कोणतही शिवकाव्य येथे शोधा

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५२


कराडचे सरदार डुबल घराणे भाग ४

अग्नोजींचे वंशज सध्या धुळगाव येथे वास्तव्यास आहेत. अग्नोजींना माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांनी दंडोबाच्या पायथ्याशी कपटाने मारले. त्यानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई सती गेल्या. त्यांची समाधी मिरजेत आहे.चारशे वर्षांची लष्करी परंपरासाळोखे-डुबल घराण्याला चारशे वर्षांहून अधिक काळाची लष्करी परंपरा आहे. बाळोजी, शिदोजी, शिवाजी, अग्नोजी, नाथाजी, आनंदराव, हणमंतराव, अमृतराव या व्यक्तींनी मराठेशाहीत पराक्रम गाजवला. साळोखे-डुबल घराण्याची पराक्रमाची ही परंपरा मराठेशाहीच्या अस्तानंतर आजतागायत टिकून आहे. पहिल्या महायुध्दात धुळगांवच्या रामचंद्रराव बळवंतराव आणि ज्ञानोबा बळवंतराव यांनी मोठा पराक्रम गाजवला. रामचंद्र यांनी पहिल्या महायुध्दात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पदके मिळाली होती. दुसरे महायुध्द, भारत-चीन युध्द, भारत-पाकिस्तान युध्द, कारगील युध्द अशा विविध लढायांत डुबल घराण्यातील व्यक्तींनी पराक्रम गाजवला आहे. सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात धुळगांव येथील विश्वासराव डुबल हे शहीद झाले. आजही कराड, बांबवडे, नरवाड, चरेगाव, धुळगांव येथील 250 हून अधिक डुबल व्यक्ती लष्करात विविध पदांवर कार्यरत आहेत.स्वातंत्र्यलढय़ात सहभागडुबल घराण्याने मराठेशाहीत स्वराज्य रक्षणासाठी काम केले. ब्रिटीशकाळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी डुबल घराण्यातील व्यक्तींनी काम केले आहे. कराड, चरेगाव, धुळगांव येथील काही व्यक्तींनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. भूमिगत देशभक्तांना डुबल मंडळींनी आश्रय दिला होता.
Image may contain: outdoor

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५१


कराडचे सरदार डुबल घराणे भाग ३

शिवाजी साळोखेही आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी होते. त्यांनी उदाजी चव्हाणासह, अन्य सरदारांचे हल्ले परतवून लावले. मिरज प्रांत आणि किल्ल्याचे संरक्षण केले. 1755 पर्यंत मिरजेचा किल्ला आणि प्रांत शिवाजी साळोखेंच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी मिरज किल्ला माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांच्या ताब्यात दिला.शिवाजी साळोखे-डुबल यांनी त्यानंतर कर्नाटक प्रांतातील हैदरवरील स्वाऱयांत सहभाग घेतला. या स्वारीत असतानाच तुंगभद्रेनजीक त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सुपूत्र नाथाजीराव हेही पराक्रमी होते. त्यांनी कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभाग घेतला.सरदार अग्नोजी साळोखेशिवाजी साळोखेंचे धाकटे बंधू अग्नोजी साळोखे हेही पित्याप्रमाणे शूर होते. त्यांना धुळगाव येथे सरंजाम नेमून देण्यात आला होता. अग्नोजी साळोखेंना धुळगांवजवळील काही गावे मोकासा दिली होती. सोनीचे ठाणे काही काळ अग्नोजींकडे होते. उदाजी चव्हाणावरील लढायात अग्नोजी अग्रभागी होते.
Image may contain: 1 person

