घोसाळगड
साधारण माहिती
रोह्यापासून तेरा किमी दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यामधे हा किल्ला आहे. तसा छोटा असणारा हा किल्ला रेवदंडा व साळवे ह्या दोन खाड्यांच्यामधे मोक्याच्या ठिकाणी बांघला आहे. पायथ्याशी घोसाळे नावाचे गाव आहे ज्यावरून ह्याला घोसाळगड हे नाव पडले. हा गड समुद्रसपाटीपासून २६० मीटर व पायथ्यापासून साधारण २०० मीटर उंच आहे.
उत्तर दक्षिण पसरलेला हा गड घोसाळे गावाच्या पश्चिमेकडे आहे. परिसरातील दाट झाडीमुळे वर जाणारी वाट थोडी शोधावी लागते. पावसाळ्यात व त्यानंतर इथली वाट नीट माहित नसल्यास गावातून वाटाड्या बरोबर घेणे कधीही चांगले. शिखराकडे जाणारी वाट आपल्याला इशान्येकडुन साधारण एका तासात वर नेते.
गडावर पाहण्यासारखे
इशान्याकडून येणारी वाट आपल्याला गडाच्या एका भागाकडे नेते. वरती पाण्याचे टाके, एक देऊळ व काही तोफा देखिल दिसतात. ह्याची दुहेरी तटबंदी सुद्धा बघण्यासारखी आहे. दक्षिणेकडच्या बुरूजावर ध्वजाची जागा आहे.
ह्या गडाचा दुसरा भाग, जो पहिल्यापेक्षा अधिक उंच आहे, त्याकडे थेट वरून जाता येत नाही. त्यासाठी पायथ्यापासून अग्नेयबाजूची वाट घ्यावी लागते. त्या भागात गडाचे काही अवशेष आहेत पण सर्वत्र प्रचंड रान माजलेले आहे. हा भाग उंच असल्याकारणाने इथून उत्तरेकडचा भाग मात्र नीट पाहता येतो.
इतिहास व ठळक घटना
हा गड नक्की कधी बांधला गेला ते पुराव्याअभावी सांगता येत नाही. तरी ह्याचे स्थान लक्षात घेता जंजी-याच्या सिद्दीने हा गड त्याच्या ताब्यात ठेवण्याचा बराच यत्न केलेला दिसतो. शिवाजीने हा किल्ला सन १६४८ च्या त्याच्या पहिल्या कोकण मोहिमेत घेतला.
शिवरायांच्या मृत्यूनंतर कधीतरी हा किल्ला सिद्दीकडे गेला. त्यानंतर सन १७३५ मधे बाजीरावाने हा जिंकून पुन्हा मराठ्यांकडे आणला. सन १८१८ मधे शेवटच्या इंग्रज - मराठा युद्धात कर्नल प्रॉथरने रायगड घेण्याआधी हा किल्ला काबीज केला.
रोह्यापासून तेरा किमी दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यामधे हा किल्ला आहे. तसा छोटा असणारा हा किल्ला रेवदंडा व साळवे ह्या दोन खाड्यांच्यामधे मोक्याच्या ठिकाणी बांघला आहे. पायथ्याशी घोसाळे नावाचे गाव आहे ज्यावरून ह्याला घोसाळगड हे नाव पडले. हा गड समुद्रसपाटीपासून २६० मीटर व पायथ्यापासून साधारण २०० मीटर उंच आहे.
उत्तर दक्षिण पसरलेला हा गड घोसाळे गावाच्या पश्चिमेकडे आहे. परिसरातील दाट झाडीमुळे वर जाणारी वाट थोडी शोधावी लागते. पावसाळ्यात व त्यानंतर इथली वाट नीट माहित नसल्यास गावातून वाटाड्या बरोबर घेणे कधीही चांगले. शिखराकडे जाणारी वाट आपल्याला इशान्येकडुन साधारण एका तासात वर नेते.
गडावर पाहण्यासारखे
इशान्याकडून येणारी वाट आपल्याला गडाच्या एका भागाकडे नेते. वरती पाण्याचे टाके, एक देऊळ व काही तोफा देखिल दिसतात. ह्याची दुहेरी तटबंदी सुद्धा बघण्यासारखी आहे. दक्षिणेकडच्या बुरूजावर ध्वजाची जागा आहे.
ह्या गडाचा दुसरा भाग, जो पहिल्यापेक्षा अधिक उंच आहे, त्याकडे थेट वरून जाता येत नाही. त्यासाठी पायथ्यापासून अग्नेयबाजूची वाट घ्यावी लागते. त्या भागात गडाचे काही अवशेष आहेत पण सर्वत्र प्रचंड रान माजलेले आहे. हा भाग उंच असल्याकारणाने इथून उत्तरेकडचा भाग मात्र नीट पाहता येतो.
इतिहास व ठळक घटना
हा गड नक्की कधी बांधला गेला ते पुराव्याअभावी सांगता येत नाही. तरी ह्याचे स्थान लक्षात घेता जंजी-याच्या सिद्दीने हा गड त्याच्या ताब्यात ठेवण्याचा बराच यत्न केलेला दिसतो. शिवाजीने हा किल्ला सन १६४८ च्या त्याच्या पहिल्या कोकण मोहिमेत घेतला.
शिवरायांच्या मृत्यूनंतर कधीतरी हा किल्ला सिद्दीकडे गेला. त्यानंतर सन १७३५ मधे बाजीरावाने हा जिंकून पुन्हा मराठ्यांकडे आणला. सन १८१८ मधे शेवटच्या इंग्रज - मराठा युद्धात कर्नल प्रॉथरने रायगड घेण्याआधी हा किल्ला काबीज केला.
