तिहास
निवती
किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवरायांच्या कालखंडात झाली,सन १७४७ साली हा
किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला.पोर्तुगीजांच्या ताब्यातून हा किल्ला
सावंतवाडीकर फोंड सावंत यांच्या ताब्यात आला.पुढे करवीर कोल्हापूर
संस्थानाच्या ताब्यात हा किल्ला आला.सन १८१८ साली इंग्रजांच्या ताब्यात हा
किल्ला आला.
|
सध्या
किल्याची मोठी पडझड झाली आहे.याची साक्ष आहे किल्ल्यावरची ढासळलेली
तटबंदी व बुरूज.किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचे मनमोहक रूप
दिसते.किल्ल्याच्या मागल्या बाजूला देवबाग आणि भोगावेचा पांढराशुभ्र
किनारा दिसतो.तर समोरून निवतीच्या वाडीचा निळा समुद्र डोळ्याचे पारणे
फेडतो.
|
|
|
डॉल्फिन दर्शन हे निवतीचे आकर्षण आहे,निवतीच्या किनाऱ्यावरुनही डॉल्फिन दर्शन होते.अर्ध्या तासात सगळा किल्ला पाहून होतो.
|
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
निवती
गावात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मान्यता दिलेल्या ठराविक अशा
घरांमधून अस्सल कोकणी वातावरणाचा अनुभव घेत मुक्काम करता येईल. ताजे मासे
आणि त्याला सोलकढीची जोड, कोल्हापूरी भाषेत बोलायचे तर नाद खुळा, असे
कोकणी जेवण येथे मिळते.शाकाहारी पर्यटकांसाठीही चांगली व्यवस्था आहे.पुणे-कोल्हापूर-कणकवली-कुडाळ-निवती,मुंबई-चिपळूण-कुडाळ-निवती तसेच पणजी-शिरोडा-वेंगुर्ले-मार्गे निवतीला पोहचू शकता.