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५०

कराडचे सरदार डुबल घराणे भाग २

कराड पेठेचे महाजनपद आणि देशचौगुले वतनकराड हे प्राचीन काळापासून व्यापारासाठी प्रसिध्द होते. सातवाहनकालापासून येथे मोठा व्यापार होता. त्यामुळे कराडची पेठ त्याकाळात संपूर्ण देशभरात प्रसिध्द होती. या प्रसिध्द पेठेचे महाजनपद डुबल घराण्याकडे होते. सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीतझालेल्या पालीच्या महजर (निवाडा) मध्ये साक्षीदारांच्या यादीत शिवाजी बिन बाळोजी डुबल यांचे नाव आढळते. त्यामुळे शिवपूर्वकालापासून कराडचे महाजनपद या घराण्याकडे होते, असे अनुमान बांधता येते. बाळोजी साळोखे हे या घराण्याचे मुळपुरूष होत. महाजनपदाबरोबरच कराड प्रांतातील देशचौगुलेपणाचे वतनही या घराण्याकडे होते. सध्याच्या कराड, पाटण आणि सांगली जिल्हय़ातील काही गावे या देशचौगुले वतनासाठी डुबल घराण्याकडे असल्याचे आढळते.छत्रपती शाहूंचे आप्तबाळोजी डुबल (दुसरे) यांच्या पत्नी राणूबाई आणि साताराचे छ. शाहूंच्या पत्नी सकवारबाई या बहिणी होत. या आप्तसंबंधामुळे बाळोजींचा सातारच्या दरबारात प्रवेश झाला. तेथे त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कामाने छ. शाहूंचा विश्वास संपादन केला. सेना पंचसहस्त्री हा किताब मिळवला. तत्कालीन अनेक लढय़ात बाळोजींनी सहभाग घेतला.मिरजेचे किल्लेदारपदछ. शाहूंनी 1739 साली मिरजेच्या किल्ल्यावर स्वारी करून हा किल्ला मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला. यानंतर त्यांनी हा किल्ला आणि मिरज प्रांताचा कारभार बाळोजींकडे सोपवला. सन 1745 पर्यंत बाळोजींनी मिरज प्रांतांचा कारभार नेटाने केला. बंडखोर सरदार उदाजी चव्हाण याच्या स्वाऱया परतवून लावल्या. मिरज प्रांताची घडी नीटबसवली. मिरज किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी बाळोजींना छ. शाहूंकडून तासगांव गाव मोकासा इनाममिळाले होते. तर, मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गावही पूर्ण इनाम मिळाले. बाळोजींनी आपले कुलदैवत असणाऱया म्हसवड येथील सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोध्दार केला. बाळोजींचे बंधू शिदोजी हे उंबरच्या स्वारीत धारातीर्थी पडले. त्यांच्या या कामगिरीचे स्मरण म्हणून छ. शाहूंनीबाळोजींना चरेगाव इनाम दिले.सरदार शिवाजी साळोखेबाळोजींचा मृत्यू 1745-46 च्या सुमारास झाला. त्यानंतर त्यांचे सुपूत्र शिवाजी साळोखे (दुसरे) हे काम पाहू लागले
Image may contain: outdoor

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४९


कराडचे सरदार डुबल घराणे भाग १

स्वराज्य रक्षणासाठी दक्षिण महाराष्ट्रातील ज्या सरदार घराण्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा अग्रकमाने आहे. सातारा आणि सांगली जिल्हय़ात वास्तव्यास असणाऱया या घराण्याचा सुमारे 400 वर्षांहून अधिक कालखंडाचा इतिहास
स्वराज्याच्या उदयकाली महाराष्ट्रात अनेक लढवय्यी घराणी निर्माण झाली. त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्त्वाने मराठेशाहीत आगळा ठसा उमटवला. या घराण्यांमध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. साताराच्या छत्रपती शाहू महाराजांचे आप्त असणाऱया या घराण्यातील व्यक्तींनी प्रसंगीप्राणांची आहूती देऊन स्वराज्यरक्षण केले आहे. या घराण्याच्या शाखा कराड, धुळगाव, बांबवडे, चरेगाव, नरवाड येथे आहेत. या घराण्याला 400 वर्षांहून अधिक काळचा इतिहास आहे.साळोखे-डुबल घराणे हे गुजरातच्या चालुक्यांचेवंशज आहेत. शिवपूर्वकालात हे घराणे महाराष्ट्रात आले असावे. हे घराणे पहिल्यांचा कराड येथे स्थायिक झाले. त्यानंतर या घराण्यातीलव्यक्तींनी आपल्या कर्तृत्त्वाने विविध अधिकारपदे मिळवली. कराड पेठेचे महाजनपद, कराड प्रांताचे देशचौगुले वतन, मिरजेच्या भुईकोट किल्ल्याचे किल्लेदारपद, सांगली संस्थानचे सरंजामदार अशा अनेक पदावर डुबल घराण्यातील व्यक्ती कार्यरत होत्या. आजही हे घराणे राजकारण, समाजकारणात कार्यरत आहे
Image may contain: 1 person

