
साल्हेरचा बुलंद किल्ला हा
महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १५९३
मीटर्स आहे. त्याच्या शेजारील सालोटा या डोंगरावरही दुर्ग उभारला आहे. तो
साल्हेरचा उपदुर्ग आहे. एका दुर्गाच्या शेजारचा मोकळा डोंगर दुर्गाला घातक
ठरतो, म्हणून जवळच्या डोंगरावरही बांधणी करून दुर्ग उभारतात. हा नाशिक
जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरीदुर्ग आहेत. या गिरीदुर्गामध्ये
महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यातच आहे.
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे. तो सध्या
सटाणे या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत
जास्त किल्ले सटाणे तालुक्यातच आहेत.
साल्हेरहून उत्तर ईशानेला तांबोळ्या, रतनगड
(नाहवा ) हे दुर्ग तर मांगी-तुंगीची शिखरे दिसावयास लागतात. पश्चिमेला
अजंटा-सातमाळा रांग दिसते. सह्याद्रीला रौद्रतेची कल्पना यावयास लागते.
साल्हेरच्या चारही बाजूस कडे आहेत. त्यामुळे तटबंदी फार कमी आहे.
पश्चिमेकडचा कडा उत्ताल आहे. साल्हेर गावाकडून तशीच माळदर-वाघांबे
गावाजवळच्या खिंडीतून साल्हेरवर यावयास पायवाट आहे. इ.सन १६७१-७२ मध्ये
शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. त्यांच्याकडून तो परत जिंकून
घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला
वेढा घातला. तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव
गुजर यांना पाठीवले. इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता. एक तर्फेने
लष्करांनी घोडी घातली. एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली. मोठे
युद्ध जाहले. मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती. मराठी फौज त्यांच्या
सुमारे पन्नास हजार इतकीच होती. मोगल,पठाण,रजपूत,तोफची, हत्ती, उंट,आराबा
घालून युद्ध जाहले. जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजांकडे गणतीस आले.
सवाशे हत्ती सापडले. सहा हजार उंट सापडली. मालमत्ता, खजिना, जडजवाहीर, कापड
अगणित बिछाइत हातास लागली. बेवीस वजीर नामांकित धरिले. खासा इख्लासखान
पाडाव झाला. हजार-दोन हजार सडे, सडे पळाले असे युद्ध जाहले. या युद्धात
शिवाजीराजांचे एक सहकारी पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार
सूर्याजी काकडे हा छोट्या तोफेचा गोळा लागून पडले. महाराज म्हणाले, ‘ माझा
सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता.’ साल्हेरच्या युद्धाचा
मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. ते शिवाजी अजिंक्य आहे असे मानू
लागले.
गडावरील पाहण्याची ठिकाणे –
साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैऋत्येकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो. येथे उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदीस्त केलेली आहे. माचीमधून पायवाटेने आपण उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते. ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते.
माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. घरांची जोतीही या भागात पहायला मिळतात. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.
साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैऋत्येकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो. येथे उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदीस्त केलेली आहे. माचीमधून पायवाटेने आपण उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते. ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते.
माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. घरांची जोतीही या भागात पहायला मिळतात. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.
गडाच्या माथ्यावर मंदिर आहे. हे मंदिर
रेणूका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. या माथ्यावरुनच बाण मारुण
परशुरामाने कोकणची निर्मिती केली. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची
उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले.
अशी कथा येथे ऐकवली जाते. समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला
आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण
मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. साल्हेरच्या माथ्यावरुन अचला, अहिवंत
मार्कींडय़ा, खळा-जवळा, धोडप, कांचन, राजवेहेर, चौल्हेर, भिलाई, मुल्हेर,
मोरा, रतनगड, पिसोळ, देरमाळ असे जवळजवळ २५ किल्ले दिसतात. तसेच जवळच्या
सालोटा किल्ल्याचे तसेच टकारा सुळक्याचे दर्शन उत्तम होते.
गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर
विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. गंगासागर
तलावातील पाणी पिण्यायोग्य नसून त्याच्या आजूबाजूला जोडून असलेल्या दोन
टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे. येथील स्थानिक भाषा हि “अहिराणी” /
“ऐरणी” आहे. ती मराठी मिश्रित भाषा आहे.