्या हाती घेतले! डोळाभर त्यांना पाहून भरल्या समाधानी मनाने जिजाऊंनी बाळ राजांच्या हाती दिले. ते देताना जिजाऊ म्हणाल्या, "मातृमुखी आहेत. पण पण आम्ही ऐकून आहोत हे पालथे उपजले -!” जिजाऊंचा आवाज कातरा झाला होता.


भुवया चढत्या ठेवून, हातीच्या आपल्या देखण्या सोनरूपाकडे बघत राजे म्हणाले, मासाहेब, चिंता करू नका. हे पालथे उपजले म्हणूनच उभी पादशाही हे पालथी घालतील!” राजांचे मर्मबोल संभाजीराजांना फार आवडले. * घ्या.' राजांनी बाळांना संभाजीराजांच्या समोर धरले. संभाजीराजांनी बाळराजांच्यावरून मोहरथैलीचा सतका आपल्या हातांनी उतरता केला.


हळुवार हातांनी संभाजीराजांनी बाळराजे आपल्या हाती घेतले. वेरूळच्या पहाड़ी लेण्यांकडे बघावे तसे ते हातीच्या बाळलेण्याकडे बघत राहिले. सोयराबाईंनी आकाशीचा चंद्र जसा खुडून आणून साऱ्यांच्या हाती दिला होता !

बाळराजांच्याकडे बघताना संभाजीराजांना वाटले, “नक्की. " पादशाही पालथी घालतील.' नक्कीच हे उभी काही तरी मनी धरून राजे आता संभाजीराजांना अष्टौप्रहर स्वतः संगती घेऊ लागले. - फडावरची कलमदानाची कामे कशी चालतात, पत्रावर दस्तुर कसा लावतात, शिक्कामोर्तब कसा करतात, कथला कोण पद्धतीने ऐकून घ्यावा, निवाडा मंत्रिगणांच्या मसलतीने सावचित्ताने कसा द्यावा, मर्दानगी करणाऱ्या हत्यार, कडे बसून त्याचा म कैसा करावा, कुणबियास राजेपणाचा धीर दिलासा देऊन त्याला तवानगी येईल तसे असे बागवावे, परदरबारचा हेजिब आल्यास त्याकडून मनाचा मतलब अल्लाद घ्यावा, 'डावे जाणा-यास' सलगी देऊन त्यास थोरपण कैसे बहाल करावे, हा सार राज्यकारभारी कुलकरिणा स्वतः राजे संभाजीराजांच्या कानी घालू लागले.


आता फडावरच्या मंडळींशी संभाजीराजांचा निकटीचा संबंध येऊ लागला. त्यातील कारकुनी पद्धतीची मोड बैठक घेणारे, हातीचे शहामृग पीस कुरुकुरु चालविताना हस्तलेख वळणदार यावा म्हणून मान तिरकी करणारे, काही खा मतलबाचे लिहिण्यापूर्वी मध्येच थांबून वरच्या छतास डोळे देणारे चिटणीस बाळाजी आवजी.


आबासाहेबांनी ‘पंत ऽ' अशी हलकीच साद घालताच " जी स्वामी 5 लपकन कमरेत झुकणारे, केळीच्या मोन्यासारखे सतेज दिसणारे, कपाळीचा घ म्हणत हमेश एक आकारात ठेवणारे, कमरेच्या हत्यारावर हाताची बोटे चाळवीत असताना कुणीही “ पंत ऽ ' असे हाकारताच त्या बोटांची मूठ पक्की बसती करणारे, कमी घेरांच्या गोल, डाळिंबी पगडीचे पेशवे मोरोपंत पिंगळे.


काही खाशी मसलत पेश करण्यापूर्वी "आमची पेश अर्जी ऐसी की" असे म्हणत छातीच्या दुबाजूंनी कमरेपर्यंत आलेल्या लालकाठी उपरण्याचे शेव मुठीत घट्ट धरणारे, पेडापेडांच्या गोल घेरबाज पगडीचे, मूळचे लहान डोळे हसताना मुळीच न दिसणारे सुरनीस आण्णाजी दत्तो.


आबासाहेब आता कोणतीही 'वस्त रुजू करायला सांगतील म्हणून काढता पाय तयारीत ठेवणारे, मोहरा, रुपये, डाग, वसूल असे हिशेबी शब्द योजणारे मुजुमदार निळो सोनदेव.


ही सारी मंडळी संभाजीराजांना राजांच्या एवढीच अदब देत होती. संभाजीराजांना त्यांच्याबद्दल, प्रसंगी त्यांची पायधूळ मस्तको घ्यावी असा आदर वाटत होता. ही सर्व माणसे राजांच्या खास विश्वासातील होती. कर्तबगारीने, सचोटीने इमानाने त्यांनी आपापली पदे कमावली होती.