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४३


१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १६

संजय सोनावणे

या चढाईने रोहिल्यांच्या पदरात काय पडले ? युद्धाच्या आरंभी रोहिल्यांची फौज अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान होती. यातील हजार - पाचशे लोक आरंभी गारद्यांच्या तोफांमुळे निकामी झाले असावेत. पुढे काहीजण, मराठी स्वारांशी लढताना ठार वा घायाळ झाले तरी अशांची संख्या पाचशेपेक्षा कमी किंवा हजारपेक्षा जास्त असणे शक्य नाही. सारांश, जवळपास सतरा - अठरा हजार रोहिले गारद्यांवर चालून गेले असे म्हणता येईल. त्यापैकी तीन ते पाच हजाराच्या आसपास लोक, गारदी सैनिकांच्या बंदुकींना बळी पडले असतील. पुढे गारद्यांशी झालेल्या हातघाईच्या लढाईत देखील जवळपास पाच ते सहा हजार मनुष्य जखमी / मृत झाले असतील. याचा अर्थ असा होतो कि, दुपारी एकच्या सुमारास रोहिला सैन्य जेव्हा परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहिले, त्यावेळी त्याची संख्या आठ - दहा हजारांच्या दरम्यान असावी. थोडक्यात, मोठ्या प्रमाणावर आपली माणसे मारून घेण्यापलीकडे, रोहिला सरदारांच्या पदरात फारसे यश पडले नाही असे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. परंतु अधिक विचार करता, रोहिल्यांना या चढाईत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असावे असे वाटते.
पानिपत मोहिमेत सहभागी झालेल्या गारदी सैन्याची संख्या एकूण किती होती याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नाही. उदगीर मोहिमेत गारद्यांचे पथक पाच हजारांचे होते असा उल्लेख शेजवलकर करतात. पुढे उत्तर हिंदुस्थानात जायचे ठरल्यावर त्यात आणखी भर घालून ते आठ हजाराचे बनवण्यात आले. पुढे या सैन्यात आणखी भरती झाली असल्याची माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय या सैन्याचे स्वरूप देखील फारसे स्पष्ट होत नाही. कवायती पलटणे म्हटल्यावर त्यासोबत काही हजार स्वारांचा रिसाला असतो. इब्राहिमच्या पलटणींसोबत असा रिसाला होता का ? काशीराजच्या मते, इब्राहिमकडे दोन हजार स्वार होते. परंतु कैफियतीमध्ये असा उल्लेख आढळत नाही. पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, इब्राहिमजवळ दोन हजार स्वारांचा रिसाला असावा असे वाटत नाही. एखादवेळेस, त्याच्याकडे स्वारांचे लहानसे पथक असू शकते. जर काशीराजच्या मतानुसार, इब्राहिमकडे दोन हजार स्वारांचा रिसाला असता तर, रोहिला सैन्य सहजासहजी माघार घेऊ शकले नसते. गारद्यांच्या घोडदळ पथकाने त्यांची कत्तल उडवली असती. परंतु, असे काही झाल्याचा उल्लेख नसल्याने व रोहिला सैन्य देखील यशस्वीपणे माघार घेऊन आपल्या मोर्च्यात उभी राहिल्याने, गारदी पलटणींसोबत दोन हजार स्वारांचा रिसाला नसल्याचे सहज सिद्ध होते. पानिपत युद्धाच्या वेळी इब्राहिमकडे सामान्यतः आठ ते नऊ पलटणी असाव्यात. त्यातील दोन त्याने अफगाण सैन्याच्या समाचारासाठी डाव्या बाजूला ठेवल्या होत्या तर उर्वरीत सात पलटणींच्या मदतीने त्याने रोहिल्यांच्या सामना केला. रोहिला फौजेचा सामना करून त्यांना पळवून लावण्यात गारदी यशस्वी झाले. पण या संघर्षात त्यांच्या जवळपास पाच पलटणी निकालात निघाल्याने त्यांचे सामर्थ्य देखील खच्ची झाले. फिरून लढाईला उभे राहण्याचा प्रसंग उद्भवला तर अवघ्या तीन - चार पलटणी हाताशी असल्याने, त्यांना शत्रूचा मुकाबला करणे तितकेसे सोपे जाणार नव्हते. याचा अर्थ असाही होतो कि, मराठी सैन्याची डावी बाजू यावेळी निकालात निघाली नसली तरी पक्षाघात झाल्याप्रमाणे ती काहीशी लुळी पडू लागली होती. गारदी सैन्याची हि स्थिती पाहता, रोहिल्यांची चढाई पूर्णतः नसली तरी अंशतः यशस्वी झाल्याचे दिसून येते. जरी गारद्यांनी, रोहिला सैन्याला पळवून लावले असले तरी त्यांचा मोर्चा कायम होता. आपल्या मोर्च्याच्या आधाराने त्यांना फिरून फळी बांधून, गारद्यांवर चढाई करण्यास मोकळीक राहिली.
No automatic alt text available.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४२


