कोणतही शिवकाव्य येथे शोधा

समशेर हाती घेताच लोपत होत्या चंद्र तारका… असा हा सिंहाचा छावा मराठ्यांचा होता सखा ॥

समशेर हाती घेताच लोपत होत्या चंद्र तारका… असा हा सिंहाचा छावा मराठ्यांचा होता सखा ॥

 

मरणाला कधी न भिणारी आम्ही मराठ्याची पोरं
शाहिर सुद्धा सांगुन गेलंही होती सर्वांच्या म्होरं ॥
हातात भगवा घेउन पुढे खंडोबाचा मळवट भाळी
एकदाची स्वारी निघाली ठोकुन त्वेषाने आरोळी ।
येतो आम्ही काळजी नसावी, जिंकण्याची हौस डोळी
निघतो एकदाचा शुर तो, चिखलकाटे पायदळी ॥
झुंजविले ज्याने औरंगजेबालाही, म् रुत्यु त्याच्यापुढे फिका
कुशाग्र शक्तिशाली शंभु जिंकण्यास ना शत्रुस कधी मोका ।
समशेर हाती घेताच लोपत होत्या चंद्र तारका
असा हा सिंहाचा छावा मराठ्यांचा होता सखा ॥
बलिदान जाईल वाया त्याचे केले जर दुर्लक्ष
रक्त सांडलय मराठयांसाठी नेहमीच होता दक्ष ।
पन घात केला काळाने डाव एकदाचा साधला
जगदंबा जगदंबा शेवटचे बोल मुखावाटे वदला ॥
नेहमीच असायचा पुढे जरी होता तोराजा
मैदान सोडायचा नाही कधी उडविल्याशिवाय शत्रुचा फ़ज्जा ।
सात वर्षे नाही ठेवुन दिला कुणामायभुमीत पाय
एकदातरी शंभुराजे साकारायचाय माघार घेणार नाय ।।
हिंदवी स्वराज्याच्या जन्म भूमीवर,
क्षात्रवीर कट्टर संभाजी राजे भेटणारनाही.
हिंदू-मरा ठा जात आमची, धर्माँतर आम्हां पटणार नाही.
टोपली वळून पोट भरु, पण कोणाखाली झुकणार नाही.
उपाशी पोटी मेलो तरी चालेल पण कोणाखाली वाकणारनाही.
जातीसाठी माती खाऊ याचीच आम्हाला जाण आहे.
नसानसात ‘शिव भक्ति’ आमच्या,
हिंदवी स्वराज्याचा अभिमान आहे.
॥ जय हिँद ॥ ॥ जय महाराष्ट्र ॥