मालोजी
भोसलेचा मृत्यू
शाहजीच्या जन्मानंतर थोड्या
वर्षांनीच मालोजीचा मृत्यू झाला. उपलब्धसाधनांमधे ह्या
घटनेचा नेमका दिवस
सापडत नाही. शाहजीच्या जन्मानंतर पाचवर्षांनी मालोजी
वारला असे शिवभारतात म्हंटले आहे.
शाहजीचा जन्म सन १५९९
चाधरला तर ह्या
घटनेला सन १६०४
च्या आसपास बसवावे
लागते. पण इतरसाधनांप्रमाणे मालोजी
२३ मे १६१०
पर्यंत जिवंत होता.
त्यामुळे उपलब्धसाधनांआधारे
मालोजीचा मृत्यू इंदापूरजवळच्या एका
लढाईत ११ नोव्हेंबर १६११पूर्वी झाला
असे म्हणता येईल.
मालोजीची पत्नी उमाबाई सती गेली नाही.बहुदा दोन लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असावा.ह्या दुखद घटनेनंतर मालोजीचा भाऊ विठोजी, याने शाहजी व शरीफजीचा सांभाळकेला. त्याने निजामशाहकडून मालोजीची जाहगीर त्यांच्या नावे मिळवून दिली.दोन्ही मुले लहान असल्याने विठोजीला जाहगिरीची देखरेख करण्याकरीता नेमण्यातआले.
मालोजीची पत्नी उमाबाई सती गेली नाही.बहुदा दोन लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असावा.ह्या दुखद घटनेनंतर मालोजीचा भाऊ विठोजी, याने शाहजी व शरीफजीचा सांभाळकेला. त्याने निजामशाहकडून मालोजीची जाहगीर त्यांच्या नावे मिळवून दिली.दोन्ही मुले लहान असल्याने विठोजीला जाहगिरीची देखरेख करण्याकरीता नेमण्यातआले.
परमानंद कवींनी मालोजींचे फार प्रभावीपणे वर्णन केले आहे. (शिवभारतात)
देवगिरीकर यादवांचा १४ व्या शतकाच्या सुरुवातीसच अल्लाउद्दीन खिलजीनेविशेषत: त्याचा लाडका सरदार मलिका काफूर यास पाठवून पाडाव केला होता.त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्षांचे आत मालोजींनी सुपे परगणा जिंकला होता.भीमेच्या आसपासचा अत्यंत विस्तीर्ण प्रदेश पादाक्रांत करून जिंकून जहागिरीप्रस्थापित केली होती आणि काही वर्ष सत्ता राबवली. दुर्दैवाने इंदापूरयेथील लढाईत त्यांचा मृत्यू झाला. आज ज्यांची समाधी जेमतेम दोन तीन गुंठाजमिनीवर दुर्लक्षित, उपेक्षित, असुरक्षित स्थितीत आहे.