१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १५

संजय सोनावणे

शत्रू सैन्याचा एक विभाग, मुख्य फळी पासून अलग होऊन पुढे सरकत असल्याचे गारद्यांच्या लक्षात आले. शत्रूचा बेत आपल्या डाव्या बगलेवर चालून यायचा असल्याचे गारदी अंमलदारांनी हेरून, डाव्या बाजूने चालून येणाऱ्या शत्रू सैन्याला रोखण्यासाठी त्यांनी, त्या बाजूला दोन पलटणी तैनात केल्या.
रोहिला फौज आक्रमणासाठी सिद्ध होताच सरदारांच्या आज्ञेने इशारतीची निशाणे फडकली, वाद्ये वाजू लागली व पाठोपाठ रोहिल्यांची फौज गारद्यांच्या दिशेने पुढे सरकू लागली. गारदी पलटणींवर प्रथम रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी हल्ला केला असावा कि पायदळाने ? पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, आरंभी रोहिल्यांचे घोडदळ, गारदी पलटणींवर चालून गेले. याचा परिणाम म्हणजे, शेकडो स्वार जखमी मरण पावले तर कित्येक जखमी झाले.
शत्रूसैन्य एका विशिष्ट अंतरावर येताच गारद्यांनी गोळीबारास आरंभ केला. तत्कालीन बंदुकांची रेंज काय असावी ? माझ्या मते ती काही मीटर्स पर्यंत मर्यादित असावी, पण नेमकी किती हा प्रश्न शिल्लक राहतोच ! अमेरिकेच्या यादवी युद्धांत ज्या बंदुका वापरण्यात आल्या, त्यांची रेंज ३०० यार्ड, अर्थात सुमारे पावणे तीनशे मीटर्स इतकी असल्याचा उल्लेख इंटरनेटवर मिळतो. जर हि रेंज गृहीत धरली तर, स. १७५- ६० च्या काळातील बंदुकांची रेंज १०० - १५० मीटर्स इतकी तरी असावी असा अंदाज बांधता येतो. या ठिकाणी हे मान्य करतो कि, या आकडेवारीस याहून अधिक सबळ पुरावा, निदान या क्षणी माझ्याकडे नाही. तसेच याशिवाय इतरत्र कोठून माहिती मिळत नसल्याने, मला हीच आकडेवारी गृहीत धरून चालणे भाग आहे.
गारद्यांच्या गोळीबारामुळे रोहिला घोडेस्वार हतबल झाले. रोहिल्यांकडे किती प्रमाणात पायदळ होते याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, घोडदळाच्या मानाने ते फारचं कमी असावे हे निश्चित ! या रोहिला सैनिकांची शस्त्रे सामान्यतः तलवार, भाले, जंबिये, कट्यारी, सुरे इ. होती. त्याशिवाय काही जणांकडे बंदुका देखील होत्या. परंतु, नजीब वगळता इतर कोणत्याही रोहिला सरदाराकडे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख आढळत नाही ! रोहिला घोडेस्वार, गारद्यांची फळी फोडण्यास अपयशी ठरत आहेत हे पाहून बहुतेक, रोहिला सरदारांनी आपल्या घोडदळास मागे बोलावले असावे व पायदळ विभागाला गारद्यांवर चालून जाण्याचा आदेश दिला असावा. किंवा असेही असू शकते कि, रोहिल्यांचे घोडदळ जेव्हा गारद्यांवर चालून गेले, त्याचवेळी त्यांचे पायदळ देखील पाठोपाठ पुढे सरकले असावे. रोहिला स्वार, गारद्यांच्या गोळीबारामुळे अथवा सरदारांच्या आदेशाने बाजूला सटकले असावे किंवा मागे निघून गेले असावेत. घोडदळ बाजूला सरकताच / मागे हटताच रोहिला पायदळ गारदी पलटणींवर तुटून पडले असावे. गारदी सैन्यावर, रोहिल्यांनी कशा प्रकारे हल्ले केले असावेत याविषयी कसलाच अंदाज किंवा तर्क करता येत नाही अथवा केल्यास, अमुक एक प्रकारे हल्ला झाला असावा असेही ठासून सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे व ती म्हणजे, गारद्यांची फळी फोडण्याचे कार्य रोहिला पायदळाने केले ! रोहिल्यांच्या पायदळाने, गारद्यांची फळी फोडून हातघाईची लढाई आरंभली. गारद्यांनी देखील शक्य तितक्या ताकदीने शत्रूचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. अखेर, दुपारी एकच्या आसपास गारदी - रोहिला सैन्याची हि भयंकर झुंज संपुष्टात आली. प्रचंड प्रमाणात नुकसान सोसून रोहिले मागे हटले.
No automatic alt text available.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४१


१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १४

संजय सोनावणे

मराठी घोडेस्वार जेव्हा रोहिल्यांच्या मोर्च्यावर चालून गेले तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी रोहिला घोडेस्वार पुढे सरसावले. आरंभी रोहिला स्वारांनी नेटाने झुंज दिली खरी पण लवकरचं त्यांना माघार घ्यावी लागेल अशी चिन्हे दिसू लागली. अशा स्थितीत रोहिल्यांचे पायदळ, आपल्या स्वारांच्या मदतीला धावून आले. रोहिला स्वारांना नवीन कुमक आल्यामुळे त्यांचा जोर वाढला. तुलनेने मराठी सैन्याची संख्या कमी असल्याने त्यांना माघार घेणे क्रमप्राप्त होते. मुळात, या मराठी सैन्याची संख्या साधारणतः पाच - सहा हजारांच्या आसपास असावी. समशेरबहाद्दर, अंताजी माणकेश्वर या हल्ल्यात सहभागी होते कि नव्हते याची माहिती मिळत नाही. हे जर अशा हल्ल्यात सहभागी असतील तर मराठी सैन्याची संख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास जाते. परंतु यांचा सहभाग असल्याबद्दल निश्चित माहिती मिळत नसल्याने हे यावेळी गोलात उभे होते असेच गृहीत धरावे लागते. असो, सुमारे पाच - सहा हजार मराठी स्वारांनी, अठरा ते वीस हजार रोहिल्यांवर चाल करून आरंभी जरी थोडेफार यश मिळवले असले तरी, शत्रूचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांना माघार घेणे एकप्रकारे भाग पडले. रोहिला पायदळ सैन्याने, मराठी स्वारांवर बंदुकींचा मारा केल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली असे जे सांगितले जाते त्यात फारसे तथ्य नाही. याचे कारण म्हणजे, रोहिल्यांपैकी फक्त नजीबाकडे अशा तऱ्हेचे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख मिळतो. इतर रोहिला सरदारांकडे अशा धर्तीची बंदुकधारी पलटणे असल्याचा उल्लेख आढळत नाही. अर्थात, ज्या रोहिला पायदळ सैनिकांकडे बंदुका होत्या त्यांनी, मराठी स्वारांवर गोळीबार केलाच नसेल असे म्हणता येत नाही पण, रोहिल्यांच्या गोळीबारामुळे मराठी घोडेस्वार मागे फिरले असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! त्याचप्रमाणे, मराठी घोडेस्वार माघार घेऊन आपल्या गोलाकडे निघाले तेव्हा रोहिला सैन्याने त्याचा पाठलाग करत थेट गारदी पलटणींवर चाल केली असे म्हणता येत नाही ! वस्तुस्थिती लक्षात न घेता आपल्या इतिहासकारांनी या घटनेचे बरेच अतिरंजित वर्णन केले आहे. समजा, काही क्षण असे गृहीत धरू कि, मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलात परत निघाले असताना रोहिला सैन्य त्यांच्या पाठी लागले व गारदी पलटणींवर तुटून पडले. आता अशा प्रकारचे वर्णन लिहिण्यास फक्त कल्पनाशक्तीची गरज आहे, पण असे काही वास्तवात घडू शकते का ? पाच ते सहा हजार मराठी स्वारांशी आरंभी आठ - दहा हजार रोहिला घोडेस्वार लढत होते. नंतर जवळपास तीन - चार हजार पायदळ शिपाई त्यांच्या मदतीस आल्याने मराठी घोडदळ मागे फिरले. याचा अर्थ असा कि, रोहिल्यांचे पायदळ व घोडदळ एकमेकांत मिसळून गेले असल्याने एकाचवेळी, मराठी स्वारांवर शत्रूच्या घोडेस्वाराशी व पायदळ सैनिकाशी झुंज देण्याचा प्रसंग ओढवला. अशा स्थितीत माघार घेण्याशिवाय त्यांच्यासमोर इतर पर्याय नसल्याने त्यांनी काढता पाय घेतला. मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलाच्या दिशेने परत जात आहेत हे पाहिल्यावर, लगेचचं रोहिल्यांचे घोडेस्वार आणि पायदळ, सरमिसळ झालेल्या स्थितीत, एकप्रकारे धावत त्यांच्या पाठी लागून गेले असे म्हणायचे तर रोहिला शिपाई आपल्या स्वारांच्या बरोबरीने धावत गेले असे गृहीत धरावे लागेल. त्याशिवाय, ज्या सैनिकांना आपल्या स्वारांच्या सोबत धावायला जमले नाही अथवा जे धावता - धावता तोल जाऊन किंवा ठेच लागून पडले त्यांना मागच्या बाजूने येणाऱ्या पायदळ सैनिकांनी / स्वारांनी तुडवले असेही मग गृहीत धरावे लागेल. याचा अर्थ असा होतो कि, अशा घाई - गडबडीच्या स्थितीत रोहिल्यांचे सर्वसाधारण हजार - दोन हजार शिपाई तरी निकामी झाले असावेत. आता प्रश्न असा निर्माण होतो कि, त्यावेळचे रोहिला सरदार किंवा त्यांचे अधिकारी काय मूर्ख होते ? आपल्या सैन्याला असे स्वतःच्या लष्कराच्या व जनावरांच्या पायाखाली तुडवून मारण्याची त्यांना हौस होती ? लढायांची काल्पनिक वर्णने देताना कमीतकमी वस्तुस्थितीची जाणीव ठेवण्याचे भान, निदान इतिहास लेखकांनी तरी बाळगण्याची गरज आहे ! वस्तुतः, मराठी सैन्याचा निर्णायक पराभव झाला नसून त्यांनी फक्त माघार घेतली होती. त्यांचे मुख्य लष्कर अजून कायम होते. मराठी स्वारांच्या माघारीला पळाचे स्वरूप आले नव्हते. या कारणांमुळे रोहिला सैन्य, मराठी स्वारांचा पाठलाग करत थेट गारदी पलटणींवर चालून गेले नाही. उलट, मराठी लष्कर मागे फिरताच, रोहिल्यांनी प्रथम आपल्या सैन्याची शिस्त बांधली. पायदळ - घोडदळ जे एकत्र झाले होते, ते वेगवेगळे होऊन उभे राहू लागले. दरम्यान रोहिला सरदार व अफगाण सरदार अमीरबेग, बरकुरदारखान यांच्यात चढाई विषयी चर्चा किंवा सल्ला मसलत घडून आली. त्यानुसार रोहिल्यांनी, गारदी पलटणींवर समोरून हल्ला करायचा तर अफगाण सरदारांनी, गारद्यांच्या डाव्या बगलेवर चालून जायचे असे ठरवण्यात आले. अमीरबेग व बरकुरदार सोबत साधारणतः चार - पाच हजार स्वार असावेत. या सैन्याजवळ तोफखाना बहुतेक नसावा, आणि असल्यास त्या तोफा फारतर लहान व वजनाला हलक्या अशा असाव्यात. त्यामुळेचं या सैन्याला अल्पावधीत, गारद्यांच्या डाव्या अंगावर चालून जाता आले.
No automatic alt text available.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४०


१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १३

संजय सोनावणे
विंचूरकर, पवार प्रभूती सरदार रोहिल्यांवर चालून गेले. मराठी घोडेस्वार वेगाने धावून येत असल्याचे पाहिल्यावर रोहिले देखील मोर्च्यातून बाहेर पडले. रोहिल्यांच्या फौजेत स्वार किती होते व पायदळ किती होते याची निश्चित आकडेवारी मिळत नाही पण, त्यांच्या सैन्यात घोडेस्वारांचे प्रमाण अधिक असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांच्याकडे पायदळ होते पण त्याचे प्रमाण एकूण सैन्याच्या मानाने किती होते हे सांगता येत नाही. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे, रोहिला पायदळ हे बंदुकधारी असल्याचे जे सांगितले जाते ते अर्धसत्य आहे ! सर्वचं रोहिला शिपायांकडे बंदुका होत्याचं असे नाही.
मराठी घोडदळ जेव्हा रोहिल्यांवर चालून गेले तेव्हा त्यांचा मुकाबला प्रथम कोणी केला असावा ? रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी कि पायदळ शिपायांनी ? तेव्हाची हल्ल्याची किंवा बचावाची पद्धत कशी असावी ? शत्रूवर चालून जाताना आक्रमक सैन्य, विशेषतः घोडदळ हे एकमेकांना काहीसे बिलगून, फळी धरून जात असे. पायदळ सैन्य असेल तर काही एक अंतरापर्यंत ते शिस्तीने चालत जात असे व त्यानंतर पुढे धावून जाताना मात्र सैन्याची शिस्त बिगडून ते काहीसे विस्कळीत होत असे. बचाव करणारे सैन्य, जर घोडेस्वार असतील तर, मोर्च्याच्या बाहेर येऊन काही एक अंतरावर फळी धरून उभे राहात किंवा ते देखील शत्रूवर चालून जात. परंतु बचावाची जबाबदारी जर पायदळावर असेल व घोडदळ त्यांच्यावर चालून येत असेल तर पायदळ सैनिक आपले भाले रोखून घोडेस्वारांचा मुकाबला करत. भाल्यांची लांबी सामान्यतः सात - आठ फूट असे. त्यामुळे भालाईत सैनिक आपल्या भाल्याच्या लांबीचा फायदा घेऊन स्वार अथवा घोड्यास लक्ष्य करत असे. एकदा स्वार घोड्यावरून खाली आला कि तो सावरेपर्यंत त्याचा निकाल लावता येई अथवा सरळ स्वारास लक्ष्य करता येत असे. त्यावेळी लढाईची देखील एक विशिष्ट पद्धत असे. आक्रमण करणाऱ्या किंवा बचाव करणाऱ्या सैन्याच्या लागोपाठ अशा रांगा असत. जोवर पुढील रांगेतील सैनिक / स्वार मृत वा जखमी होऊन खाली पडत नसे तोवर मागच्या रांगेत उभे असलेल्या सैनिकाला पुढे जाता येत नसे. आघाडीच्या फळीतील सैन्य लढत असे तेव्हा मागील रांगांतील शिपाई आरोळ्या ठोकून आपल्या सैनिकांचा उत्साह वाढवीत असत. आघाडीवर ज्या ठिकाणी सैन्य लढत असे त्या ठिकाणी हातातील शस्त्रांचा पुरेपूर वापर करण्याइतपत फारशी मोकळी जागा उपलब्ध नसे. त्यामुळे कित्येकदा तलवार, भाले बाजूला राहून कट्यारी, सुरे यांचा वापर केला जात असे किंवा मग सरळ गुद्दागुद्दी सुरु होत असे. लढाईत माघारीचा जेव्हा प्रसंग येई, तेव्हा मागचे सैनिक प्रथम पळत असत व पाठोपाठ आघाडीचे सैनिक येत असत. सैन्याची माघार कधी शिस्तबद्ध अशी असे तर कधी बेशिस्तपणे ! सैन्याने कच खाऊन माघार घेतल्यास त्याला पळाचे स्वरूप येत असे. कित्येकदा सैनिक हातातील शस्त्रे टाकून पळ काढत असत. सारांश, तत्कालीन युद्धपद्धतीचे स्वरूप काहीसे असे होते.
No automatic alt text available.